शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
2
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
3
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
4
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
5
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
6
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
7
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
8
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
9
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
10
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
11
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
12
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
13
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
14
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
15
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
16
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
17
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
18
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
19
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
20
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस

नगराध्यक्षाच्या निवडीचा घोळ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:51 IST

शासन निर्णयाचे काय? : निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतेही आदेश नाहीत

पंकज पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ/ बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी एक सदस्य पद्धतीने निवडणूक होणार, हे निश्चित झाले असले तरी अजूनही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत संभ्रम कायम आहे. याबाबत निवडणूक आयोगाचा कोणताही आदेश अद्याप आलेला नाही. राज्य शासनाने कॅबिनेटच्या बैठकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक नागरिकांमधून न घेता नगरसेवकांमधून घेण्याचे निश्चित केले असले, तरी ते आदेश निवडणूक आयोगामार्फत पालिकेला मिळालेले नाहीत. त्यामुळे नगराध्यक्षांची निवडणूक जनतेतून होणार की नगरसेवकांमधून, याबाबत संभ्रम कायम आहे.

राज्य शासनाने नगर परिषदेमधील नगरसेवकांची निवडणूक ही एक सदस्य पद्धतीने घेण्याबाबत निर्णय घेतला आणि तो निर्णय निवडणूक आयोगाने मान्यदेखील केला. २७ जानेवारीला हा आदेश काढण्यात आल्यानंतर त्यानुसार निवडणूक आयोगाने नवीन आदेश काढून आरक्षण सोडतही निश्चित केली.त्यामुळे बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही नगर परिषदांची निवडणूक ही एक सदस्य पद्धतीने होणार हे निश्चित झाले आहे. मात्र, नगराध्यक्षपदाची निवडणूक ही जनतेतून होणार की नगरसेवकांमधून, याबाबत कोणताही स्पष्ट आदेश निवडणूक आयोगामार्फत अद्याप आलेला नाही.

राज्य शासनाने कॅबिनेटच्या बैठकीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत निर्णय घेत नगरसेवकांमधून नगराध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तो निर्णय निवडणूक आयोगाने स्वीकारणे आणि त्यांच्यामार्फत नगर परिषदेला निर्देश जाणे, हे अद्याप निश्चित केलेले नाही.शासनाचा नवीन आदेश निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेत आहे. त्यासंदर्भात योग्य वेळी निर्णय न घेतल्यास नगराध्यक्षपदाची निवडणूक ही जनतेतून होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने नगरसेवकांमधून निवड करण्याचा निर्णय घेतला असला, तरी तो निर्णय निवडणूक आयोगाने मान्य करून आगामी निवडणुकीसाठी त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. योग्यवेळी निर्णय झाला नाही तर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा घोळ वाढण्याची शक्यता आहे.

च्नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेतून घेण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला होता. त्यात बदल करून महाविकास आघाडीने नगराध्यक्षपदाची निवडणूक ही पुन्हा नगरसेवकांमधून करण्याचा निर्णय घेतला.च्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडीच्या प्रक्रि येचा निर्णय कधी होणार, याची प्रतीक्षा आहे.च्निवडणूक आयोगाने राज्य शासनाचा निर्णय मान्य न केल्यास अंबरनाथ आणि बदलापूरची निवडणूक ही थेट जनतेतून होण्याची शक्यता आहे.च्आयोगाने वेळेत राज्य शासनाचे निर्णय स्वीकारल्यास नगराध्यक्षाची निवड ही नगरसेवकांमधून होईल.च्मात्र, निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांमध्ये अद्यापही संभ्रम कायम असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज आहे.