शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

मेहतांवर मुख्यमंत्र्यांचा वॉच

By admin | Updated: July 17, 2017 01:10 IST

मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सत्ताधारी भाजपामधील इच्छुकांमध्ये चुरस वाढून राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

धीरज परब । लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सत्ताधारी भाजपामधील इच्छुकांमध्ये चुरस वाढून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वॉर रूममधील टीम शहरात तैनात केली असून त्यांचेदेखील प्रभागानुसार सर्वेक्षण सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीची सर्व सूत्रे हाती ठेवण्याच्या आमदार नरेंद्र मेहता यांच्या मनसुब्यांना थेट मुख्यमंत्र्यांनीच धक्का दिल्याचे मानले जात आहे. मीरा-भार्इंदरमध्ये शिवसेना, बविआच्या मदतीने भाजपाची सत्ता आहे. पण, दोन्ही काँग्रेसमध्ये मोठी फूट पडून भाजपा व शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले आहे. त्यातच भाजपात इच्छुकांची असलेली मोठी संख्या, विद्यमान नगरसेवकांचे पत्ते कापले जाण्याची शक्यता, अनेकांना दिलेल्या आश्वासनांची न होणारी पूर्तता हे सर्व पाहता भाजपात बंडाळीची चिन्हे आहेत. आचारसंहिता लागू होण्याआधीच भाजपाच्या दीप्ती भट, सुमन कोठारी, सुजाता शिंदे या तीन नगरसेविकांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर आता १८ व १९ जुलैला पक्षांचे अर्ज इच्छुकांकडून भरून घेतले जाणार आहेत. त्यासाठी तीन हजार शुल्क आकारले जाणार आहे. आलेल्या अर्जांची छाननी करून त्यानंतर २१, २२ जुलैला अर्ज भरलेल्या इच्छुकांच्या मुलाखती पक्षाचे प्रभारी खासदार कपिल पाटील व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह स्थानिक कोअर कमिटी घेईल. मुलाखतीनंतर आपला अहवाल तयार करून प्रदेशला पाठवला जाणार आहे. पक्षाचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मुलाखती घेतल्या जाणार असल्याचा केवळ सोपस्कार असून उमेदवारी कुणाला द्यायची, हे स्थानिक नेतृत्वाने जवळपास निश्चित केलेले आहे. त्यातही काही प्रभागांमध्ये विद्यमान नगरसेवक तसेच इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी देण्यावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. बंडाळीची भीती असल्याने उमेदवार जाहीर न करता अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत इच्छुकांना थोपवून धरण्याची रणनीती आखण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामुळे इच्छुकांमधील धाकधूक वाढली असून अनेकांनी आपला व्यक्तिगत प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. काही प्रभागांमध्ये उमेदवारीवरून वाद नसल्याने त्या ठिकाणी मात्र इच्छुकांनी मिळून प्रचारही सुरू केला आहे. दरम्यान, स्थानिक भाजपा नेतृत्वाने प्रभागानुसार केलेल्या सर्वेक्षणानुसार ६० जागांवर विजय मिळण्याचा अंदाज असला तरी ७० जागा निवडून आणायचे लक्ष्य ठरवले असल्याचे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले. शिवाय, प्रभारी यांनीदेखील प्रभागानुसार सर्वेक्षण हाती घेतले आहे. महत्त्वाचे म्हणजे थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वॉररूममधील टीम मीरा-भार्इंदरमध्ये सक्रिय असून त्यांनीही सर्वेक्षण चालवले आहे. यामुळे स्थानिक नेतृत्वाकडून केवळ स्वत:च्या मर्जीतल्या उमेदवारांना उमेदवारी देण्याचा घातला जाणारा घाट आता थेट मुख्यमंत्र्यांच्या सर्वेक्षणामुळे बारगळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून सर्वेक्षण हाती घेतल्याने याचा मेहता समर्थकांना फटका बसण्याची चिन्हे आहेत. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी पालिका निवडणुकीत लक्ष घातल्याने मेहतांना काहीसा लगाम त्यांनी घातल्याचे त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांकडून सांगितले जात असले, तरी राजकीय डावपेच व वरिष्ठांचे मन वळवण्यात तरबेज मानले जाणारे मेहता स्वत:ची तिकीटवाटपावरील पकड सहज सोडतील, असे जाणकारांना वाटत नाही. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्याने पक्षातील मेहता विरोधकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असल्याचे समजते.