शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात अंतर्गत नाल्यांची सफाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:39 IST

उल्हासनगर : महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील नालेसफाईला सुरुवात केली असून, एकट्या समतानगर एमजेपी ग्राउंडशेजारील नाल्यातून ३५ डंपर कचरा निघाल्याची ...

उल्हासनगर : महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील नालेसफाईला सुरुवात केली असून, एकट्या समतानगर एमजेपी ग्राउंडशेजारील नाल्यातून ३५ डंपर कचरा निघाल्याची माहिती नगरसेविका मीना सोंडे यांनी दिली, तर दुसरीकडे वालधुनी नदी स्वच्छतेच्या प्रतीक्षेत असल्याची प्रतिक्रिया उल्हास-वालधुनी नदी बिरादरीचे शशिकांत दायमा यांनी दिली.

उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यात नाले तुंबून पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात जाऊन जीवित व वित्तहानी होऊ नये, म्हणून शहरातील लहान-मोठ्या नाल्यांची सफाई दोन टप्प्यांत सुरू केली आहे. नालेसफाईचे कंत्राट दिले असून, गेल्या काही दिवसांपासून नालेसफाईला वेग आला आहे. प्रत्येक प्रभागात कंत्राटी कामगार नाल्याची सफाई करीत असून, नगरसेवक स्वतः उभे राहून कामावर लक्ष ठेवत आहेत. कॅम्प नं. ५ एमजेपी ग्राउंड येथील समतानगर, कैलासनगर येथील नाला प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, लाकडी वस्तू, दगड-मातीने तुंबला होता. नगरसेविका सोंडे यांनी नालेसफाईची मागणी केल्यावर, जेसीबीने नाल्याची सफाई केली. तब्बल ३५ डंपर कचरा नाल्यातून निघाल्याची माहिती त्यांनी दिली. शहरातील बहुतांश नाल्यांची हीच परिस्थिती असल्याची माहिती त्यांनी दिली.

शहरातील लहान-मोठ्या नाल्याची साफसफाई होत असताना वालधुनी नदीसह खेमानी व गुलशन नाल्याची सफाई कधी होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. वालधुनी नदीची सफाई वडोलगाव येथून थेट शांतीनगर, सी ब्लॉकपर्यंत करावी, अशी मागणी दायमा यांनी केली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी दुसऱ्या टप्प्यातील नाल्याची सफाई महापालिकेने सुरू करावी, असे दायमा यांनी सुचविले आहे. शहरांतर्गत नाल्याच्या सफाईतून निघालेला कचरा थेट डम्पिंगवर टाकण्याची मागणी केली जात असून, पूर्णतः नालेसफाई होत नाही तोपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी होत आहे. पावसाळ्याच्या तोंडावरही नालेसफाई केली जाणार असल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांनी दिली.

--------------------------------------------

‘वालधुनी’च्या सफाईला प्राधान्य द्या

शहराच्या मधून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या साफसफाईला प्राधान्य द्या, अशी मागणी नगरसेवक गजानन शेळके यांनी केली आहे. नदी कचऱ्याने तुंबल्यास वडोलगाव, अशोक साम्राटनगर, संजय गांधीनगर, रेणुका सोसायटी, अवधनगर, हिराघाट, शांतीनगर आदी परिसराला पुराचा धोका असतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी यापूर्वी झाली असल्याचे शेळके यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नदीच्या साफसफाईला प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी केली आहे.