शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

तलावांच्या संवर्धनासाठी नागरिकांनी एक पाऊल पुढे टाकावे - नूतन बांदेकर

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: November 5, 2023 15:54 IST

पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 'माझा तलाव' मोहीम सुरू करण्यात आलेली आहे.

ठाणे : गेल्या अनेक शतकांचा समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठाण्याची ओळख तलावांचे शहर अशी होती. मात्र आजच्या समृद्ध ठाणे शहराची ही ओळख पुसली जातेय की काय? असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. ती ओळख जपायची असेल तर ठाणेकर नागरिकांनी तलावांच्या संवर्धनासाठी स्वतः एक तरी पाऊल उचलणे गरजेचे आहे." असे लेखिका नूतन बांदेकर यांनी रसिक वाचक समूहाच्या पुस्तक परिचय कार्यक्रमात बोलताना सांगितले.

पुढे त्या म्हणाल्या की 'ठाणे तेथे काय उणे' असे असले तरी समृद्ध असलेल्या आजच्या नव्या ठाण्यात अनेकांना ही ओळख माहीतही नाही. ६० पेक्षा अधिक तलाव असलेल्या ठाण्यात आज प्रत्यक्ष किती तलाव आहेत हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी तलावांची शोध मोहीम सुरू झाली आणि त्या प्रवासात अखंडपणे ४२ तलावांची शब्दचित्रे रेखाटली गेली. त्यांचेच पुस्तकरूपात एकत्रीकरण झाले. तलावांच्या शोध मोहीमेदरम्यानचे अनेक प्रसंग, अडचणी आणि चांगले अनुभव याबद्दल माहिती देताना त्या म्हणाल्या की प्रत्येक तलावाची एक कथा आहे, एक व्यथा आहे. ती समजून घेण्यासाठी किमान आपल्या जवळच्या तलावाला भेट देऊन त्याला जाणून घेणे आवश्यक आहे.

यासाठी पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 'माझा तलाव' मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. त्यात सर्व पर्यावरण प्रेमी आणि ठाणेकर जनतेने सहभागी होऊन तलाव संवर्धनासाठी आपले योगदान दिले पाहिजे. त्यामध्ये प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या जवळच्या तलावाची ओळख करून देण्यात येत आहे. पुढच्या पिढीला पर्यावरण संवर्धनाचे धडे आतापासूनच दिले जावेत आणि ठाणे शहरातील तलावांचे भविष्य जपले जावे. असा महत्त्वाचा विचार माझा तलाव मोहिमेमागे आहे. तसेच 'सफर तलावांची' ही दोन भागांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या तलावांच्या सहलीविषयी देखील त्यांनी माहिती दिली. रसिक वाचक समूह आयोजित या पुस्तक परिचय व्याख्यान मालेतील आजचे ७६ वे पुष्प ऑनलाईन पद्धतीने गुंफले. समूहाचे प्रतिनिधी भूषण मुळ्ये यांनी, लेखिका बांदेकर यांचे आभार मानले.

टॅग्स :thaneठाणे