शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ठाण्यातील साडेचार हजार इमारतींना क्लस्टरची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 23:54 IST

लाखो रहिवाशांचा जीव टांगणीला : कोरोनामुळे रखडले काम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भिवंडीत झालेल्या इमारत दुर्घटनेनंतर धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ठाणे शहरात आजघडीला चार हजार ५१७ इमारती धोकादायक असून ७९ अतिधोकादायक इमारतींपैकी ४४ इमारतींमध्ये आजही रहिवाशांचे वास्तव्य आहे. यासाठी महापालिकेने पहिल्या टप्प्यात सहा ठिकाणी क्लस्टर योजना आणली होती. परंतु, हे काम कोरोनामुळे रखडल्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या लाखो रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.शहरातील ७९ अतिधोकादायक इमारतींपैकी महापालिका प्रशासनाने केवळ ३५ अतिधोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून उर्वरित ४४ इमारतींमध्ये अजूनही रहिवाशांचे वास्तव्य आहे. यात सर्वाधिक धोका हा नौपाडा, कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात असलेल्या इमारतींना असून ३८ पैकी केवळ १४ इमारतीच रिकाम्या केल्या असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

शहरात पावसाचा जोर कायम असून पडझडीच्या घटनादेखील सुरू आहेत. त्यामुळे या ४४ अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून त्यावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न भिवंडी शहरात झालेल्या इमातर दुर्घटनेनंतर उपस्थित करण्यात येत आहे. यंदा केलेल्या सर्वेक्षणामध्ये महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समित्यांमधील सुमारे चार हजार ५१७ धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सी-२ ए मध्ये १२३ इमारतींचा समावेश आहे. सी -२ बी मध्ये २३२६ आणि सी-३ मध्ये १९८९ इमारतींचा समावेश आहे. अतिधोकादायक शिल्लक इमारतींमध्ये सुमारे १५० पेक्षा अधिक कुटुंबे जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. भिवंडीसारख्या दुर्घटनेला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून या इमारतींमधील रहिवाशांना खबरदारीची उपाययोजना म्हणून घरे रिकामी करण्याच्या नोटिसा पालिकेने बजावलेल्या आहेत. मात्र, कोरोनासह पावसाळ्याच्या दुहेरी संकटामुळे अनेक रहिवाशांनी त्या रिक्त करण्यास नकार दिला आहे.

भूमिपूजनानंतर किसननगरची स्थिती जैसे थेविधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा गाजावाजा करून क्लस्टर योजनेला मंजुरी मिळाल्याचे सांगून ४४ यूआरपीपैकी सहा यूआरपीचे काम सुरू करण्याचा दावा केला होता. यामध्ये किसननगर, हाजुरी, कोपरी, लोकमान्यनगर आणि राबोडी यांचा समावेश होता.त्यानुसार, किसननगरच्या क्लस्टरचे भूमिपूजनही केले होते. परंतु, त्यानंतर आजही एक वीटही येथे लागलेली नाही. त्यातच कोरोनामुळे हे कामही लांबणीवर पडले.आता सहा महिन्यांनंतर या सहा यूआरपीमध्ये सर्व्हेचे काम सुरूकेल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता सर्व्हे झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया होणार आहे. याचाच अर्थ ही योजना मार्गी लागण्यास अवधी जाणार आहे.