शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

उल्हासनगरमधील १० जीन्स कारखाने बंद

By admin | Updated: July 4, 2017 06:56 IST

वालधुनी नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने दहा जीन्स कापड प्रक्रिया कारखाने बंद केले आणि पाच

 लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : वालधुनी नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने दहा जीन्स कापड प्रक्रिया कारखाने बंद केले आणि पाच कारखानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील यांनी नुकतीच उल्हासनगर महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासोबत बैठक घेतली. वालधुनी नदी ही सगळ््यात जास्त प्रदूषित नदी असून तिचा नाला झाला आहे. या प्रकरणी अंबरनाथ व उल्हासनगरातील जागरूक नागरिकांनी एकत्रित येऊन ‘वालधुनी बचाव’ मोहीम आखली आहे. तिचाच भाग म्हणून जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्यासोबत ‘वालधुनी बचाव’ मोर्चा काढण्यात आला. प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी वालधुनी नदीत सोडले जाते. त्यासाठी ‘सेपरेट सिव्हर’ हे घोषवाक्य घेत स्वाक्षरी मोहीम झाली. त्यात पाच हजार जण सहभागी झाले. त्याचे निवेदन सरकारी यंत्रणांना दिले. प्रक्रिया करुन स्वतंत्र वाहिन्यांद्वारे सांडपाणी खाडीत दूरवर सोडावे, अशी मागणी करण्यात आल्याचे वालधुनी जलबिरादरीचे कार्यकर्ते शशिकांत दायमा यांनी सांगितले. जल बिरादरीचे आठ कार्यकर्ते त्यासाठी काम करीत आहेत. ८ आॅगस्ट हा उल्हासनगरचा स्थापना दिवस आहे. या दिवशी पुन्हा जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह उल्हासनगरात येणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली वालधुनी रिव्हर मार्च काढला जाईल. वालधुनी नदीत केवळ सांडपाणीच नव्हे, तर जीन्स कापड उद्योगातील रासायनिक सांडपाणी, उद्योगातून तयार होणारे रसायनमिश्रित पाणी, रासायनिक घनकचरा टाकला जातो. त्यावर ठोस कारवाईची मागणी जलबिरादरीने केली आहे.