शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेत्यांना मुख्यमंत्र्यांचा धक्का

By admin | Updated: May 26, 2017 00:08 IST

आधीच विसविशीत संघटनेचा फटका निवडणुकीत बसल्याने आतापासूनच नागरिकांच्या जिव्हाळ््याचे विषय हाताळण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाण्यातील भाजपाच्या नेत्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आधीच विसविशीत संघटनेचा फटका निवडणुकीत बसल्याने आतापासूनच नागरिकांच्या जिव्हाळ््याचे विषय हाताळण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाण्यातील भाजपाच्या नेत्यांना खुद्द मुख्यमंत्र्यांनीच धक्का दिल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांची पालिका आयुक्तांवर मर्जी असूनही त्यांच्याविरोधात तक्रारी करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना ते भेटीसाठीही वेळ देत नसल्याने या नेत्यांची पुरती कोंडी झाली आहे. प्रश्न सोडवा किंवा सोडवू नका, पण ते मांडण्यासाठीही नेते वेळ देत नसतील, तर नंतर त्याचे खापर संघटनेवर फोडू नका, अशी अस्वस्थताही या नेत्यांनी व्यक्त केली. वादग्रस्त ठरलेल्या महासभेतील मैदानांच्या विषयांवरून भाजपा नगरसेवकांनी आयुक्तांविरोधात भूमिका घेतली आहे. शहरातील मैदाने बिल्डरांच्या घशात जाणार असल्याने आणि नागरिक, पर्यावरणप्रेमी, खेळाडूंचा त्याला विरोध असल्याने भाजपानेही हा मुद्दा उचलून धरला. मुख्यमंत्री हस्तक्षेप करून हा ठराव रद्द करतील, असे नगरसेवकांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी एका मंत्र्याला आणि माथाडी कामगार संघटनेच्या नेत्यांना मध्यस्थीसाठी सांगितले. पण आयुक्तांविरोधात तक्रार करणार असाल, तर मुख्यमंत्री भेटणार नाहीत, असे मंत्र्याने सुनावल्याचे समजते. सत्ताधारी शिवसेनेने आयुक्तांशी जुळवून घेतले आहे. त्यामुळे कोणतीही चर्चा न करता अनेक प्रस्ताव मंजूर झाले. त्याचा शहराच्या विकासावर विपरित होणार असल्याचा मुद्दा मांडत भाजपा आणि राष्ट्रवादीने सेनेच्या कोंडीचा प्रयत्न केला. आयुक्तांनाही घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आक्रमकतेविरोधात भाजपाने धरणे धरले. राष्ट्रवादी निषेधाचे फलक लावत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना एसएमएस पाठवले. तरीही मुख्यमंत्री भेटत नसल्याने भाजपा नेते कमालीचे नाराज झाले आहेत. आयुक्तांवर प्रेम असेलही...मुख्यमंत्री ठाण्यात आले की आयुक्त संजीव जयस्वाल यांना हमखास भेटतात. त्यांच्या घरी जातात. पण आम्हाला भेटण्यास त्यांना वेळ नाही. असे असेल तर पक्षाच्या नेत्यांना काहीच किंमत नाही का, असा प्रश्न पक्षाच्या काही नेत्यांनी इतर मंत्र्यांकडे केला. आयुक्त मुख्यमंत्र्यांचे लाडके असले तरी त्यांनी किमान पक्षातील नेत्यांची भूमिका समजून घ्यायला हवी, एवढेच आमचे म्हणणे आहे.