शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानाचा सरावलीत बोजवारा

By admin | Updated: August 8, 2016 01:57 IST

मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला सुरूवातीला देशभरात सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर आता शहरांना त्यांच्या स्वच्छता विषयक प्रयत्नांमध्ये मदत

बोईसर : मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला सुरूवातीला देशभरात सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर आता शहरांना त्यांच्या स्वच्छता विषयक प्रयत्नांमध्ये मदत करण्यासाठी इतर साधनांचा (टूल्सचा) शुभरंभही झाला असून स्वच्छ सर्वेक्षण २०१७ करीता काऊंटडाऊनही सुरू झाले असतानाच तारापूर एमआयडीसी क्षेत्राल लगत असलेल्या सरावली ग्रामपंचायतीने मात्र स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडवल्याची चित्र काही भागात दिसत आहे.सरावली ग्रामपंचायतीमध्ये सरावली हे मूळ गाव, वेगवेगळया ठिकाणी मोठया प्रमाणांत उभारण्यात आलेल्या इमारती व गृहसंकुले तर उर्वरीत ठिकाणी बैठया चाळीतील दाट संमिश्र लोकवस्ती तसेच तारापूर एमआयडीसीतील कारखान्यांचा अंतर्भाव असून लोकसंख्येचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामध्ये गोरगरीब, कामगार वर्गाचे प्रचंड मोठया प्रमाणात वास्तव्य आहे. बैठया चाळी, नागरी वसाहतीतील कचरा नियमीत उचलला जात नसल्याने जागोजागी प्रचंड प्रमाणावर साचलेला कचरा त्यातून निर्माण होणारी दुर्गंधी व त्यापासून होणारे साथीचे आजार याकडे पंचायतीचे लक्ष नाही. पालघर तालुका भाजपा झोपडपट्टी आघाडीचे बोईसर मंडळाचे अध्यक्ष संजू शेट्टी, पालघर तालुका भाजपा बोईसर मंडळचे सरचिटणीस बच्चन शुक्ला यांनी याबाबत सरावलीचे उपसरपंच प्रजित घरत व ग्राम विकास अधिकारी सुभाष किणी यांना या दुर्दशेचे दर्शन नुकतेच घडवले.सरावली ग्रामपंचायतीच्या ताफ्यामध्ये दोन ट्रॅक्टर व चोविस सफाई कर्मचारी आहेत मात्र तरीही कचरा नियमित उचलला जात नसल्याची तक्रारी तेथील ग्रामस्थांनी केल्या. प्यायचे पाणी पुरेशा दाबाने व नियमित येत नसल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. तर सिध्दार्थ नगर येथे साचलेल्या कचऱ्याच्या जवळील पाइपलाइनच्या एका व्हॉलच्या चेंबरमध्ये साचलेले दूषित पाणी तर दुसरा व्हॉल साचलेल्या दुर्गंधीयुक्त व चिखलात कसा अदृश्य झाला आहे तेही एका ग्रामस्थाने दाखवले, यामुळे साथीच्या आजारांची भीती व्यक्त होत आहे. स्वच्छता मोहिम राबविण्याचे भारत अभियान सुरूवातीला मोठया जोमाने सरावली ग्रामपंचायतीने राबविल्याचे नागरीक सांगताहेत परंतु आज पाहिजे त्या प्रमाणात स्वच्छता होत नाही कचरा वेळेवर व नियमीत उचलला जात नाही हे खरे वास्तव आहे खुर्चीवर व सत्तेत बसलेल्या अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना स्वच्छता मोहिम राबवल्यासंदर्भात गांभिर्य वाटत नसून उदासिनतेमुळे आज घडीला नागरी वस्तीमध्ये कचरा साठला आहे. त्यातून निघाणारी दुर्गंधी व फै लावणारे जंतू याबाबत वेळीच दक्षता न घेतल्यास ते जीवावरही बेतण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)