शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

स्वच्छ भारत अभियानाचा सरावलीत बोजवारा

By admin | Updated: August 8, 2016 01:57 IST

मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला सुरूवातीला देशभरात सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर आता शहरांना त्यांच्या स्वच्छता विषयक प्रयत्नांमध्ये मदत

बोईसर : मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला सुरूवातीला देशभरात सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर आता शहरांना त्यांच्या स्वच्छता विषयक प्रयत्नांमध्ये मदत करण्यासाठी इतर साधनांचा (टूल्सचा) शुभरंभही झाला असून स्वच्छ सर्वेक्षण २०१७ करीता काऊंटडाऊनही सुरू झाले असतानाच तारापूर एमआयडीसी क्षेत्राल लगत असलेल्या सरावली ग्रामपंचायतीने मात्र स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडवल्याची चित्र काही भागात दिसत आहे.सरावली ग्रामपंचायतीमध्ये सरावली हे मूळ गाव, वेगवेगळया ठिकाणी मोठया प्रमाणांत उभारण्यात आलेल्या इमारती व गृहसंकुले तर उर्वरीत ठिकाणी बैठया चाळीतील दाट संमिश्र लोकवस्ती तसेच तारापूर एमआयडीसीतील कारखान्यांचा अंतर्भाव असून लोकसंख्येचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामध्ये गोरगरीब, कामगार वर्गाचे प्रचंड मोठया प्रमाणात वास्तव्य आहे. बैठया चाळी, नागरी वसाहतीतील कचरा नियमीत उचलला जात नसल्याने जागोजागी प्रचंड प्रमाणावर साचलेला कचरा त्यातून निर्माण होणारी दुर्गंधी व त्यापासून होणारे साथीचे आजार याकडे पंचायतीचे लक्ष नाही. पालघर तालुका भाजपा झोपडपट्टी आघाडीचे बोईसर मंडळाचे अध्यक्ष संजू शेट्टी, पालघर तालुका भाजपा बोईसर मंडळचे सरचिटणीस बच्चन शुक्ला यांनी याबाबत सरावलीचे उपसरपंच प्रजित घरत व ग्राम विकास अधिकारी सुभाष किणी यांना या दुर्दशेचे दर्शन नुकतेच घडवले.सरावली ग्रामपंचायतीच्या ताफ्यामध्ये दोन ट्रॅक्टर व चोविस सफाई कर्मचारी आहेत मात्र तरीही कचरा नियमित उचलला जात नसल्याची तक्रारी तेथील ग्रामस्थांनी केल्या. प्यायचे पाणी पुरेशा दाबाने व नियमित येत नसल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. तर सिध्दार्थ नगर येथे साचलेल्या कचऱ्याच्या जवळील पाइपलाइनच्या एका व्हॉलच्या चेंबरमध्ये साचलेले दूषित पाणी तर दुसरा व्हॉल साचलेल्या दुर्गंधीयुक्त व चिखलात कसा अदृश्य झाला आहे तेही एका ग्रामस्थाने दाखवले, यामुळे साथीच्या आजारांची भीती व्यक्त होत आहे. स्वच्छता मोहिम राबविण्याचे भारत अभियान सुरूवातीला मोठया जोमाने सरावली ग्रामपंचायतीने राबविल्याचे नागरीक सांगताहेत परंतु आज पाहिजे त्या प्रमाणात स्वच्छता होत नाही कचरा वेळेवर व नियमीत उचलला जात नाही हे खरे वास्तव आहे खुर्चीवर व सत्तेत बसलेल्या अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना स्वच्छता मोहिम राबवल्यासंदर्भात गांभिर्य वाटत नसून उदासिनतेमुळे आज घडीला नागरी वस्तीमध्ये कचरा साठला आहे. त्यातून निघाणारी दुर्गंधी व फै लावणारे जंतू याबाबत वेळीच दक्षता न घेतल्यास ते जीवावरही बेतण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)