शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

सिटी कमांड सेंटर ठरणार स्मार्ट सिटीतील कळीचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:42 IST

दक्षिण कोरियाच्या स्मार्ट सिटीत पोलीस, आरोग्य, अग्निशमन दल सिटी कमांड सेंटरशी जोडलेले आहेत. या सेंटरद्वारे आपत्कालीन परिस्थितीत त्यांना निरोप मिळतो आणि त्यांचे काम सुरू होते.

मुरलीधर भवारकल्याण : दक्षिण कोरियाच्या स्मार्ट सिटीत पोलीस, आरोग्य, अग्निशमन दल सिटी कमांड सेंटरशी जोडलेले आहेत. या सेंटरद्वारे आपत्कालीन परिस्थितीत त्यांना निरोप मिळतो आणि त्यांचे काम सुरू होते. कोरियन कंपनीच्या साह्याने कल्याण-डोंबिवलीही असे सिटी कमांड सेंटर उभे राहू शकते. त्याची पाहणी खुद्द महापौर राजेंद्र देवळेकर आणि विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी नुकतीच केली. कल्याण-डोंबिवली ही शहरे स्मार्ट करण्यात दक्षिण कोरियाने रस दाखवला असून तब्बल दोन हजार कोटींच्या गुंतवणुकीची तयारी दाखवली आहे.शहर स्मार्ट होणार म्हणजे नेमके काय याची माहिती घेण्यासाठी, तसेच पालिकेने सापर्डे येथे ठरवलेले स्मार्ट शहर कसे असू शकेल याचे चित्र पाहण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्त्वाचा होता. सापर्डे येथे ७५० एकर जागेवर स्मार्ट सिटी प्रकल्प उभा राहणार आहे.कल्याण-डोंबिवलीची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झाल्यावर दक्षिण कोरियातील कंपनीशी एप्रिल महिन्यात सामंजस्य करार झाला. त्यानंतर तेथील विकास प्रदर्शनाला भेट देण्यासाठी महापौर राजेंद्र देवळेकर आणि विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी दौरा केला. त्या स्मार्ट सिटीतील काही प्रकल्प कल्याण-डोंबिवलीत उभारणे शक्य असल्याचे मत त्यांनी मांडले. कोरियात ३२ चौरस कि. मी. च्या परिसरात स्मार्ट सिटी उभारण्याचे काम सुरु आहे. त्यापैकी नऊ चौरस कि. मी. च्या परिसरात पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. तेथे बस स्टॉपवर उभे राहिल्यावर किती वेळात बस येईल, याची माहिती व्हॉटस्अ‍ॅपवर दिली जाते. त्या क्षणी ती बस कोणत्या स्टॉपवर आहे. तिला किती वेळ लागेल, याची माहिती मिळते, असे उदाहरण देवळेकर यांनी दिले. गरीब व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी या स्मार्ट सिटीत घरे आहेत. ती भाड्याने, विकतही घेता येऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.विरोधी पक्षनेते हळबे यांनीही सिटी कमांड सेंटरबद्दल चांगले मत मांडले. त्यामुळे आपत्त्कालीन व्यवस्थापन चांगले होऊ शकते. आपल्याकडे नागरीकरण वाढल्यावर विकासाचा विचार केला जातो. कोेरियात हेच चित्र उलट्या स्वरुपात पाहावयास मिळते. आधी पायाभूत सुविधांचे जाळे विणून झाल्यावर नंतर शहरविकास व इमारत बांधण्याचे काम हाती घेतले जाते. त्यांनी ३२ चौरस किलोमीटर क्षेत्रात स्मार्ट सिटीचे काम सुरु केले आहे. त्यापैकी नऊ चौरस कि. मी. मध्ये काम पूर्ण झाले. त्याच धर्तीवर आपल्याकडे सापर्डे शहर विकसित करता येऊ शकते, असे त्यांनी सुचवले.सध्याची स्थिती काय?स्मार्ट सिटीत कल्याण-डोंबिवलीची निवड आॅगस्ट २०१६ ला झाली. पण गेल्या वर्षांत पाचच बैठका झाल्या. त्यावर एमएमआरडीएचे नियंत्रण आहे. केंद्र व राज्य सरकारकडून पालिकेस दोन टप्प्यात निधी आला. स्मार्ट सिटीचा आराखडा तयार करताना पालिकेने एरिया बेस व पॅन सिटी अशा दोन भागात दोन हजार ३०० कोटींचा आराखडा तयार केला. त्यात २८ प्रकल्प आहेत. साडेतीन वर्षात ते उभारायचे आहेत. पण त्यातील एकही सुरू झालेला नाही. या प्रकल्पांत स्थानिक अधिकाºयांना रस नाही.