शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुलांची आवड त्यांच्या लेखनाद्वारे ठरवावी

By admin | Updated: February 6, 2017 04:15 IST

मुलांना जे वाचायला आवडते, ते तर मुलांना द्यावेच. मात्र, मुलांना काय आवडले पाहिजे, याचाही विचार करून बालसाहित्याचे लेखन व्हायला हवे.

मुरलीधर भवार, पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली)मुलांना जे वाचायला आवडते, ते तर मुलांना द्यावेच. मात्र, मुलांना काय आवडले पाहिजे, याचाही विचार करून बालसाहित्याचे लेखन व्हायला हवे. आजच्या बालसाहित्याने चांगली आणि हुशार मुले निर्माण केली, तर ‘बालकुमारांसाठीच्या लेखनाचे काय झाले’ हा प्रश्न उपस्थित होणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ बालकुमार साहित्यिक डॉ. न.म. जोशी यांनी येथे केले.साहित्य संमेलनातील ‘बालकुमारांसाठीच्या लेखनाचे काय झाले?’ हा परिसंवाद शं.ना. नवरे सभामंडपात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डॉ. जोशी अध्यक्षस्थानी होते. जोशी म्हणाले की, बालसाहित्याचा केंद्रबिंदू मुले आहेत. त्याच्या त्रिज्या आणि व्यास हे लेखक आहेत. मुलांचे साहित्य म्हणजे बडबडगीते, अशी अनेकांची धारणा आहे. बडबडगीते म्हणजे बालसाहित्य नाही. ही समजूत बालसाहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांनी मनातून काढून टाकावी. तरच, वस्तुनिष्ठ बालसाहित्य लेखन केले जाऊ शकते. मुलांची कल्पनाशक्ती विलक्षण असते. तिला वळण लावण्याचे काम बालसाहित्यिकांनी केले पाहिजे. याकडे जोशी यांनी लक्ष वेधले. बालसाहित्यिक सुरेश सावंत यांनी सांगितले की, बालसाहित्य आणि बालशिक्षण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बालसाहित्य हे बालकांच्या भवितव्याशी निगडित बाब असल्याने त्यावर गंभीर स्वरूपात चर्चा व्हायला हवी. ती होताना दिसून येत नाही. मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव दिला पाहिजे. बालसाहित्यातून मुलांचे आत्मभाव व भाव जागा होतो. बालसाहित्य हे उपेक्षित आहे. त्याला महत्त्वाचा प्रवाह मानले जात नाही. बोबडे बोल लिहिणे म्हणजे बालकविता होत नाही. मुलांना हल्ली संगणकाचा आणि टीव्हीचा पडदा आवडतो. त्यांच्या चुकीच्या प्रवृत्ती उफाळून येतील. त्यांच्या बालमनाची भूक भागवणारे बालसाहित्य लिहिले पाहिजे.बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड म्हणाले की, मुलांचे साहित्य अनुकरणाच्या जंजाळात अडकून पडले, तर मुलांचे जग आणि भाषा समजून घेण्यास आपण कमी पडू. बालसाहित्य पाहिजे त्या प्रमाणात गुणात्मकदृष्ट्या वाढीस लागलेले नसून, ते संख्यात्मकदृष्ट्या वाढील लागले आहे. ते गुणात्मकदृष्ट्या वाढीला लागले पाहिजे. बालसाहित्याला एक प्रकारचे साचलेपण आले आहे. ते दूर झाले, तर बालसाहित्याला चांगले दिवस येतील. बालसाहित्यिक नरेंद्र लांजेवार यांनी सांगितले की, पालकांनी मुलांना चांगल्या बालमासिकांच्या वाचनाची सवय लावली पाहिजे. ही जबाबदारी एकट्या लेखकाची नाही. मनोरंजन व प्रबोधनासह बालसाहित्याने ज्ञानार्जनाचेही काम केले पाहिजे. बालसाहित्याला वाचनाश्रय, राजाश्रय आणि समीक्षाश्रय मिळत नाही. तो मिळाला तर बालसाहित्याला नक्कीच चांगले दिवस येतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूरेश साने यांनी केले.