शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रीच उतरले मैदानात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 03:14 IST

मीरा-भार्इंदरमध्ये भाजपाच मोठा पक्ष व्हावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: मैदानात उतरले असून त्यांनी सोमवारी रात्री आमदार नरेंद्र मेहता यांच्या बंगल्यावर तळ ठोकून बंडखोरांची समजूत काढली

मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये भाजपाच मोठा पक्ष व्हावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: मैदानात उतरले असून त्यांनी सोमवारी रात्री आमदार नरेंद्र मेहता यांच्या बंगल्यावर तळ ठोकून बंडखोरांची समजूत काढली आणि मेहतांविरोधातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या गुरूवारच्या सभेत नाराजी उफाळून येऊ नये तेथे पक्षाचे शक्तिप्रदर्शन व्हावे यावर त्यांचा भर होता. तसेच या सभेत वेगवेगळ््या गटांसाठी कोणत्या घोषणा केल्या तर त्याचा उपयोग होईल, हेही त्यांनी समजून घेतले.मीरा-भार्इंदरसाठी २० आॅगस्टला रोजी मतदान होणार आहे. प्रचार शुक्रवारी दुपारी संपणार असल्याने प्रत्येक पक्षाची, उमेदवारांची धावपळ सुरू आहे.भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या बंगल्यावर सोमवारी रात्री सुमारे चार तास तळ ठोकून निवडणुकीचा आढावा त्यांनी घेतला.मीरा- भार्इंदरच्या प्रचारात अन्य पक्षातीलच नव्हे, तर भाजपाचेही स्थानिक नेते मेहता यांच्या कार्यपद्धतीवर, उमेदवारांच्या निवडीवर, पक्षाने केलेल्या सर्व्हेवर आरोपांच्या फैरी झडत आहेत. उमेदवारी वाटपावरुन असलेली नाराजी शमत नसल्याने स्वत: मुख्यमंत्र्यांनी नाराजांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री मीरा रोड येथे आमदार मेहतांच्या ‘गोल्डन नेस्ट’मधील बंगल्यावर आले होते. रात्री १० ते मध्यरात्री १ पर्यंत ते तेथूनच सूत्रे हलवत होते. निवडणुकीचे प्रभारी-राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपील पाटील यांच्याशी चर्चा करत निवडणुकीचा आढावा त्यांनी घेतला अणि १७ आॅगस्टला होणाºया त्यांच्या दोन्ही सभांची तयारी, काही समाजांतील लोकांच्या भेटी, बंडखोरांची समजूत ते काढत होते. याचकाळात त्यांनी मेहतांच्या खाजगी चॅनलच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला.>डिम्ड कन्व्हेअन्सची घोषणा जुनीच?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिम्ड कन्हेयन्ससाठी भोगवटा दाखल्याची गरज लागणार नाही, असा निर्णय मीरा-भार्इंदरकरांसाठी शासनाने घेतल्याचे सांगितले. मेहतांच्या खाजगी चॅनलच्या माध्यमातून त्यांनी ही घोषणा केली. याचा फायदा लाखो रहिवाशांना होईल, असे ते म्हणाले.जमिनीची मालकी त्यांना मिळेल, असे त्यांनी जाहीर केले. मात्र यासाठी सरकारने जानेवारीतच समिती नेमली होती आणि गेल्याच महिन्यात अधिवेशनातही सरकारने हा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे निवडणूक काळात याचा कितपत फायदा होईल, याबाबत साशंकता आहे.इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीमुळे जे नागरिक त्रस्त आहेत, त्याबद्दल देखील शासनाने हालचाल सुरु केली आहे. त्यात लोकांना दिलासा मिळेल, असा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.