शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

विकासासाठी नागरिक-प्रशासन-सत्ताधारी एकवटावेत

By admin | Updated: November 14, 2015 23:42 IST

शिवसेना पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षातील सर्वांच्या सहकार्याने महापौरपद मिळाले. आता ते सार्थ ठरवणे, ही मोठी जबाबदारी आहे.

* महापौरपद तर मिळाले, आता पुढील अजेंडा काय ?शिवसेना पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षातील सर्वांच्या सहकार्याने महापौरपद मिळाले. आता ते सार्थ ठरवणे, ही मोठी जबाबदारी आहे. सर्वात आधी स्वच्छतेवर भर देण्याचा मानस आहे. धूळ आणि कचरामुक्त शहर करणे, हे आवश्यक आहे. कचऱ्याच्या समस्येमुळे न्यायालयाने महापालिकेला फटकारले आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्याला प्राधान्य असेल. त्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहेच. आयएएस आयुक्त आहेतच. खरे तर, हीच काय पण या महानगरांमधील कोणतीही समस्या सोडवायची असेल तर नागरिक-प्रशासन-लोकप्रतिनिधी या त्रिसूत्रीच्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. या घटकांची सांगड घालणे, हे माझे (पदाचे) कार्य मी मानतो. त्यामुळे एकच अजेंडा नाही तर प्राधान्यक्रम ठरवून कचरा, रस्ते (काँक्रिटीकरण-डांबरीकरण), धूळ-प्रदूषणमुक्त शहरे करणे, पाणीसमस्या सोडवणे, फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी, भाजी मंडई, मच्छी मार्केट यासह मोकळे पदपथ आदींसह वाहतूक, सुरक्षा हेदेखील प्रश्न मार्गी लावावे लागणार आहेत.* आॅक्टोबर-नोव्हेंबरपासूनच पाणीसमस्या भेडसावतेय, त्याचे काय? यंदा पाऊस कमी झाला आहे, त्यामुळे सर्वत्र ही समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी नागरिकांनीही जपून पाणी वापरावे. प्रशासनानेही पाणीगळती रोखण्यावर भर द्यावा. तसेच लोकप्रतिनिधींनीही पाणीचोरी होणार नाही, यासाठी प्रभागात लक्ष द्यावे. सर्वांनाच पाणी वाचवा... हे आवाहन आहे.* रखडलेल्या प्रकल्पांचे काय? जे प्रकल्प रखडले आहेत, ते पूर्ण करावेच लागतील. त्यात बीएसयूपी, गोविंदवाडी बायपास, डोंबिवली-ठाकुर्ली आरओबी, कचऱ्याचा प्रकल्प, नव्या बांधकामांना परवानगी संदर्भातील प्रश्न, ठिकठिकाणचे काँक्रिटीकरण-डांबरीकरण आदी निश्चितच केले जाईल. त्याची पूर्तता झाल्यावर नव्या प्रस्तावांचा विचार करू. * ६ हजार ५०० कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय? मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे, म्हणजे ते मिळतीलच. त्यासाठी महापौर-उपमहापौर यासह विविध समित्या गठीत झाल्यावर सर्वांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाणार. त्या पॅकेजमधील अधिकाधिक निधी लवकरात लवकर मिळवून विकासकामांचा शुभारंभ करणे, वेळेत त्यांची पूर्तता करण्यावर भर देणार. २७ गावांमध्ये पायाभूत सुविधा देण्यासह नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठीही प्रयत्न केले जातील. * प्रदूषण समस्येवर काय उपाययोजना करणार ?केंद्रासह राज्य शासन डोंबिवलीतील प्रदूषणासंदर्भात गांभीर्याने विचार करत आहे. त्यामुळे त्यांना आवश्यक असलेली सर्वतोपरी मदत केली जाईल. तसेच कल्याणातील वालधुनी प्रदूषण सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार. प्रदूषण नियंत्रण मंडळासह संबंधित मंत्र्यांकडे यासंदर्भात पाठपुरावा सुरू करणार. * केडीएमटीचा दर्जा सुधारणे, रिक्षाचालकांची मनमानी कशी रोखणार ?नागरिकांच्या दृष्टीने रिक्षा पर्यायीच नव्हे तर ती आवश्यक सुविधा आहे. पण, मनमानी करणाऱ्यांवर निश्चितच चाप लावणार. महापालिका परिवहन सेवेबाबत अंतर्गत रस्त्यांवर ती धावणे यासह जास्तीतजास्त लोकाभिमुख सेवा देण्याचा प्रयत्न करणार. * आरोग्यासह सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आली आहे, त्याचे काय? बरोबर आहे, त्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये जी रिक्त पदे आहेत ती भरणे, ती प्रक्रिया होत नाही तोपर्यंत खाजगी तत्त्वावर ती सेवा तत्काळ पुरवणे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षेसंदर्भात पोलीस यंत्रणेला महापालिकेकडून जे सहकार्य हवे आहे, ते निश्चितच मिळेल, पण ती सर्वतोपरी जबाबदारी गृहखात्याची आहे.