शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

उल्हासनगरमधील १० जीन्स कारखाने बंद

By admin | Updated: July 4, 2017 06:56 IST

वालधुनी नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने दहा जीन्स कापड प्रक्रिया कारखाने बंद केले आणि पाच

 लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : वालधुनी नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने दहा जीन्स कापड प्रक्रिया कारखाने बंद केले आणि पाच कारखानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील यांनी नुकतीच उल्हासनगर महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासोबत बैठक घेतली. वालधुनी नदी ही सगळ््यात जास्त प्रदूषित नदी असून तिचा नाला झाला आहे. या प्रकरणी अंबरनाथ व उल्हासनगरातील जागरूक नागरिकांनी एकत्रित येऊन ‘वालधुनी बचाव’ मोहीम आखली आहे. तिचाच भाग म्हणून जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्यासोबत ‘वालधुनी बचाव’ मोर्चा काढण्यात आला. प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी वालधुनी नदीत सोडले जाते. त्यासाठी ‘सेपरेट सिव्हर’ हे घोषवाक्य घेत स्वाक्षरी मोहीम झाली. त्यात पाच हजार जण सहभागी झाले. त्याचे निवेदन सरकारी यंत्रणांना दिले. प्रक्रिया करुन स्वतंत्र वाहिन्यांद्वारे सांडपाणी खाडीत दूरवर सोडावे, अशी मागणी करण्यात आल्याचे वालधुनी जलबिरादरीचे कार्यकर्ते शशिकांत दायमा यांनी सांगितले. जल बिरादरीचे आठ कार्यकर्ते त्यासाठी काम करीत आहेत. ८ आॅगस्ट हा उल्हासनगरचा स्थापना दिवस आहे. या दिवशी पुन्हा जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह उल्हासनगरात येणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली वालधुनी रिव्हर मार्च काढला जाईल. वालधुनी नदीत केवळ सांडपाणीच नव्हे, तर जीन्स कापड उद्योगातील रासायनिक सांडपाणी, उद्योगातून तयार होणारे रसायनमिश्रित पाणी, रासायनिक घनकचरा टाकला जातो. त्यावर ठोस कारवाईची मागणी जलबिरादरीने केली आहे.