शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

निधीटंचाईने हिरावला गेला चिमुकल्यांचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:43 IST

जिल्हा परिषदेने स्वत:ची योजना केली बंद; पोषण आहार सुरू करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा

पालघर : जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील मुलांना चांगला आहार मिळावा म्हणून जिल्हा परिषदेने अंडी आणि केळी देण्यास सुरुवात केली, मात्र निधीच्या टंचाईचे कारण देत हा पोषण आहारच बंद करण्यात आला आहे. चिमुकल्यांचा घास हिरावला गेल्याने ऐन लॉकडाऊनच्या काळात त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. ही योजना बंद न करता पुरेशा निधीची तरतूद करून ती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी आता केली जाऊ लागली आहे.पालघर जिल्ह्यात एकूण ३ हजार १८३ अंगणवाड्या असून त्यात अंदाजे ७० हजार मुले दाखल आहेत. तसेच या योजनेचा लाभ घेणाऱ्या बालकांची संख्या १ लाख ४२ हजार ४४७ इतकी आहे. ग्रामीण भागातील मुलांची उपासमार होऊ नये म्हणून अमृत आहार योजनेंतर्गत ७ महिने ते ६ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांना आठवड्यातून चार वेळा उकडलेली अंडी किंवा दोन केळी असा आहार दिला जातो. त्यासाठी एका मुलामागे ६ रुपये अनुदान देण्यात येत असून या आहारामुळे बालकांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.अमृत आहार योजनेच्याच धर्तीवर पालघर जिल्हा परिषदेने स्वत:च्या निधीतून आठवड्यातून एक दिवस अंडी तसेच केळी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अंगणवाड्यांमधील मुलांना पाच दिवस हा आहार मिळत होता. मात्र २०२०-२१ या आर्थिक वर्षात निधीची उपलब्धता नाही, असे कारण देत स्वत:ची योजना बंद करून टाकली. त्यामुळे पोषण आहारांतील मुलांचा एक दिवस कमी झाला आहे. पोषण आहारासाठी निधी उपलब्ध नसल्याचे पत्र महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना पाठवले आहे.फक्त निधी नाही म्हणून मुलांच्या तोंडचा घास हिरावून न घेता प्रशासनाने जिल्हा पातळीवर काही निर्णय घेणे अभिप्रेत होते, मात्र पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यातील संवेदनशीलतेच्या अभावी मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे, म्हणून श्रमजीवीने संताप व्यक्त केला आहे. ही योजना पुन्हा सुरू केली नाही तर आंदोलनाला सामोरे जा, असा इशारा जिल्हा परिषदेला श्रमजीवीचे सरचिटणीस विजय जाधव यांनी दिला आहे.१५ आॅगस्टनंतर आहार पूर्ववत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरूराज्य शासनाकडून आठवड्यात चार दिवसांसाठी सुरू असलेल्या अमृत आहार योजनेतील अंडी-केळी हा आहार आजही सुरूच असून कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे आर्थिक गणित डळमळल्याने महिला बालकल्याण विभागाच्या सभेत काही दिवसासाठी जिल्हा परिषदेकडून देण्यात येणारा आहार सध्या नाइलाजास्तव बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.हा अमृत आहार अधिक सकस बनविण्यासाठी स्वत:च्या बजेटमधून प्रतिलाभार्थी १० रुपये पुरवणारी जिल्हा परिषद पालघरचे सर्वत्र कौतुक होत असून संपूर्ण राज्यातील सर्व जिल्हा परिषदेत हीच पद्धत अवलंबली जात असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी सांगितले. येत्या १५ आॅगस्टनंतर हा आहार पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.