शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

‘स्वच्छ भारत’ची केडीएमसीकडून खिल्ली

By admin | Updated: December 22, 2016 05:41 IST

केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार राबविल्या जात असलेल्या स्वच्छ भारत अभियानाची केडीएमसी प्रशासनाने खिल्ली

कल्याण : केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार राबविल्या जात असलेल्या स्वच्छ भारत अभियानाची केडीएमसी प्रशासनाने खिल्ली उडवल्याचे मंगळवारच्या महासभेत उघड झाले. हगणदारीमुक्त प्रभागांची सादर केलेली यादी बोगस आहे, असा आरोप सर्वपक्षांच्या नगरसेवकांनी केला. यावर प्रशासनाने सादर केलेला घोषणेचा प्रस्ताव फेटाळून लावत चौकशीचे आदेश महापौर राजेंद्र देवळेकर यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांना दिले. राज्य सरकारच्या सूचनेनुसार केडीएमसी हद्दीतही हगणदारीमुक्त प्रभागाचा संकल्प करण्यात आला आहे. त्याअंतर्गत राबवलेल्या अभियानात महापालिकेच्या १२२ प्रभागांपैकी ८६ प्रभाग हे हागणदारीमुक्त प्रभाग झाल्याची घोषणा करणारा प्रस्ताव प्रशासनाने महासभेत मान्यतेसाठी दाखल केला होता. तो चर्चेला येताच रोहिदास वाडा प्रभागाच्या नगरसेविका शकीला खान यांनी यादीतील त्यांच्या नावाला हरकत घेतली. आजही माझा प्रभाग हागणदारीमुक्त न झाल्याची माहिती सभागृहात दिली. प्रशासनाने खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांनी केला. नगरसेवक विश्वनाथ राणे यांनीही यादी बोगस असल्याची टीका केली. प्रभाग हगणदारीमुक्त झाल्याचे पत्र नगरसेवकांकडून जबरदस्तीने घेतले जात आहे, असा गंभीर आरोप नगरसेविका रेखा चौधरी यांनी केला. पंतप्रधानांच्या संकल्पनेतून राबवल्या जात असलेल्या ‘स्वच्छ भारत’ची प्रशासनाने चेष्टा केली आहे. याप्रकरणी मनसेतर्फे मुख्यमंत्र्यांकडे याची तक्रार करणार आहे, असे नगरसेवक पवन भोसले यांनी स्पष्ट केले. महापौरांनीही याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भोसले यांनी केली. नगरसेवक राहुल दामले यांनी तर मी पत्रावर सही दिली असताना प्रशासनाने सादर केलेल्या हगणदारीमुक्त यादीत माझ्या प्रभागाचे नाव नसल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले असता सभागृहात एकच हंशा पिकला. दरम्यान, महापौर देवळेकर यांनीही यावेळी प्रशासनाच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यांना कोणतेही गांभिर्य गांभीर्य नाही. केवळ कागदोपत्री कामे दाखविली जात आहेत. अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता नाही. अनेक ठिकाणी शौचालये दुरुस्त देखील झालेली नाहीत. नगरसेवकांच्या भावना तीव्र असून, यात जातीने लक्ष घालावे, अशा शब्दांत महापौरांनी आयुक्त रवींद्रन यांना सुनावले. (प्रतिनिधी)