शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

महापालिकेच्या ‘पर्यावरण रक्षक’ उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:51 IST

५७९९ पैकी १४२९ गणेश व गौरी मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा भाईंदर महानगरपालिकेने ...

५७९९ पैकी १४२९ गणेश व गौरी मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरा रोड : मीरा भाईंदर महानगरपालिकेने ४ कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनासाठी नागरिकांनी प्राधान्य द्यावे यासाठी ‘पर्यावरण रक्षक’ म्हणून प्रमाणपत्र देण्याचा सुरू केलेल्या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी एकूण ५७९९ गणेश व गौरी मूर्तींपैकी १४२९ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन केल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी गणरायाच्या ५५८४ व २१५ गौरी-मूर्तींचे विसर्जन शहरातील तलाव, खाडी व समुद्र किनारे तसेच कृत्रिम तलावात संपन्न झाले. यंदा तलावांचे जलप्रदूषण व पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्याकरिता महापालिका प्रशासनास सहकार्य करून नागरिकांना कृत्रिम तलावांत गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करणाऱ्या नागरिकांना ‘पर्यावरण रक्षक’ म्हणून प्रशस्तिपत्र महापालिकेच्या वतीने देण्यास सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाला प्रतिसाद देत एकूण १४२२ गणेश व सात गौराई मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनीही त्यांच्या घरच्या गौरीच्या मूर्तीचे विसर्जन नवघर येथील कृत्रिम तलावात केले. कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करणाऱ्या नागरिकांना आयुक्त दिलीप ढोले तसेच अन्य अधिकारी आदींच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा सन्मान केला गेला. सर्वांनी श्रीगणेश विसर्जनासाठी केलेल्या सहाकार्याबद्दल आभार व्यक्त करून यापुढेही विसर्जनाच्या वेळी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे.