शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

नगराध्यक्षाच्या निवडीचा घोळ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:51 IST

शासन निर्णयाचे काय? : निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतेही आदेश नाहीत

पंकज पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ/ बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी एक सदस्य पद्धतीने निवडणूक होणार, हे निश्चित झाले असले तरी अजूनही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत संभ्रम कायम आहे. याबाबत निवडणूक आयोगाचा कोणताही आदेश अद्याप आलेला नाही. राज्य शासनाने कॅबिनेटच्या बैठकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक नागरिकांमधून न घेता नगरसेवकांमधून घेण्याचे निश्चित केले असले, तरी ते आदेश निवडणूक आयोगामार्फत पालिकेला मिळालेले नाहीत. त्यामुळे नगराध्यक्षांची निवडणूक जनतेतून होणार की नगरसेवकांमधून, याबाबत संभ्रम कायम आहे.

राज्य शासनाने नगर परिषदेमधील नगरसेवकांची निवडणूक ही एक सदस्य पद्धतीने घेण्याबाबत निर्णय घेतला आणि तो निर्णय निवडणूक आयोगाने मान्यदेखील केला. २७ जानेवारीला हा आदेश काढण्यात आल्यानंतर त्यानुसार निवडणूक आयोगाने नवीन आदेश काढून आरक्षण सोडतही निश्चित केली.त्यामुळे बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही नगर परिषदांची निवडणूक ही एक सदस्य पद्धतीने होणार हे निश्चित झाले आहे. मात्र, नगराध्यक्षपदाची निवडणूक ही जनतेतून होणार की नगरसेवकांमधून, याबाबत कोणताही स्पष्ट आदेश निवडणूक आयोगामार्फत अद्याप आलेला नाही.

राज्य शासनाने कॅबिनेटच्या बैठकीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत निर्णय घेत नगरसेवकांमधून नगराध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तो निर्णय निवडणूक आयोगाने स्वीकारणे आणि त्यांच्यामार्फत नगर परिषदेला निर्देश जाणे, हे अद्याप निश्चित केलेले नाही.शासनाचा नवीन आदेश निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेत आहे. त्यासंदर्भात योग्य वेळी निर्णय न घेतल्यास नगराध्यक्षपदाची निवडणूक ही जनतेतून होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने नगरसेवकांमधून निवड करण्याचा निर्णय घेतला असला, तरी तो निर्णय निवडणूक आयोगाने मान्य करून आगामी निवडणुकीसाठी त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. योग्यवेळी निर्णय झाला नाही तर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा घोळ वाढण्याची शक्यता आहे.

च्नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेतून घेण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला होता. त्यात बदल करून महाविकास आघाडीने नगराध्यक्षपदाची निवडणूक ही पुन्हा नगरसेवकांमधून करण्याचा निर्णय घेतला.च्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडीच्या प्रक्रि येचा निर्णय कधी होणार, याची प्रतीक्षा आहे.च्निवडणूक आयोगाने राज्य शासनाचा निर्णय मान्य न केल्यास अंबरनाथ आणि बदलापूरची निवडणूक ही थेट जनतेतून होण्याची शक्यता आहे.च्आयोगाने वेळेत राज्य शासनाचे निर्णय स्वीकारल्यास नगराध्यक्षाची निवड ही नगरसेवकांमधून होईल.च्मात्र, निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांमध्ये अद्यापही संभ्रम कायम असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज आहे.