शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तातडीच्या कामाशिवाय नागरिकांना प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:42 IST

भाईंदर : कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मीरा- भाईंदर महापालिका कार्यालयात केवळ तातडीच्या कामाशिवाय नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला ...

भाईंदर : कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मीरा- भाईंदर महापालिका कार्यालयात केवळ तातडीच्या कामाशिवाय नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. परंतु नगरसेवकांसोबत येणारे तसेच राजकारणी, कंत्राटदार आदींना ही प्रवेश बंदी असणार का ? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

मीरा- भाईंदरमध्ये कोरोना संसर्गाचा कहर उफाळून आला आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. परंतु अत्यावश्यक कामांसाठी व तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांना सरसकट बंदी घातल्याने टीकेची झोड उठली. त्यातूनच आता पालिकेने नागरिकांना तातडीच्या कामासाठी पालिकेत प्रवेश देण्यास मोकळीक दिली आहे. ज्या विभागामध्ये तातडीचे काम आहे त्या विभाग प्रमुखाने मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकाकडे प्रवेश पासची व्यवस्था करायची आहे असे परिपत्रक उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी सर्व विभाग प्रमुखांसह पदाधिकारी आदींना पाठवले आहे.

नागरिकांना तातडीच्या कामाव्यतिरिक्त प्रवेश बंदी करताना पालिकेत नगरसेवक त्यांच्या सोबत अनेकांना घेऊन जातात. काही राजकीय नेते, पदाधिकारीही बेधडक पालिका कार्यालयात ठाण मांडतात. कंत्राटदार तसेच स्वतःची व्यक्तिगत कामे नसताना पालिकेत फिरणारे दलाल प्रवृत्तींना रोखणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.