शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

आण्णा नगरमध्ये स्वच्छतेची, वाहतूककोंडीची समस्या

By admin | Updated: August 30, 2015 23:28 IST

येथील जुन्या डोंबिवली परिसरात असलेल्या दिवा-वसई रेल्वे लाइन लगतच्या आण्णा नगरमध्ये अवघे एक स्वच्छतागृह असून सुमारे २०० कुटुंबियांच्या वस्तीसाठी ते अपुरे आहे

अनिकेत घमंडी, डोंबिवलीयेथील जुन्या डोंबिवली परिसरात असलेल्या दिवा-वसई रेल्वे लाइन लगतच्या आण्णा नगरमध्ये अवघे एक स्वच्छतागृह असून सुमारे २०० कुटुंबियांच्या वस्तीसाठी ते अपुरे आहे. येथे एक स्वच्छतागृह बांधले होते, परंतु ते उत्साहाच्या भरात भूखंडाच्या मालकीची खातरजमा न करता रेल्वेच्या जागेत बांधण्यात आल्याने ते शुभारंभापूर्वीच तोडण्यात आले, त्यामुळे तेथील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. याच ठिकाणी युटीडब्ल्यूटी (अल्ट्रा थिन व्हाईट टॉपिंग) या अत्याधुनिक पद्धतीने रस्ता बांधण्यात येत असून त्याचे काम रात्री करण्यात येते आहे. चिंचोळा व नागमोडी रस्ता असल्याने दिवसा काम करणे शक्य नसल्याने फक्त रात्रीच ते करण्यात येत आहे. सध्याचा रस्ता हा चिखल, खड्डेमय असल्याने नागरिक त्रस्त आहेत. आधीच रस्ता लहान असल्याने एकाच वेळी दोन विरुद्ध दिशेने चारचाकी, अथवा मोठ्या गाड्या जातांना वाहतुकीची समस्या उद्भवते अशी स्थिती आहे. त्यात आता रस्त निर्मितीच्या कामाची भर पडली आहे. काही प्रमाणात स्लम, आणि इमारतींचा असा संमिश्र असा हा परिसर असून त्यात सर्वधर्मिय नागरिक वास्तव्यास आहेत. बहुतांशी नागरिक हे नोकरीनिमित्त मुंबईसह अन्यत्र जातात. त्यामुळे पाणी, रस्ते, वीज आणि दळणवळणाची साधने या त्यांच्या मुलभूत गरजा आहेत. राखीव भूखंडाचा आभाव असल्याने मनोरंजनासाठी आणि करमणुकीसाठी येथील नागरिकांना डोंबिवलीच्या मध्यवर्ती भागात अथवा कोपर रोड, सखाराम नगरच्या लहान मुलांच्या उद्यान्यांवर अवलंबून राहावे लागते. अरुंद रस्ता आणि प्रतिसाद कमी असल्याने या ठिकाणी केडीएमटीची परिवहनची बस सेवा बंद करण्यात आली. आता येथील रहिवाशांची सर्व मदार ही रिक्षांवरच आहे. या ठिकाणीच महापालिकेचा कच-यापासून खत निर्मितीचा प्रकल्प होता, परंतु स्थानिकांमधील हेवेदावेसह अन्य काही कारणांमुळे तो बंद पडला. परिसरातीलच एका महिला संस्थेला तो चालविण्यासाठी देण्यात आला होता. तो ही त्यामुळे शहरात आता महापालिकेचा खत निर्मितीचा प्रकल्प नाही. केडीएमसीत कचऱ्याची समस्या जटील असतांना हा खत प्रकल्प बंद कसा पडला, असा सवाल नगरसेवकालाही विचारण्यात येतो. पण त्याचे उत्तर नाही.