शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

भाजपा नेत्यांना मुख्यमंत्र्यांचा धक्का

By admin | Updated: May 26, 2017 00:08 IST

आधीच विसविशीत संघटनेचा फटका निवडणुकीत बसल्याने आतापासूनच नागरिकांच्या जिव्हाळ््याचे विषय हाताळण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाण्यातील भाजपाच्या नेत्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आधीच विसविशीत संघटनेचा फटका निवडणुकीत बसल्याने आतापासूनच नागरिकांच्या जिव्हाळ््याचे विषय हाताळण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाण्यातील भाजपाच्या नेत्यांना खुद्द मुख्यमंत्र्यांनीच धक्का दिल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांची पालिका आयुक्तांवर मर्जी असूनही त्यांच्याविरोधात तक्रारी करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना ते भेटीसाठीही वेळ देत नसल्याने या नेत्यांची पुरती कोंडी झाली आहे. प्रश्न सोडवा किंवा सोडवू नका, पण ते मांडण्यासाठीही नेते वेळ देत नसतील, तर नंतर त्याचे खापर संघटनेवर फोडू नका, अशी अस्वस्थताही या नेत्यांनी व्यक्त केली. वादग्रस्त ठरलेल्या महासभेतील मैदानांच्या विषयांवरून भाजपा नगरसेवकांनी आयुक्तांविरोधात भूमिका घेतली आहे. शहरातील मैदाने बिल्डरांच्या घशात जाणार असल्याने आणि नागरिक, पर्यावरणप्रेमी, खेळाडूंचा त्याला विरोध असल्याने भाजपानेही हा मुद्दा उचलून धरला. मुख्यमंत्री हस्तक्षेप करून हा ठराव रद्द करतील, असे नगरसेवकांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी एका मंत्र्याला आणि माथाडी कामगार संघटनेच्या नेत्यांना मध्यस्थीसाठी सांगितले. पण आयुक्तांविरोधात तक्रार करणार असाल, तर मुख्यमंत्री भेटणार नाहीत, असे मंत्र्याने सुनावल्याचे समजते. सत्ताधारी शिवसेनेने आयुक्तांशी जुळवून घेतले आहे. त्यामुळे कोणतीही चर्चा न करता अनेक प्रस्ताव मंजूर झाले. त्याचा शहराच्या विकासावर विपरित होणार असल्याचा मुद्दा मांडत भाजपा आणि राष्ट्रवादीने सेनेच्या कोंडीचा प्रयत्न केला. आयुक्तांनाही घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आक्रमकतेविरोधात भाजपाने धरणे धरले. राष्ट्रवादी निषेधाचे फलक लावत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना एसएमएस पाठवले. तरीही मुख्यमंत्री भेटत नसल्याने भाजपा नेते कमालीचे नाराज झाले आहेत. आयुक्तांवर प्रेम असेलही...मुख्यमंत्री ठाण्यात आले की आयुक्त संजीव जयस्वाल यांना हमखास भेटतात. त्यांच्या घरी जातात. पण आम्हाला भेटण्यास त्यांना वेळ नाही. असे असेल तर पक्षाच्या नेत्यांना काहीच किंमत नाही का, असा प्रश्न पक्षाच्या काही नेत्यांनी इतर मंत्र्यांकडे केला. आयुक्त मुख्यमंत्र्यांचे लाडके असले तरी त्यांनी किमान पक्षातील नेत्यांची भूमिका समजून घ्यायला हवी, एवढेच आमचे म्हणणे आहे.