शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

नगराध्यक्षाच्या निवडीचा घोळ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:51 IST

शासन निर्णयाचे काय? : निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतेही आदेश नाहीत

पंकज पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ/ बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी एक सदस्य पद्धतीने निवडणूक होणार, हे निश्चित झाले असले तरी अजूनही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत संभ्रम कायम आहे. याबाबत निवडणूक आयोगाचा कोणताही आदेश अद्याप आलेला नाही. राज्य शासनाने कॅबिनेटच्या बैठकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक नागरिकांमधून न घेता नगरसेवकांमधून घेण्याचे निश्चित केले असले, तरी ते आदेश निवडणूक आयोगामार्फत पालिकेला मिळालेले नाहीत. त्यामुळे नगराध्यक्षांची निवडणूक जनतेतून होणार की नगरसेवकांमधून, याबाबत संभ्रम कायम आहे.

राज्य शासनाने नगर परिषदेमधील नगरसेवकांची निवडणूक ही एक सदस्य पद्धतीने घेण्याबाबत निर्णय घेतला आणि तो निर्णय निवडणूक आयोगाने मान्यदेखील केला. २७ जानेवारीला हा आदेश काढण्यात आल्यानंतर त्यानुसार निवडणूक आयोगाने नवीन आदेश काढून आरक्षण सोडतही निश्चित केली.त्यामुळे बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही नगर परिषदांची निवडणूक ही एक सदस्य पद्धतीने होणार हे निश्चित झाले आहे. मात्र, नगराध्यक्षपदाची निवडणूक ही जनतेतून होणार की नगरसेवकांमधून, याबाबत कोणताही स्पष्ट आदेश निवडणूक आयोगामार्फत अद्याप आलेला नाही.

राज्य शासनाने कॅबिनेटच्या बैठकीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत निर्णय घेत नगरसेवकांमधून नगराध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तो निर्णय निवडणूक आयोगाने स्वीकारणे आणि त्यांच्यामार्फत नगर परिषदेला निर्देश जाणे, हे अद्याप निश्चित केलेले नाही.शासनाचा नवीन आदेश निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेत आहे. त्यासंदर्भात योग्य वेळी निर्णय न घेतल्यास नगराध्यक्षपदाची निवडणूक ही जनतेतून होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने नगरसेवकांमधून निवड करण्याचा निर्णय घेतला असला, तरी तो निर्णय निवडणूक आयोगाने मान्य करून आगामी निवडणुकीसाठी त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. योग्यवेळी निर्णय झाला नाही तर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा घोळ वाढण्याची शक्यता आहे.

च्नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेतून घेण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला होता. त्यात बदल करून महाविकास आघाडीने नगराध्यक्षपदाची निवडणूक ही पुन्हा नगरसेवकांमधून करण्याचा निर्णय घेतला.च्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडीच्या प्रक्रि येचा निर्णय कधी होणार, याची प्रतीक्षा आहे.च्निवडणूक आयोगाने राज्य शासनाचा निर्णय मान्य न केल्यास अंबरनाथ आणि बदलापूरची निवडणूक ही थेट जनतेतून होण्याची शक्यता आहे.च्आयोगाने वेळेत राज्य शासनाचे निर्णय स्वीकारल्यास नगराध्यक्षाची निवड ही नगरसेवकांमधून होईल.च्मात्र, निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांमध्ये अद्यापही संभ्रम कायम असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज आहे.