शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील वालधुनी नदीची साफसफाई

By सदानंद नाईक | Updated: March 18, 2025 13:03 IST

वालधुनी नदीची साफसफाई ऐन उन्हाळ्यात जेसीबी मशीनद्वारे केली जात असून नदी पात्रातून काढलेली गाळ व कचरा उचलण्यात येत आहे.

उल्हासनगर : महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वालधुनी नदीसह लहान मोठ्या नाल्याची सफाई जेसीबी मशीन लावून केला जातो. यावर्षी मात्र वालधुनी नदीची साफसफाई ऐन उन्हाळ्यात जेसीबी मशीनद्वारे केली जात असून नदी पात्रातून काढलेली गाळ व कचरा उचलण्यात येत आहे.

 शहराच्या मधोमध वाहणारी वालधुनी नदी शहराला वरदान नं ठरता शाप ठरत असल्याचे बोलले जात आहे. नदी पात्रात गाळ, प्लास्टिक कचऱ्याने तुंबल्याने, नदीच्या दुर्घधीचा त्रास किनाऱ्यावरील नागरिकांना होऊ लागला. आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी नदीच्या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये. यासाठी नदीच्या साफसफाईचा निर्णय पावसाळ्यापूर्वी घेतला. उल्हासनगर रेल्वे स्टेशन, संजय गांधीनगर, रेणुका सोसायटी, वडोलगाव आदी परिसरात नदीची सफाई जेसीबी मशीनद्वारे केली जात आहे. नदीची साफसफाई झाल्यामुळे नदीच्या प्रदूषणात व दुर्घधी पसरणार नाही.

 महापालिका जेसीबी मशीनद्वारे नदीतील कचरा आणि गाळ काढत असून शहरातील सांडपाणी नदीत मिसळू नये, यासाठी मलनिसारण केंद्र उभारण्यात आले. नागरिकांनी नदी पात्रात कचरा व प्लास्टिक पिशव्या टाकू नये. असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त अजय साबळे व आरोग्य विभागाचे प्रमुख विनोद केणी यांनी दिली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर