शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

तीस कोटींचा नफा मिळवून टीडीसीसी बँक सुस्थितीत असल्याचा अध्यक्षांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 20:43 IST

‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुस्थितीत नाही’ या मथळ्याखाली लोकमतने १७ सप्टेंबर रोजी खासदार कपिल पाटील यांच्या ६० व्या सर्वसाधारण सभेतील भाषणाचा हवाला देऊन प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन पाटील यांनी देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये प्रथम क्रमांकाची श्रीमंत बँक म्हणून टीडीसीसी उदयाला येत असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देचार वर्षे पाच महिन्याच्या कालावधीत दोन हजार २२८ कोटी ८१ लाख रूपयांच्या ठेवी वाढल्या बँकेच्या ठेवी आधी चार हजार २७६ कोटी दोन लाखांच्या होत्यादोन हजार ५७३ कोटींची वाढ होऊन बँकेचे खेळते भांडवलते आता सात हजार ७५० कोटी १८ लाख रुपये झालेटीडीसीसी बँक देशात सर्वाधिक १५ टक्के डिव्हीडन्स सभासदांना देत असल्याचा दावा

http://www.lokmat.com/thane/thanes-tdcc-bank-not-good-repair-due-lack-cdrs/ठाणे : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेचे ४१ कोटी २९ लाखांचे भाग भांडवल असून त्यात १३ कोटी १३ लाखांची वाढ झाली. आॅगस्ट अखेर सहा हजार ५०४ कोटी ८३ लाखांच्या ठेवी आहेत यामध्ये चार वर्षे पाच महिन्याच्या कालावधीत दोन हजार २२८ कोटी ८१ लाख रूपयांच्या ठेवी वाढल्या आहेत. याशिवाय आॅगस्ट अखेर ३० कोटींचा नफा बँकेने मिळवलेला आहे. यामुळेच बँक सुस्थितीत असल्याचा दावा करून टीडीसीसी बँकचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केला.

‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुस्थितीत नाही’ या मथळ्याखाली लोकमतने १७ सप्टेंबर रोजी खासदार कपिल पाटील यांच्या ६० व्या सर्वसाधारण सभेतील भाषणाचा हवाला देऊन प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन पाटील यांनी देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये प्रथम क्रमांकाची श्रीमंत बँक म्हणून टीडीसीसी उदयाला येत असल्याचे सांगितले. २०१४ च्या ३१ मार्च अखेर बँकेचे २७ कोटी ९२ लाखाचे भाग भांडवल होते. त्यात १३ कोटी १३ लाखांची वाढ होऊन आॅगस्ट अखेर ४१ कोटी २९ लाखांचे खेळते भांडवली झाले. याप्रमाणेच तत्कालीन ६४४ कोटी ५३ लाखांच्या निधीत सुमारे साडे चार वर्षात ३०३ कोटीं १३ लाखांची वाढ होऊन आता ९४७ कोटी ६६ लाख रूपयांचा बँकेचा निधी झाला आहे.बँकेच्या ठेवी आधी चार हजार २७६ कोटी दोन लाखांच्या होत्या. त्यात दोन हजार २२८ कोटी ८१ लाखांची वाढ होऊन आता सुमारे साडे चार वर्षात सहा हजार ५०४ कोटी ८३ लाखांच्या ठेवी आहेत. बँकेने दोन हजार ८२२ कोटी ५३ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. आधी ते केवळ दोन हजार २३ कोटी ५७ लाख होते. त्यामध्ये आतापर्यंत ७९९ कोटींची वाढ झाल्याचेत्यांनी सांगितले. बँकेचे खेळते भांडवल आधी केवळ पाच हजार १७७ कोटी नऊ लाख रूपये होते. त्यात दोन हजार ५७३ कोटींची वाढ होऊन बँकेचे खेळते भांडवलते आता सात हजार ७५० कोटी १८ लाख रुपये झाले आहे. सध्याचार हजार २५५ कोटी ५१ लाखांची बँकेची गुंतवणूक आहे. ती सुमारे साडे चार वर्षापूर्वी दोन हजार ६४६ कोटी ६१ लाख होती, असे पाटील यांनी नमूद केले.बँकेचा नफा सुमारे साडेचार वर्षांपूर्वी ३२ कोटी ४० लाखांचा होता. तो आता ३० कोटीं असल्याचे पाटील यांनी सांगितले. बँकेच्या सीडी रेशो मार्चअखेर ३२.३५ टक्के होता, आॅगस्ट अखेर ४३.३९ टक्के असून पाच महिन्यामध्ये बँकेच्या सीडीरेशोमध्ये ११.०४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या सभासदांना मिळणाऱ्या डिव्हीडन्सच्या तुलनेत टीडीसीसी बँक देशात सर्वाधिक १५ टक्के डिव्हीडन्स सभासदांना देत असल्याचा दावाही पाटील यांनी केला........................

 

टॅग्स :thaneठाणेBanking Sectorबँकिंग क्षेत्र