शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

‘मुख्यमंत्री रोजगार योजना’ जिल्ह्यात लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:24 IST

प्रशिक्षणाची सोय : सरकार देणार अनुदान

ठाणे : उद्योग, व्यवसायांमध्ये व्यापक गुंतवणूक होत असल्यामुळे सूक्ष्म लघुउद्योजकांसाठी पूरक उद्योग व्यवसायाच्या संधी ठाणे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी प्राप्त व्हाव्यात, यासाठी आता नव्याने ‘मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम योजना’ ठाणे जिल्ह्यातदेखील राबवण्याचे निश्चित झाले आहे. या संधीचा लाभ मोठ्या संख्येने घेण्याचे आवाहन ठाणे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक वर्षाली बी. सोने यांनी केले आहे.

जिल्ह्यातील युवक-युवतीच्या उद्योगिक प्रगतीसाठी प्रथमच सुरू केलेल्या या योजनेद्वारे कृषी व कृषीवर आधारित उद्योग, उत्पादन व सेवा उद्योग आदी उद्योग प्रकल्पांसाठी संबंधितांची निवड केली जाणार आहे. यामध्ये सेवा क्षेत्रातील प्रकल्पासाठी १० लाख, उत्पादन क्षेत्रासाठी ५० लाख गुंतवणुकीचे प्रकल्प हाती घेणे शक्य होणार आहे.यासाठी शासनाकडून प्रकल्प मंजुरीच्या १५ ते ३५ टक्के आर्थिक साहाय्य हे अनुदान स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहे. या उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी जिल्ह्यातील युवक-युवतींना उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्याची संधी जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा ग्रामोद्योग विभागाने उपलब्ध करून दिली आहे.५५० जणांना पहिल्या टप्प्यात मिळणार लाभच्नुकत्याच सुरू झालेल्या या योजनेद्वारे यंदा जिल्हा उद्योग केंद्राकडून ३२० युवक-युवतींची निवड करून उद्योग व्यवसायाची संधी दिली जाणार आहे. तर, ग्रामोद्योग केंद्रांकडून २३५युवक-युवतीची निवडकरण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत.च्यासाठी लागणाऱ्या प्रोजेक्टसह प्रशिक्षण, बँकेकडून कर्जाची उपलब्धता आदींसाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे.च्या संधीचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला, अधिवास , जातीचा दाखला, प्रशिक्षण सर्टिफिकेट, प्रोजेक्ट रिपोर्ट आदी कागदपत्रांची गरज आहे.च्याविषयीच्या अधिक माहितीसाठी संबंधितांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या ठाणे येथील एमआयडीसी आॅफिस बिल्डिंग कॉम्प्लेक्स, मुलुंड चेकनाका येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :thaneठाणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस