शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

ठाण्यातील साडेचार हजार इमारतींना क्लस्टरची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 23:54 IST

लाखो रहिवाशांचा जीव टांगणीला : कोरोनामुळे रखडले काम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भिवंडीत झालेल्या इमारत दुर्घटनेनंतर धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ठाणे शहरात आजघडीला चार हजार ५१७ इमारती धोकादायक असून ७९ अतिधोकादायक इमारतींपैकी ४४ इमारतींमध्ये आजही रहिवाशांचे वास्तव्य आहे. यासाठी महापालिकेने पहिल्या टप्प्यात सहा ठिकाणी क्लस्टर योजना आणली होती. परंतु, हे काम कोरोनामुळे रखडल्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या लाखो रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.शहरातील ७९ अतिधोकादायक इमारतींपैकी महापालिका प्रशासनाने केवळ ३५ अतिधोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून उर्वरित ४४ इमारतींमध्ये अजूनही रहिवाशांचे वास्तव्य आहे. यात सर्वाधिक धोका हा नौपाडा, कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात असलेल्या इमारतींना असून ३८ पैकी केवळ १४ इमारतीच रिकाम्या केल्या असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

शहरात पावसाचा जोर कायम असून पडझडीच्या घटनादेखील सुरू आहेत. त्यामुळे या ४४ अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून त्यावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न भिवंडी शहरात झालेल्या इमातर दुर्घटनेनंतर उपस्थित करण्यात येत आहे. यंदा केलेल्या सर्वेक्षणामध्ये महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समित्यांमधील सुमारे चार हजार ५१७ धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सी-२ ए मध्ये १२३ इमारतींचा समावेश आहे. सी -२ बी मध्ये २३२६ आणि सी-३ मध्ये १९८९ इमारतींचा समावेश आहे. अतिधोकादायक शिल्लक इमारतींमध्ये सुमारे १५० पेक्षा अधिक कुटुंबे जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. भिवंडीसारख्या दुर्घटनेला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून या इमारतींमधील रहिवाशांना खबरदारीची उपाययोजना म्हणून घरे रिकामी करण्याच्या नोटिसा पालिकेने बजावलेल्या आहेत. मात्र, कोरोनासह पावसाळ्याच्या दुहेरी संकटामुळे अनेक रहिवाशांनी त्या रिक्त करण्यास नकार दिला आहे.

भूमिपूजनानंतर किसननगरची स्थिती जैसे थेविधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा गाजावाजा करून क्लस्टर योजनेला मंजुरी मिळाल्याचे सांगून ४४ यूआरपीपैकी सहा यूआरपीचे काम सुरू करण्याचा दावा केला होता. यामध्ये किसननगर, हाजुरी, कोपरी, लोकमान्यनगर आणि राबोडी यांचा समावेश होता.त्यानुसार, किसननगरच्या क्लस्टरचे भूमिपूजनही केले होते. परंतु, त्यानंतर आजही एक वीटही येथे लागलेली नाही. त्यातच कोरोनामुळे हे कामही लांबणीवर पडले.आता सहा महिन्यांनंतर या सहा यूआरपीमध्ये सर्व्हेचे काम सुरूकेल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता सर्व्हे झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया होणार आहे. याचाच अर्थ ही योजना मार्गी लागण्यास अवधी जाणार आहे.