शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

विकासासाठी नागरिक-प्रशासन-सत्ताधारी एकवटावेत

By admin | Updated: November 14, 2015 23:42 IST

शिवसेना पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षातील सर्वांच्या सहकार्याने महापौरपद मिळाले. आता ते सार्थ ठरवणे, ही मोठी जबाबदारी आहे.

* महापौरपद तर मिळाले, आता पुढील अजेंडा काय ?शिवसेना पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षातील सर्वांच्या सहकार्याने महापौरपद मिळाले. आता ते सार्थ ठरवणे, ही मोठी जबाबदारी आहे. सर्वात आधी स्वच्छतेवर भर देण्याचा मानस आहे. धूळ आणि कचरामुक्त शहर करणे, हे आवश्यक आहे. कचऱ्याच्या समस्येमुळे न्यायालयाने महापालिकेला फटकारले आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्याला प्राधान्य असेल. त्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहेच. आयएएस आयुक्त आहेतच. खरे तर, हीच काय पण या महानगरांमधील कोणतीही समस्या सोडवायची असेल तर नागरिक-प्रशासन-लोकप्रतिनिधी या त्रिसूत्रीच्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. या घटकांची सांगड घालणे, हे माझे (पदाचे) कार्य मी मानतो. त्यामुळे एकच अजेंडा नाही तर प्राधान्यक्रम ठरवून कचरा, रस्ते (काँक्रिटीकरण-डांबरीकरण), धूळ-प्रदूषणमुक्त शहरे करणे, पाणीसमस्या सोडवणे, फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी, भाजी मंडई, मच्छी मार्केट यासह मोकळे पदपथ आदींसह वाहतूक, सुरक्षा हेदेखील प्रश्न मार्गी लावावे लागणार आहेत.* आॅक्टोबर-नोव्हेंबरपासूनच पाणीसमस्या भेडसावतेय, त्याचे काय? यंदा पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे सर्वत्र ही समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी नागरिकांनीही जपून पाणी वापरावे. प्रशासनानेही पाणीगळती रोखण्यावर भर द्यावा. तसेच लोकप्रतिनिधींनीही पाणीचोरी होणार नाही, यासाठी प्रभागात लक्ष द्यावे. सर्वांनाच पाणी वाचवा... हे आवाहन आहे.* रखडलेल्या प्रकल्पांचे काय? जे प्रकल्प रखडले आहेत, ते पूर्ण करावेच लागतील. त्यात बीएसयूपी, गोविंदवाडी बायपास, डोंबिवली-ठाकुर्ली आरओबी, कचऱ्याचा प्रकल्प, नव्या बांधकामांना परवानगी संदर्भातील प्रश्न, ठिकठिकाणचे काँक्रिटीकरण-डांबरीकरण आदी निश्चितच केले जाईल. त्याची पूर्तता झाल्यावर नव्या प्रस्तावांचा विचार करू. * ६ हजार ५०० कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय? मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे, म्हणजे ते मिळतीलच. त्यासाठी महापौर-उपमहापौर यासह विविध समित्या गठीत झाल्यावर सर्वांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाणार. त्या पॅकेजमधील अधिकाधिक निधी लवकरात लवकर मिळवून विकासकामांचा शुभारंभ करणे, वेळेत त्यांची पूर्तता करण्यावर भर देणार. २७ गावांमध्ये पायाभूत सुविधा देण्यासह नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठीही प्रयत्न केले जातील. * प्रदूषण समस्येवर काय उपाययोजना करणार ?केंद्रासह राज्य शासन डोंबिवलीतील प्रदूषणासंदर्भात गांभीर्याने विचार करत आहे. त्यामुळे त्यांना आवश्यक असलेली सर्वतोपरी मदत केली जाईल. तसेच कल्याणातील वालधुनी प्रदूषण सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार. प्रदूषण नियंत्रण मंडळासह संबंधित मंत्र्यांकडे यासंदर्भात पाठपुरावा सुरू करणार. * केडीएमटीचा दर्जा सुधारणे, रिक्षाचालकांची मनमानी कशी रोखणार ?नागरिकांच्या दृष्टीने रिक्षा पर्यायीच नव्हे तर ती आवश्यक सुविधा आहे. पण, मनमानी करणाऱ्यांवर निश्चितच चाप लावणार. महापालिका परिवहन सेवेबाबत अंतर्गत रस्त्यांवर ती धावणे यासह जास्तीतजास्त लोकाभिमुख सेवा देण्याचा प्रयत्न करणार. * आरोग्यासह सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आली आहे, त्याचे काय? बरोबर आहे, त्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये जी रिक्त पदे आहेत ती भरणे, ती प्रक्रिया होत नाही तोपर्यंत खाजगी तत्त्वावर ती सेवा तत्काळ पुरवणे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षेसंदर्भात पोलीस यंत्रणेला महापालिकेकडून जे सहकार्य हवे आहे, ते निश्चितच मिळेल, पण ती सर्वतोपरी जबाबदारी गृहखात्याची आहे.