शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मुख्यमंत्र्यांनाच आश्वासनांचा विसर, भाजपासह मित्रपक्ष नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 04:04 IST

दिवाळीपूर्वी शहर विकास आराखडयाला मंजुरी देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न पाळल्याने महापौर मीना आयलानी यांच्यासह पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी तोंडघशी पडले.

सदानंद नाईक उल्हासनगर : दिवाळीपूर्वी शहर विकास आराखडयाला मंजुरी देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न पाळल्याने महापौर मीना आयलानी यांच्यासह पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी तोंडघशी पडले. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा फक्त आश्वासन दिले आहे.महापालिकेवर भाजपासह मित्र पक्षाची सत्ता येण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालिका निवडणुकीच्या दरम्यान शहर विकास आराखडा मंजुरीसह अनेक आश्वासने नागरिकांना दिली होती. भाजपाचे मित्रपक्ष साई व ओमी टीमने शहर विकास आराखडयासह इतर विकासात्मक पॅकेजबाबत महापौर आयलानी यांच्याकडे तगादा लावला. तसेच आश्वासनाचा मुख्यमंत्र्यांना विसर पडल्याची टीका शहरातून सुरू झाली आहे.महापौर आयलानी व पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी यांनी मुख्यमंत्र्याची सहा महिन्यात तीनवेळा भेट घेतली. तसेच त्यांच्या समोर निवडणुकीतील आश्वासनांचा पाढा वाचून शहर विकास आराखडयासह वाढीवपाणी योजना, विशेष पॅकेज, रस्ता रूंदीकरणातील बाधित व्यापाºयांचे पुनर्वसन, नगररचनाकार आदी अनेक प्रस्तावांना लवकरच मंजुरी देण्याची विनंती केली. गेल्याच महिन्यात नगरविकास विभागाच्या सचिवांकडे बैठक घेऊन शहरातील विविध समस्या मांडल्या. त्यानींही उत्साहाच्या भरात दिवाळीपूर्वी मुख्यमंत्री शहर विकास आराखडयाला मंजुरी देणार असल्याचे सांगितले.दिवाळी संपल्यानंतरही आराखडयाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली नाही. याप्रकाराने महापौरांसह मित्र पक्षात नाराजी पसरली आहे.मात्र नाराजी कोणीही उघडपणे व्यक्त करत नसल्याने, भाजप मित्रपक्षात असंतोष खदखदतो आहे. शुक्रवारी महापौर, कुमार आयलानी यांनी दिवाळीनिमित्त मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. त्याभेटीत त्यांनी पुन्हा जुन्या मागण्यांची आठवण करून दिली. एका महिन्यात शहर विकास आराखडयासह इतर प्रस्तावांना मंजुरी देणार असल्याचे आश्वासन महापौरांना दिले.>...तर भाजपाला धक्कापक्षात अशीच नाराजी निर्माण झाल्यास भाजपाला झटका बसणार असल्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. पक्षातील निष्ठावंत गटही शहर विकास ठप्प पडल्याने नाराज आहे. एकूणच वरिष्ठांच्या आश्वासनपूर्ती अभावी शहर भाजपासह मित्र पक्षात नाराजी पसरली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर