शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

"उल्हासनगरातील धोकादायक इमारत पुनर्बांधणीचे परिपत्रक तयार, दिवाळीत मिळणार गोड बातमी"

By सदानंद नाईक | Updated: October 22, 2022 18:04 IST

उल्हासनगरातील अवैध बांधकामे नियमित करण्याचा अध्यादेश शासनाने काढूनही काही तांत्रिक तुटीमुळे अध्यादेशची काम ठप्प पडले. तसेच धोकादायक इमारतीचे स्लॅब पडण्याचे सत्र सुरू असून स्लॅब पडून अनेकांचा जीव गेला आहे.

उल्हासनगर - शहरातील अवैध बांधकामे नियमित करणे, धोकादायक इमारतीची पुनर्बांधणीचे शासन परिपत्रक तयार असून ऐन दिवाळीत शहरवासीयांना गोड बातमी मिळणार असल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली. त्यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शहरातील समस्या बाबत चर्चा केली.

उल्हासनगरातील अवैध बांधकामे नियमित करण्याचा अध्यादेश शासनाने काढूनही काही तांत्रिक तुटीमुळे अध्यादेशची काम ठप्प पडले. तसेच धोकादायक इमारतीचे स्लॅब पडण्याचे सत्र सुरू असून स्लॅब पडून अनेकांचा जीव गेला आहे. धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणी बाबत शासन एका समिती स्थापन केली. समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अहवाल दिला असून अहवालाची तपासणी एका समिती कडून होत आहे. पावसाळी अधिवेशनात धोकादायक इमारती बाबत परिपत्रक लवकरच प्रसिद्ध करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले होते. दिवाळीत परिपत्रक येणार म्हणून नागरिकांचे लक्ष लागले आहे. धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या हजारो जणांना परिपत्रकामुळे दिलासा मिळणार आहे. 

आमदार कुमार आयलानी यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन धोकादायक इमारत पुनर्बांधणी बाबत परिपत्रक प्रसिद्ध करण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री यांनी परिपत्रक तयार असून उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून प्रसिद्ध (जी आर) करणार आहे असे आश्वासन दिल्याची माहिती आयलानी यांनी दिली. ऐन दिवाळीत शहरवासीयांना गोड बातमी मिळणार असल्याचे आयलानी म्हणाले. त्याच बरोबर अवैध बांधकाने नियमित करण्याची प्रक्रियाही सुरू होणार असल्याची माहिती आयलानी यांनी दिली. शहरातील मुख्य रस्त्याचा एमएमआरडीए अंतर्गत पुनर्बांधणी करण्याची मागणी करून रस्त्याची यादी मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती आमदार यांनी दिली. १० ते १२ रस्त्याच्या विकासाला एमएमआरडीए अंतर्गत निधी मिळण्याचे संकेत मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. त्यामुळे येत्या काही महिन्यात शहरात विकास कामाला गती येणार असल्याचे आयलानी यांचे म्हणणे आहे. 

दिवाळीत गोड बातमी मिळू दे

शहरात धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर येऊन हजारो नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. आमदार कुमार आयलानी यांच्या मुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या मागणीला यश येऊन, दिवाळीत नागरिकांना परिपत्रक प्रसिद्ध केल्याची गोड बातमी मिळू दे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी पक्षाचे नेते भारत गंगोत्री यांनी दिली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेulhasnagarउल्हासनगर