शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

आयुक्त रवींद्रन यांच्या पाठिंब्याकरिता नागरिक आग्रही

By admin | Updated: January 11, 2016 01:54 IST

कल्याणमधील एका हॉटेलच्या शेडचे अनधिकृत बांधकाम तोडण्यास आमदार गणपत गायकवाड यांच्या विनंतीवरून यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली

अनिकेत घमंडी, डोंबिवली कल्याणमधील एका हॉटेलच्या शेडचे अनधिकृत बांधकाम तोडण्यास आमदार गणपत गायकवाड यांच्या विनंतीवरून यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती व आता रस्ता रुंदीकरणाच्या कारवाईत मुख्यमंत्री कार्यालयाकडून हस्तक्षेप केला गेला, अशी चर्चा आहे. त्याचवेळी केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांच्या बदलीची चर्चा सुरु झाल्याने आयुक्तांच्या पाठिंब्याचे व मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील सूर उमटू लागले आहेत.शुक्रवारी कल्याणमधील कारवाई स्थगित झाल्यानंतर शनिवारपासून आयुक्त रवींद्रन यांच्या बदली संदर्भातील मेसेज व्हायरल होऊ लागले. त्यामुळे सर्वसामान्य कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये राज्य शासनाच्या दुटप्पी भूमिकेबाबत तिखट प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. सपोर्ट ई.रवींद्रन असे मेसेज आयुक्तांच्या फोटोसह रविवारी व्हायरल झाले.आठ वर्षांनी महापालिकेला आयएएस दर्जाचा आयुक्त मुख्यमंत्री फडवणीस यांनीच दिला तर मग आता त्यांना काम करु द्या, शहराला शिस्त लावायची असेल तर असे निर्णय घ्यावेच लागतील. फडणवीसांनी आयुक्तांच्या कामात हस्तक्षेप करु नये व रवींद्रन यांना त्यांचा कार्यकाल पूर्ण करु द्यावा, त्यांना शहरे सुधारु द्यावीत. या शहरांना जो बकालपणा आला आहे, त्याला शिस्त लागायलाच हवी, अशा कठोर शब्दांत नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. व्यापाऱ्यांची भेट घेऊन कारवाई रोखण्याकरिता आग्रह धरणारे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचा निषेध व्यक्त केला जात आहे. यापूर्वी कल्याणमधील एका हॉटेलची अनधिकृत शेड हटवण्याच्या मुद्यावरुन आमदार गणपत गायकवाड यांच्या मध्यस्थीमुळे मुख्यमंत्र्यांच्या दालनातून स्थगिती आदेश आला होता. त्यावरुनही बरेच वादंग झाल्यावर त्यांनी तो मागे घेतला. आता मेहतांच्या सांगण्यावरुन अनधिकृत बांधकामावरील कारवाईचा पोलीस बंदोबस्त काढून घेतला गेला. भाजपाच्याच आमदारांसह विभाग अध्यक्ष खासदार कपिल पाटील यांची या संपूर्ण प्रकरणात कात्रीत सापडल्याची स्थिती आहे. आमदार नरेंद्र पवार, आणि खा. पाटील यांनी फडणवीसांच्या या निर्णयाबाबत जाहीर बोलणे टाळले.शिवसेना सध्या कुंपणावर बसून सर्व परिस्थिती पाहत आहे. मनसेची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही. शिवसेनेने त्यांची भूमिका स्पष्ट करावी असे, मनसेचे नेते सांगत आहेत. त्याचवेळी दत्तनगर बालमित्र मंडळ या संस्थेने सोमवारी ११ जानेवारी रोजी सकाळपासून रामनगर तिकीट खिडकीपाशी रवींद्रन यांच्या पाठिंब्याकरिता स्वाक्षरी मोहीम राबवण्याचे ठरवले आहे.