शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

चितळे यांचे दुकान यापुढे दिवसभर उघडे राहणार

By admin | Updated: May 16, 2017 00:11 IST

माझ्या आजोबांना दुधाचा आणि दुकान चालवण्याचा हे दोन्ही व्यवसाय सांभाळावे लागले. त्यामुळे पहाटेपासून दुपारी २ पर्यंत आणि दुपारी ३ वाजल्यापासून रात्रीपर्यंत त्यांना काम करावे लागत होते

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : माझ्या आजोबांना दुधाचा आणि दुकान चालवण्याचा हे दोन्ही व्यवसाय सांभाळावे लागले. त्यामुळे पहाटेपासून दुपारी २ पर्यंत आणि दुपारी ३ वाजल्यापासून रात्रीपर्यंत त्यांना काम करावे लागत होते. दुकानातील कामगार दुधाची, पेपरची लाइन टाकून कामावर यायचे. त्या कामगारांना विश्रांती मिळावी आणि त्यांची काम करण्याची क्षमता वाढावी, म्हणून चितळेंचे दुकान दुपारी १ ते ४ बंद असते, असे उत्तर चितळे उद्योगसमूहाचे इंद्रनील चितळे यांनी रविवारी दिले. डेक्कन येथे सुरू झालेले दुकान लवकरच १२ तास सुरू राहील तर ठाणे, मुंबईत शाखा सुरू झाल्यावर या ठिकाणीही चितळेंचे दुकान दुपारी १ ते ४ या वेळेत बंद न राहता १२ तास सुरू राहील, असेही त्यांनी जाहीर केले. ‘इंद्रधनू’च्या वतीने रविवारी सरस्वती क्रीडा संकुल सभागृहात विश्वास, अंजली आणि इंद्रनील चितळेंशी मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम पार पडला. या वेळी निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांना बोलते केले. ‘चितळ्यांच्या गायी-म्हशी खरंच तिप्पट दूध देतात का’, ‘चितळ्यांचे दुकान दुपारी १ ते ४ बंद का असते’, ‘चितळ्यांच्या बाकरवडीच्या खुसखुशीतपणाचं रहस्य काय?...’ अशा एक ना अनेक खुसखुशीत प्रश्नांचा भडीमार केला. काही प्रश्नांनी व त्यावरील उत्तरांनी उपस्थितांना पोट धरून हसवले. चितळे हे ठाणेकर आणि पुणेकर खवय्यांमुळे उभे आहेत. आजोबांनी भिलवडीमध्ये दुधाचा व्यवसाय सुरू केला. पहिल्यांदा दूध विकायला मुंबईत आले, परंतु काही अडचणींमुळे हा व्यवसाय पुण्यात सुरू केला. भिलवडीमध्ये उत्पादन आणि पुण्यात विक्री असा आमचा उद्योग १९३९ मध्ये सुरू झाला, असे विश्वास यांनी सांगितले. आम्ही शेतकरी ते ग्राहक ही साखळी सांभाळत आलो, अशी माहिती इंद्रनीलने दिली. पुढच्या पिढीकडे जबाबदारी देताना तिला सक्षम बनवण्याचे काम चितळे कुटुंबातील महिला करीत असल्याचे सांगून अंजली म्हणाल्या, वेळ फुकट घालवायचा नाही, हा संस्कार माझ्यावर सासरी झाला. आमच्याकडे गायी-म्हशींची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांची टीम आहे. प्राण्यांचे रक्ततपासणी केंद्र चितळेंनीच सुरू केल्याकडे इंद्रनील यांनी लक्ष वेधले. दिवाळीला घरचे पदार्थ खाता की दुकानातून आणता, हा प्रश्न गाडगीळ यांनी विचारला असता, विश्वास म्हणाले, घरचा लाडू-चिवडा चांगलाच, पण चेंज म्हणून दुकानातले पदार्थही आवडतात. गाय हे शेतकऱ्यांसाठी एटीएम आहे. आज चारा दिला की, उद्या दूध देते. साखरेपेक्षा जास्त पैसा हा दुधाच्या व्यवसायातून मिळतो, असे त्यांनी सांगितले.