शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
3
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
4
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
5
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
6
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
7
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
8
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
9
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
10
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
11
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
12
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
13
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
14
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
15
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
16
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
17
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
18
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
19
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
20
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

क्लस्टरच्या सुनावणीत गावठाण, कोळीवाडेही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 03:58 IST

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला हरताळ; महापौरांकडे तक्रार

ठाणे : गावठाण आणि कोळीवाडे क्लस्टरमधून वगळण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असतानासुद्धा ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून गावठाण आणि कोळीवाड्यामधील नागरिकांना जनसुनावणीसाठी बोलवण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे यासंदर्भात चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीने महापौर मीनाक्षी शिंदे यांना एक पत्र देऊन या जनसुनावण्या रद्द करण्याची मागणी केली आहे.महापालिकेने शहरातील ४४ भागांसाठीच्या विकास आराखड्यासंदर्भात योजना जाहीर केली आहे. यामध्ये शहरातील गावठाण आणि कोळीवाड्यांचादेखील समावेश आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांनी महापालिकेच्या या कृतीविरोधात आंदोलने उभी केली होती. तसेच या योजनेचा अभ्यास करून त्याला गावठाणासोबत जोडून पाहिल्यावर अनेक धोके समोर आले. अनेक हरकती नोंदवल्या गेल्या होत्या. एकूणच ही योजना भूमिपुत्रांच्या संस्कृतीचा, अस्मितेचा आणि अस्तित्वाचा आणि त्यांच्या हिताचा विचार करण्यात फोल ठरल्याची भावना निर्माण झाली होती. परिणामी, शहरातील गावठाणे, कोळीवाडे आणि पाड्यांमध्ये राहणाऱ्या भूमिपुत्रांनी क्लस्टर योजनेमधून गावठाण, कोळीवाडे आणि पाडे वगळण्याची मागणी केली होती. यातूनच ठाणे शहरातील भूमिपुत्रांसोबत ठाणे ग्रामीण, पालघर, नवी मुंबई, मुंबई आणि रायगड भागातील भूमिपुत्र संस्थांनी एकत्रित येऊन आगरी-कोळी भूमिपुत्र महासंघाची स्थापना केली आहे. या महासंघामध्ये विविध तज्ज्ञांचा समावेश आहे.भूमिपुत्रांच्या या लढ्याला मतदार जागरण अभियान, स्वराज्य इंडिया, स्वराज अभियान या सामाजिक संस्थांनी पाठिंबा दिल्याने यातून एक मोठी जनचळवळ उभी राहिली. यामध्ये ठाण्यातील सर्वपक्षीय आमदारांनी गावठाण, कोळीवाडे येथे राहणाºया नागरिकांची बाजू हिरिरीने अधिवेशनात मांडली.जनतेच्या आक्रमकतेपुढे अखेर सरकारला नमते घ्यावे लागले. शेवटी, क्लस्टर योजनेतून गावठाण आणि कोळीवाडे वगळण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला. परंतु, असे असतानाही अद्याप ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून गावठाण, कोळीवाड्यांमध्ये राहणाºया नागरिकांना जनसुनावणीसाठी बोलवण्यात येत असल्याचा आरोप चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीने केला आहे.महापौर मीनाक्षी शिंदे यांना यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला असून, ही जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जर गावठाण, कोळीवाडे क्लस्टरमधून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, तर मग आता ही जनसुनावणी का घेण्यात येत आहे, असा सवाल करून संवर्धन समितीच्या उपस्थितीत ही जनसुनावणी रद्द करण्याची मागणी समितीने महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.महापालिकेत तक्रारदारांचा गोंधळठाणे शहरात राबविण्यात क्लस्टर योजनेविरोधात असलेल्या नागरिकांच्या तक्र ारी निकाली काढण्यासाठी सोमवारी महापालिकेत सुनावणी आयोजिली होती. मात्र, मुख्यालयात पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे काही तक्रारदारांनी गोंधळ घालून ती रद्द करण्याची मागणी केली.जनसुनावणी मोठ्या सभागृहात आणि सक्षम अधिकाºयांच्या उपस्थितीत घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या प्रकारामुळे मुख्यालयात काही काळ तणावाचे वातावरण होते. सुनावणीसाठी ५० जणांना बोलविण्यात आले होते आणि बसण्यासाठी केवळ १४ जागा होत्या.वेळेवर सुनावणी सुरू झाली नाही. योजनेबाबत प्रशासनाकडून उत्तरे दिली जात नाही, अशा स्वरु पाचे हे आक्षेप होते. तसेच सुनावणी जबरदस्तीने घेतल्यास नागरिक रस्त्यावर उतरतील असा इशाराही यावेळी देण्यात आला.

टॅग्स :thaneठाणे