शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

नगररचनाकाराविना विभाग ठप्प

By admin | Updated: April 19, 2017 00:24 IST

नगररचनाकारविना विभागाचे काम ठप्प झाले आहे. नगररचनाकार संजीव करपे बेपत्ता झाल्यापासून विभागाला नगररचनाकारच मिळालेला नाही

उल्हासनगर : नगररचनाकारविना विभागाचे काम ठप्प झाले आहे. नगररचनाकार संजीव करपे बेपत्ता झाल्यापासून विभागाला नगररचनाकारच मिळालेला नाही. त्यामुळे विभागाचे कोटयावधीचे उत्पन्न बुडत असून बांधकाम प्रस्ताव धूळखात आहेत. उल्हासनगर नगररचनाकार विभाग नेहमी वादात राहिला आहे. यापूर्वीच्या अनेक नगररचनाकारांना जेलची हवा खावी लागली असून एक जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात सापडला. तर नगररचनाकार करपे नऊ महिन्यांपासून बेपत्ता आहेत. मुख्यमंत्र्यानी चौकशीचे आदेश दिल्यानंतरही करपे यांचा ठावठिकाणा लागला नसल्याने कुटुंब मानसिक तणावाखाली आहेत. राजकीय दबावामुळे ते प्रतिक्रीया देण्यास धजावत नाही. करपे यांनी एका आठवडयात तब्बल ३८ बांधकाम परवाने दिल्याने वादात सापडले होते. पालिकेने सर्व बांधकाम परवान्यांची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.करपे बेपत्ता झाल्यानंतर विभागाला पूर्णवेळ नगररचनाकार मिळाला नाही. येथे येण्यास कुणीही धजावत नसल्याचे बोलले जाते. विभागाचा कारभार चालविण्यासाठी मिलिंद सोनावणी यांना प्रभारी नगररचनाकारपदाचा पदभार दिला. मात्र ते नावालाच नगररचनाकार असून एकाही बांधकाम परवान्यावर सही केलेली नाही, अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. तत्कालिन नगररचनाकार गुडगुळे यांच्या कालावधीतील ११० बांधकामे परवान्यासह तब्बल २५० पेक्षा जास्त परवाने वादात सापडले. बिल्डरांनी बांधकामे पूर्ण करून त्यातील ९० टक्के बांधकामाची विक्री पूर्णत्वाच्या दाखल्यासह इतर दाखले न घेता केली आहे. नगररचनाकार विभागाचा अंकुश नसल्याने सर्रास वाढीव बांधकामे केली आहेत. तसेच शहरात मोठ्या संख्येने बेकायदा बांधकामही जोरात सुरू असून पालिका निवडणुकीच्याकाळात त्याला अधिक जोर आला होता. (प्रतिनिधी)