शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाबाबत शेतकऱ्यांकडून मागविले आक्षेप

By admin | Updated: September 29, 2015 23:42 IST

मुंबई - बडोदा व्हाया पनवेल या द्रुतगती महामार्गासाठी पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. या संदर्भात काही आक्षेप असतील तर

वाडा : मुंबई - बडोदा व्हाया पनवेल या द्रुतगती महामार्गासाठी पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. या संदर्भात काही आक्षेप असतील तर ते लेखी स्वरूपात बाधीत शेतकऱ्यांनी सक्षम अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांकडे लेखी स्वरूपात पुराव्यासह दाखल करण्याची अधिसूचना जारी केल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. शेतकऱ्यांनी या रस्त्याला तीव्र विरोध दर्शविला असून एक इंच जमिनीलाही हात लावू देणार नाही असा गंभीर इशारा शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष कृष्णा भोईर यांनी दिला आहे. या द्रुतगती महामार्गाचे काम केंद्र सरकारने हाती घेतले असून हा रस्ता ३८० किलोमीटर अंतराचा आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू, पालघर, वसई आणि वाडा तर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यातून हा रस्ता पनवेलला जोडला जाणार आहे. वाडा तालुक्यातील निबंवली, गोराड, केळठण लोहोपे व चांबळे या गावाच्या हद्दीतून हा रस्ता जाणार असून यामुळे सुमारे दोनशे शेतकरी बाधीत होणार आहेत. या शेतकऱ्यांनी आपले आक्षेप सक्षम अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या कडे २३ दिवसात लेखी स्वरूपात करण्याची अधिसूचना जारी केल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. वाडा तालुक्यातील निबंवली गोराड हा परिसर दुर्गम म्हणून गणला जातो. यात आदिवासी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी जाणार असून त्यातील काही शेतकरी तर भूमिहीन होणार आहेत. या नियोजित रस्त्यावर येणारी अनेक घरे असून त्यांना बेघर होण्याची वेळ येणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीचीही विभागणी या रस्त्यामुळे होणार असून शेतीचे रस्तेही बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. या परिसरासाठी लोहोपे बंधाऱ्यातून शेतीसाठी पाणी घेतले जाते. या रस्त्यामुळे शेतीचे दोन भाग होऊन शेतकऱ्यांची उन्हाळी शेतीचा प्रश्न ही बिकट होणार आहे. (वार्ताहर)