शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे ‘स्मार्ट’ घूमजाव

By admin | Updated: December 17, 2015 01:55 IST

महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी आणि आधी झालेल्या भाजपच्या विकास परिषदेत कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना मी ६,५०० कोटींच्या पॅकेजबद्दल कोणतेही

कल्याण : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी आणि आधी झालेल्या भाजपच्या विकास परिषदेत कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना मी ६,५०० कोटींच्या पॅकेजबद्दल कोणतेही आश्वासन दिले नव्हते, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषेदत घेतली. त्यामुळे मते मागण्यापुरती ही घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी घूमजाव केल्याची आणि कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांची फसवणूक केल्याची टीका काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी केली आहे.पालिकेतून वगळलेल्या, पुन्हा पालिकेत समाविष्ट केलेल्या आणि निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा वगळलेल्या २७ गावांबाबतही मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगल्याची टीकाही दत्त यांनी केली. ही गावे पालिकेतच ठेवणार की वगळणार याबाबत दत्त यांनी स्पष्टीकरण मागितले होते. पण ते मुख्यमंत्र्यांनी न दिल्याने २७ गावांतील नागरिकांचीही फसवणूक झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.या संदर्भात दत्त यांनीच प्रश्न उपस्थित केला होता आणि पालिका निवडणुकीत आश्वासन दिलेले पॅकेज कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना कधी मिळणार, असे विचारले होते. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी पॅकेजबाबत घूमजाव केल्याबद्दल आणि कानावर हात ठेवल्याबद्दल सडकून टीका करणारे ट््िवट दत्त यांनी केले. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना भाजपने घेतलेल्या विकास परिषदेत मुख्यमंत्र्यांनी कल्याण-डोंबिवलीला स्मार्ट सिटीचा दर्जा दिल्याचे जाहीर करतानाच त्यासाठी ६,५०० कोटींचे पॅकेज देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांविरोेधात आचारसंहिता भंगाची तक्रारही करण्यात आली. त्यावर आयोगाने पाठविलेल्या नोटीशीला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट सिटीच्या नियोजनातच कल्याण-डोंबिवलीला पॅकेज देण्याचा तपशील असल्याचे सांगत मी केवळ त्याचा पुनरूच्चार केला, असा पवित्रा घेतला होता. भाजपने हाच मुद्दा उचलून धरत स्मार्ट सिटी आणि पॅकेज याच मुद्दयांवर प्रचारात भर दिला होता.राज ठाकरे यांची झोडमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या पॅकेजवर टीकेची झोड उठवत हे पैसे येणार कुठून, असा प्रश्न जाहीररित्या विचारला होता आणि ‘भाजपा म्हणजे थापा’ अशा शब्दांत त्या योजनेची खिल्ली उडवली होती. पण कल्याण-डोंबिवली ही शहरे स्मार्ट होणार आणि त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. वेगवेगळ््या मार्गाने येणाऱ्या गुंतवणुकीतून कल्याण-डोंबिवलीला ६,५०० कोटी रूपये दिले जातील, असा विश्वासही फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी नंतरच्या सभांतून दिला होता.आम्हाला निवडून दिले, तर २७ गावे वगळण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पण सध्या गावे वगळण्याचा प्रश्न न्यायालयात आहे.