शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उल्हासनगरमधील १० जीन्स कारखाने बंद

By admin | Updated: July 4, 2017 06:56 IST

वालधुनी नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने दहा जीन्स कापड प्रक्रिया कारखाने बंद केले आणि पाच

 लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : वालधुनी नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने दहा जीन्स कापड प्रक्रिया कारखाने बंद केले आणि पाच कारखानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील यांनी नुकतीच उल्हासनगर महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासोबत बैठक घेतली. वालधुनी नदी ही सगळ््यात जास्त प्रदूषित नदी असून तिचा नाला झाला आहे. या प्रकरणी अंबरनाथ व उल्हासनगरातील जागरूक नागरिकांनी एकत्रित येऊन ‘वालधुनी बचाव’ मोहीम आखली आहे. तिचाच भाग म्हणून जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्यासोबत ‘वालधुनी बचाव’ मोर्चा काढण्यात आला. प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी वालधुनी नदीत सोडले जाते. त्यासाठी ‘सेपरेट सिव्हर’ हे घोषवाक्य घेत स्वाक्षरी मोहीम झाली. त्यात पाच हजार जण सहभागी झाले. त्याचे निवेदन सरकारी यंत्रणांना दिले. प्रक्रिया करुन स्वतंत्र वाहिन्यांद्वारे सांडपाणी खाडीत दूरवर सोडावे, अशी मागणी करण्यात आल्याचे वालधुनी जलबिरादरीचे कार्यकर्ते शशिकांत दायमा यांनी सांगितले. जल बिरादरीचे आठ कार्यकर्ते त्यासाठी काम करीत आहेत. ८ आॅगस्ट हा उल्हासनगरचा स्थापना दिवस आहे. या दिवशी पुन्हा जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह उल्हासनगरात येणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली वालधुनी रिव्हर मार्च काढला जाईल. वालधुनी नदीत केवळ सांडपाणीच नव्हे, तर जीन्स कापड उद्योगातील रासायनिक सांडपाणी, उद्योगातून तयार होणारे रसायनमिश्रित पाणी, रासायनिक घनकचरा टाकला जातो. त्यावर ठोस कारवाईची मागणी जलबिरादरीने केली आहे.