शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

मुख्यमंत्र्यांचे ‘स्मार्ट’ घूमजाव

By admin | Updated: December 17, 2015 01:55 IST

महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी आणि आधी झालेल्या भाजपच्या विकास परिषदेत कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना मी ६,५०० कोटींच्या पॅकेजबद्दल कोणतेही

कल्याण : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी आणि आधी झालेल्या भाजपच्या विकास परिषदेत कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना मी ६,५०० कोटींच्या पॅकेजबद्दल कोणतेही आश्वासन दिले नव्हते, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषेदत घेतली. त्यामुळे मते मागण्यापुरती ही घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी घूमजाव केल्याची आणि कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांची फसवणूक केल्याची टीका काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी केली आहे.पालिकेतून वगळलेल्या, पुन्हा पालिकेत समाविष्ट केलेल्या आणि निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा वगळलेल्या २७ गावांबाबतही मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगल्याची टीकाही दत्त यांनी केली. ही गावे पालिकेतच ठेवणार की वगळणार याबाबत दत्त यांनी स्पष्टीकरण मागितले होते. पण ते मुख्यमंत्र्यांनी न दिल्याने २७ गावांतील नागरिकांचीही फसवणूक झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.या संदर्भात दत्त यांनीच प्रश्न उपस्थित केला होता आणि पालिका निवडणुकीत आश्वासन दिलेले पॅकेज कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना कधी मिळणार, असे विचारले होते. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी पॅकेजबाबत घूमजाव केल्याबद्दल आणि कानावर हात ठेवल्याबद्दल सडकून टीका करणारे ट््िवट दत्त यांनी केले. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना भाजपने घेतलेल्या विकास परिषदेत मुख्यमंत्र्यांनी कल्याण-डोंबिवलीला स्मार्ट सिटीचा दर्जा दिल्याचे जाहीर करतानाच त्यासाठी ६,५०० कोटींचे पॅकेज देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांविरोेधात आचारसंहिता भंगाची तक्रारही करण्यात आली. त्यावर आयोगाने पाठविलेल्या नोटीशीला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट सिटीच्या नियोजनातच कल्याण-डोंबिवलीला पॅकेज देण्याचा तपशील असल्याचे सांगत मी केवळ त्याचा पुनरूच्चार केला, असा पवित्रा घेतला होता. भाजपने हाच मुद्दा उचलून धरत स्मार्ट सिटी आणि पॅकेज याच मुद्दयांवर प्रचारात भर दिला होता.राज ठाकरे यांची झोडमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या पॅकेजवर टीकेची झोड उठवत हे पैसे येणार कुठून, असा प्रश्न जाहीररित्या विचारला होता आणि ‘भाजपा म्हणजे थापा’ अशा शब्दांत त्या योजनेची खिल्ली उडवली होती. पण कल्याण-डोंबिवली ही शहरे स्मार्ट होणार आणि त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. वेगवेगळ््या मार्गाने येणाऱ्या गुंतवणुकीतून कल्याण-डोंबिवलीला ६,५०० कोटी रूपये दिले जातील, असा विश्वासही फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी नंतरच्या सभांतून दिला होता.आम्हाला निवडून दिले, तर २७ गावे वगळण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पण सध्या गावे वगळण्याचा प्रश्न न्यायालयात आहे.