शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रीच उतरले मैदानात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 03:14 IST

मीरा-भार्इंदरमध्ये भाजपाच मोठा पक्ष व्हावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: मैदानात उतरले असून त्यांनी सोमवारी रात्री आमदार नरेंद्र मेहता यांच्या बंगल्यावर तळ ठोकून बंडखोरांची समजूत काढली

मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये भाजपाच मोठा पक्ष व्हावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: मैदानात उतरले असून त्यांनी सोमवारी रात्री आमदार नरेंद्र मेहता यांच्या बंगल्यावर तळ ठोकून बंडखोरांची समजूत काढली आणि मेहतांविरोधातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या गुरूवारच्या सभेत नाराजी उफाळून येऊ नये तेथे पक्षाचे शक्तिप्रदर्शन व्हावे यावर त्यांचा भर होता. तसेच या सभेत वेगवेगळ््या गटांसाठी कोणत्या घोषणा केल्या तर त्याचा उपयोग होईल, हेही त्यांनी समजून घेतले.मीरा-भार्इंदरसाठी २० आॅगस्टला रोजी मतदान होणार आहे. प्रचार शुक्रवारी दुपारी संपणार असल्याने प्रत्येक पक्षाची, उमेदवारांची धावपळ सुरू आहे.भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या बंगल्यावर सोमवारी रात्री सुमारे चार तास तळ ठोकून निवडणुकीचा आढावा त्यांनी घेतला.मीरा- भार्इंदरच्या प्रचारात अन्य पक्षातीलच नव्हे, तर भाजपाचेही स्थानिक नेते मेहता यांच्या कार्यपद्धतीवर, उमेदवारांच्या निवडीवर, पक्षाने केलेल्या सर्व्हेवर आरोपांच्या फैरी झडत आहेत. उमेदवारी वाटपावरुन असलेली नाराजी शमत नसल्याने स्वत: मुख्यमंत्र्यांनी नाराजांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री मीरा रोड येथे आमदार मेहतांच्या ‘गोल्डन नेस्ट’मधील बंगल्यावर आले होते. रात्री १० ते मध्यरात्री १ पर्यंत ते तेथूनच सूत्रे हलवत होते. निवडणुकीचे प्रभारी-राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपील पाटील यांच्याशी चर्चा करत निवडणुकीचा आढावा त्यांनी घेतला अणि १७ आॅगस्टला होणाºया त्यांच्या दोन्ही सभांची तयारी, काही समाजांतील लोकांच्या भेटी, बंडखोरांची समजूत ते काढत होते. याचकाळात त्यांनी मेहतांच्या खाजगी चॅनलच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला.>डिम्ड कन्व्हेअन्सची घोषणा जुनीच?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिम्ड कन्हेयन्ससाठी भोगवटा दाखल्याची गरज लागणार नाही, असा निर्णय मीरा-भार्इंदरकरांसाठी शासनाने घेतल्याचे सांगितले. मेहतांच्या खाजगी चॅनलच्या माध्यमातून त्यांनी ही घोषणा केली. याचा फायदा लाखो रहिवाशांना होईल, असे ते म्हणाले.जमिनीची मालकी त्यांना मिळेल, असे त्यांनी जाहीर केले. मात्र यासाठी सरकारने जानेवारीतच समिती नेमली होती आणि गेल्याच महिन्यात अधिवेशनातही सरकारने हा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे निवडणूक काळात याचा कितपत फायदा होईल, याबाबत साशंकता आहे.इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीमुळे जे नागरिक त्रस्त आहेत, त्याबद्दल देखील शासनाने हालचाल सुरु केली आहे. त्यात लोकांना दिलासा मिळेल, असा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.