शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ भारत’ची केडीएमसीकडून खिल्ली

By admin | Updated: December 22, 2016 05:41 IST

केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार राबविल्या जात असलेल्या स्वच्छ भारत अभियानाची केडीएमसी प्रशासनाने खिल्ली

कल्याण : केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार राबविल्या जात असलेल्या स्वच्छ भारत अभियानाची केडीएमसी प्रशासनाने खिल्ली उडवल्याचे मंगळवारच्या महासभेत उघड झाले. हगणदारीमुक्त प्रभागांची सादर केलेली यादी बोगस आहे, असा आरोप सर्वपक्षांच्या नगरसेवकांनी केला. यावर प्रशासनाने सादर केलेला घोषणेचा प्रस्ताव फेटाळून लावत चौकशीचे आदेश महापौर राजेंद्र देवळेकर यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांना दिले. राज्य सरकारच्या सूचनेनुसार केडीएमसी हद्दीतही हगणदारीमुक्त प्रभागाचा संकल्प करण्यात आला आहे. त्याअंतर्गत राबवलेल्या अभियानात महापालिकेच्या १२२ प्रभागांपैकी ८६ प्रभाग हे हागणदारीमुक्त प्रभाग झाल्याची घोषणा करणारा प्रस्ताव प्रशासनाने महासभेत मान्यतेसाठी दाखल केला होता. तो चर्चेला येताच रोहिदास वाडा प्रभागाच्या नगरसेविका शकीला खान यांनी यादीतील त्यांच्या नावाला हरकत घेतली. आजही माझा प्रभाग हागणदारीमुक्त न झाल्याची माहिती सभागृहात दिली. प्रशासनाने खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांनी केला. नगरसेवक विश्वनाथ राणे यांनीही यादी बोगस असल्याची टीका केली. प्रभाग हगणदारीमुक्त झाल्याचे पत्र नगरसेवकांकडून जबरदस्तीने घेतले जात आहे, असा गंभीर आरोप नगरसेविका रेखा चौधरी यांनी केला. पंतप्रधानांच्या संकल्पनेतून राबवल्या जात असलेल्या ‘स्वच्छ भारत’ची प्रशासनाने चेष्टा केली आहे. याप्रकरणी मनसेतर्फे मुख्यमंत्र्यांकडे याची तक्रार करणार आहे, असे नगरसेवक पवन भोसले यांनी स्पष्ट केले. महापौरांनीही याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भोसले यांनी केली. नगरसेवक राहुल दामले यांनी तर मी पत्रावर सही दिली असताना प्रशासनाने सादर केलेल्या हगणदारीमुक्त यादीत माझ्या प्रभागाचे नाव नसल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले असता सभागृहात एकच हंशा पिकला. दरम्यान, महापौर देवळेकर यांनीही यावेळी प्रशासनाच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यांना कोणतेही गांभिर्य गांभीर्य नाही. केवळ कागदोपत्री कामे दाखविली जात आहेत. अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता नाही. अनेक ठिकाणी शौचालये दुरुस्त देखील झालेली नाहीत. नगरसेवकांच्या भावना तीव्र असून, यात जातीने लक्ष घालावे, अशा शब्दांत महापौरांनी आयुक्त रवींद्रन यांना सुनावले. (प्रतिनिधी)