शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

क्लस्टरसाठी ठामपाची सुरू झाली धावपळ

By admin | Updated: June 16, 2017 01:58 IST

क्लस्टर डेव्हलपमेंटवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठवल्याने आता येत्या काळात या योजनेचा राज्य शासनाकडून अध्यादेश निघाल्यानंतर प्रत्यक्षात या योजनेला

- लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : क्लस्टर डेव्हलपमेंटवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठवल्याने आता येत्या काळात या योजनेचा राज्य शासनाकडून अध्यादेश निघाल्यानंतर प्रत्यक्षात या योजनेला गती मिळणार आहे. परंतु, त्याआधीच ठाणे महापालिकेने क्लस्टरची अंमलबजावणीकशा पद्धतीने करता येऊ शकते, कोणत्या भागात ही योजना पहिल्या टप्प्यात राबवणे गरजेचे ठरेल, तो परिसर शोधणे, त्या भागाचा सर्व्हे करणे, तेथील रहिवाशांचा बायोमेट्रीक सर्व्हे करणे, यासह या योजनेसाठी बीएसयूपीप्रमाणेच स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेतून शहरात तब्बल १० हजार इमारती बांधाव्या लागतील, असा प्राथमिक अंदाज आहे. या वेळी शहरातील काही नामांकित वास्तुविशारद, बांधकाम व्यावसायिक, महापालिकेतील काही लोकप्रतिनिधी, अधिकारी आदी उपस्थित होते. शहरात आजघडीला ३ हजार ६९३ च्या आसपास अतिधोकादायक आणि धोकादायक इमारती असून यामध्ये सुमारे पाच लाख रहिवाशांचे वास्तव्य आहे. परंतु, आता न्यायालयाने बंदी उठवल्याने या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. एकीकडे शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये क्लस्टरचे श्रेय घेण्यासाठी पोस्टरबाजी सुरू आहे. दुसरीकडे मात्र पालिकेने क्लस्टरच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे नव्वदच्या दशकात पालिकेने शहर विकास आराखडा मंजूर केल्यानंतर हे शहर वेगाने विकसित झाले. शहरीकरणाच्या रेट्यात पूर्वीच्या सोयीसुविधा कोलमडल्या. परंतु, सत्ताधाऱ्यांना नवीन विकास आराखडा मंजूर करण्यात अद्याप यश आलेले नाही. शहरात क्लस्टर योजनेची अंमलबजावणी करायची झाल्यास प्रथम विकास आराखड्यात नवीन नियमाला मंजुरी द्यावी लागेल. सुधारित विकास आराखड्याचा ठराव मंजूर करावा लागेल. विकास नियंत्रण नियमावलीनुसार कलम ३७ नुसार पालिकेला या योजनेच्या नियमासह विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा करावी लागेल. त्यानंतर, ते सरकारकडे मंजुरीसाठी पाठवून क्लस्टरची सीमानिश्चिती करावी लागणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. शिवाय, ही योजना राबवताना मागील कित्येक वर्षे पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिवाईनगर, लोकमान्यनगर, वागळे, कोपरी आणि मध्यवर्ती शहरातल्या उथळसर, कोलबाड, राबोडी, कळवा, खारीगावसारख्या वसाहतींना या वाढीव एफएसआयचा दिलासा मिळू शकणार असल्याने ही जमेची बाजू म्हणावी लागणार आहे. या योजनेंतर्गत मोकळी जागा, रस्ते, खेळती हवा, पार्किंग आदी मूलभूत सुविधा देऊन इमारतींचा नियोजनबद्ध पुनर्विकास करणे म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट. ही योजना राबवताना चार एफएसआय मिळू शकतो. सद्य:स्थितीमध्ये ठाणे शहरात १४ लाख १४ हजार ८२२ चौरस मीटर क्षेत्रफळावर बेकायदा बांधकामे उभी आहेत. त्यातील अनेक भूखंड हे शासकीय मालकीचे आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या पुनर्वसनाचे काय करणार, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. अद्यापही या योजनेबाबत योग्य अशी माहिती जाहीर केलेली नसल्यामुळे जनतेमध्ये संभ्रम कायम आहे.