शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता झाली; पण दिखाव्यापुरतीच!

By admin | Updated: March 30, 2017 05:39 IST

एमआयडीसी परिसरातील गणेश विसर्जन तलावाकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले आहे

डोंबिवली : एमआयडीसी परिसरातील गणेश विसर्जन तलावाकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे त्याला डम्पिंगचे स्वरूप आल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच तलाव आणि परिसरातील कचरा तातडीने उचलण्यात आला. परंतु, तलावातील पाण्याला पडलेला जलपर्णींचा विळखा कायम आहे. त्यामुळे केडीएमसीने केलेली स्वच्छता ही एक प्रकारे दिखावा ठरली आहे.केडीएमसीच्या या गणेश विसर्जन तलावाचे २००१ मध्ये सुशोभीकरण करण्यात आले. घरगुती गणपती विसर्जनाच्या सोयीसाठी या तलावाची निर्मिती करण्यात आली. परंतु, आजघडीला या तलावाकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले. निर्माल्यकलश असतानाही निर्माल्य तसेच घरातील कचराही तलावात सर्रासपणे टाकला जात असल्याने येथील प्रदूषण जलचर प्राण्यांच्या जीवावर बेतत आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांअभावी येथील सुरक्षाही वाऱ्यावर पडल्याने एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.केवळ गणेशोत्सवात तलावाची स्वच्छता केली जाते. परंतु, त्यानंतर या तलावाकडे दुर्लक्ष होते. त्यात आता घरगुती गणपती, सार्वजनिक मंडळाचे तसेच मोठ्या उंचीच्या मूर्तींचेही येथे विसर्जन होत आहे. त्यामुळे येथील तलावातील पाणी प्रदूषित झाले आहे. त्यातच रहिवासी घरातील कचरा, निर्माल्यही त्यात टाकत आहेत. या तलावाच्या दुरवस्थेच्या वास्तवाबाबत ‘लोकमत’ने नुकतेच ‘विसर्जन तलाव की डम्पिंग’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. यावर तातडीने तलावातील आणि त्यालगतच्या भागातील कचरा महापालिकेने उचलला. मात्र, तलावातील पाण्याची स्वच्छता करण्यात आली नाही. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे तलावातील जलपर्णींची वाढ होऊन तलावातील पाण्यावर शेवाळाचा हिरवा तवंग पसरला आहे. ही वाढती जलपर्णी घातक असून पाण्यातील आॅक्सिजनच्या मात्राला ती मारक ठरत आहे. त्यामुळे तलावातील जलचर प्राण्यांचा जीव धोक्यात आला आहे. (प्रतिनिधी)