शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
4
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
5
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
6
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
7
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
8
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
9
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
10
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
11
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
12
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
13
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
15
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
16
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
17
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
18
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
19
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
20
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

लिपीक प्रश्नपत्रिका फुटली

By admin | Updated: October 5, 2015 00:25 IST

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील लिपीक आणि टंकलेखकपद भरतीच्या १३४ जागांसाठी रविवारी झालेल्या परीक्षेमध्ये आर्यन एज्युकेशन सोसायटी शाळेच्या

पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील लिपीक आणि टंकलेखकपद भरतीच्या १३४ जागांसाठी रविवारी झालेल्या परीक्षेमध्ये आर्यन एज्युकेशन सोसायटी शाळेच्या परीक्षा केंद्रातून मोबाइलद्वारे व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रश्नपत्रिका तसेच उत्तरपत्रिकांची देवाणघेवाण करणाऱ्या दोन परीक्षार्थ्यांना पालघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोन्ही परीक्षार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात १३४ जागांसाठी रविवारी २४ हजार ९६७ परीक्षार्थी परीक्षेला बसले होते. त्यांच्यासाठी पालघर व वसई तालुक्यातील ५७ उपकेंद्रांवर त्यांची आसनव्यवस्था करण्यात आली होती. या परीक्षेसाठी पालघर जिल्ह्यासह नांदेड, यवतमाळ, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, पुणे इ. भागांतून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आले होते. या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळावी, यासाठी अनेक शासकीय अधिकारी, राजकीय लोक, दलाल यांचे प्रयत्न सुरू होते. परंतु, ही परीक्षा प्रक्रिया पारदर्शक पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी अभिजित बांगर व त्यांच्या टीमने एका कार्यक्रमाची आखणी केली होती. ज्या प्रिंटिंग प्रेसमध्ये या प्रश्नपत्रिकेची छपाई करण्यात आली, त्या प्रेसचा ताबा शनिवारी रात्रीपासूनच जिल्हाधिकाऱ्यांच्या टीमने घेतला होता. प्रिंटिंग कामात सहभागी सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाइल ताब्यात घेण्यात आले होते. प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्यानंतर विश्वासू अधिकाऱ्यांच्या साहाय्याने पालघर व वसई तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्तात पोहोचविण्यात आल्या होत्या. या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व माहिती बाहेर पडू नये, यासाठी प्रश्नपत्रिका छपाई करणाऱ्या सर्व टीमला पेपर संपेपर्यंत कंपनीबाहेर पडू न देता त्यांचे मोबाइलही ताब्यात घेण्यात आले होते. ही सर्व प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करण्यात आल्याची माहितीही एका विश्वसनीय सूत्राने दिली. रविवारी सकाळी १०.३० वा. सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. ११ वाजता पेपर सुरू झाल्यानंतर आर्यन आणि भगिनी समाज शाळेमधील काही परीक्षार्थी १० ते १५ मिनिटे उशिराने आल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याचे कळते. या वेळी परीक्षा केंद्रात मोबाइल नेण्यास मज्जाव असूनही आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या परीक्षा केंद्रात परीक्षा देणारे राजीव प्रकाश झडके, रा. उमरखेडा, जि. यवतमाळ व राजू हनोता अंबोरे, रा. माहूर, जि. नांदेड यांनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्रश्नपत्रिका बाहेर पाठविल्याचे परीक्षा केंद्रप्रमुखाच्या लक्षात आले. त्यानंतर, या दोन्ही परीक्षार्थ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सहा. पो.नि. दीपक साळुंखे या तपास अधिकाऱ्यांमार्फत गुन्हे दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत करत होते. जिल्हाधिकारी व त्यांच्या टीमने परीक्षेमध्ये पारदर्शकता ठेवल्यामुळे योग्य उमेदवारांना नोकरीची संधी प्राप्त होणार आहे. (प्रतिनिधी)