शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
4
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
5
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
6
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
7
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
8
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
9
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
10
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
11
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
12
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
13
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
15
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
16
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
17
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
20
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव

पावसाच्या ‘पहिल्या लाटे’ने शहरे लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:27 IST

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांना मंगळवारी रात्रीपासून झालेल्या जोरदार पावसाने धुवून काढले. पहिल्याच पावसाने नालेसफाईचे पोकळ दावे ...

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांना मंगळवारी रात्रीपासून झालेल्या जोरदार पावसाने धुवून काढले. पहिल्याच पावसाने नालेसफाईचे पोकळ दावे फोल ठरले. शहरांच्या सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीमुळे कावलेल्या ठाणेकरांना हवेत आलेल्या गारव्याने दिलासा दिला. ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. मात्र, सध्या प्रवाशांची संख्या कमी असल्याने लोकल गोंधळाचा फार मोठ्या प्रवासी संख्येला फटका बसला नाही. मुंब्रा, उल्हासनगर, अंबरनाथ, आदी शहरांत भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. उल्हासनगरात दुर्घटनेत महिला जखमी झाली.

ठाण्यात ४७ ठिकाणी पाणी साचले होते, तर दिव्यात अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. रस्त्यांवरही पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झाली होती. ठाणे महापालिका आयुक्तांसह अन्य शहरातील प्रशासनाने नालेसफाईची कामे समाधानकारक झाल्याचा केलेला दावा पहिल्याच पावसाने फोल ठरविला. ठाणे शहरात नऊ तासांत ११७.६१ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. बुधवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे ठाणे शहरात भूस्खलन आणि संरक्षक भिंती कोसळण्याच्या चार घटना घडल्या. यामध्ये काही वाहनांचे नुकसान झाले. रेल्वे वाहतूक सर्वसामान्य प्रवाशांना बंद असल्याने रस्तेमार्गे मुंबई गाठणाऱ्या वाहनांची ठाण्यातील आनंद नगर टोलनाक्यासह शहराच्या इतर भागातही गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. माजिवडा ते कँडबरी मार्गावरील वाहतूककोंडी झाली होती. विटावा सबवे येथे पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. घोडबंदर रोडवर मेट्रोची कामे सुरू असल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.

हवामान खात्याने महाराष्ट्रासह मुंबई ठाणे किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मंगळवारी रात्रीपासूनच विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटसह पावसाला सुरुवात झाली. बुधवारी सकाळपासून विविध भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. पावसाचा जोर दुपारनंतर वाढला. दुपारी १.२० वाजता खाडीत ३.८३ मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याने पालिकेच्यावतीने सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सुदैवाने यावे‌ळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. पावसामुळे पनवेल- कळवा रोड, रेहमानिया सर्कल येथे, तर मुंब्रा बायपास या दोन ठिकाणी भूस्खलन झाले. ठाण्यातील सावरकर नगर पंचामृत सोसायटी येथे संरक्षक भिंत कोसळली. मनोरमा नगर स्वामी समर्थ फेज-एक येथेदेखील संरक्षक भिंत तीन ते चारचाकी वाहनांवर कोसळल्याने त्यांचे नुकसान झाले. गटाराचे नियोजन नसल्याने दिवा शहरात अनेक घरांत गटाराचे आणि नाल्यांचे पाणी शिरून दुर्गंधी पसरली होती. दिवा शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत; मात्र पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारांचे नियोजन नसल्याने बैठ्या चाळीत सांडपाणी शिरले. दिवा-आगासन रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. दिव्यातील नालेसफाईची चौकशी करण्याची मागणी भाजपचे रोहिदास मुंडे यांनी केली. सहा ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. चार ठिकाणी वृक्ष धोकादायक स्थितीत असल्याचे आढळले.

............

पाणी साचले ४७ ठिकाणी

ठाणे शहरात पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई केल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला. मात्र, तो फोल ठरला. कोपरी येथील टीएमटी बस स्थानक परिसर, विठ्ठल मंदिल खारेगाव, कोपरी पोलीस ठाणे आनंद नगर, राम मारुती रोड, मांसुदा तलाव परिसर, गडकरी रंगायतन, ऊर्जिता हॉटेल कोर्ट नाका, इंदिरा नगर, काजूवाडी, म्हाडा कॉलनी सावरकर नगर, वर्तकनगर, गावदेवी मंदिर कळवा, महागिरी कोळीवाडा, आदी ४७ ठिकाणी पाणी साचले. पालिकेने संभाव्य पाणी साचण्याची १४ ठिकाणे असल्याचे जाहीर केले होते.

............

वाचली