शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; जिल्हाधिकाऱ्यांना समस्या सोडविण्याचे दिले आदेश

By अजित मांडके | Updated: July 15, 2022 19:05 IST

Eknath Shinde : जिल्ह्यात होणाऱ्या वाहतूक कोंडी बाबत जिल्ह्यातील संबधींत यंत्रणाची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.

ठाणे  : शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात मागील आठ ते दहा दिवसापासून होणाऱ्या वाहतूक कोंडीची अखेर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी फोन करुन ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तातडीची बैठक घेऊन समस्या सोडविण्यासाठी पावले उचलावीत, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता जिल्हाधिकारी देखील त्या कामाला लागले असून वाहतूक कोंडीचा अभ्यास करुन ती सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

सतत पडत असलेला पाऊस आणि रस्त्यांवर पडलेल्या खड्यांमुळे शुक्रवारी देखील मुंबई- नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. साकेत ते रांजनोली, साकेत ते माजिवडा जंक्शन, मुंब्रा बायपास आणि शिळफाटा येथे वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले. साकेत पुलावर, पुढे खारेगाव टोलनाक्यावर पडलेल्या खड्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे दिसून आले आहे. तसेच मुंब्रा बायपासवर देखील खड्डे पडले असून माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येथील रस्त्यांच्या पाहणी केली होती. या पाहणीत बायपासवर मोठ मोठे खड्डे असल्याचेही निर्दशनास आले आहे. त्यामुळे या भागात आणि शिळफाटा मार्गावरही वाहतुक कोंडी होतांना दिसत आहे. 

या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगा थेट ठाण्यात कॅडबरी ते नितीन कंपनी र्पयत जातांना दिसत आहेत. त्यामुळे ठाणेकरांचेही हाल होत आहेत. त्यामुळे वाहन चालकांना पाच ते सात मिनिटाचे अंतर कापण्यासाठी एक ते दीड तासांचा कालावधी जात होता. त्यात शुक्रवारी महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला देखील दिवा ते ठाणे हे अंतर कापण्यासाठी तब्बल तीन तासांचा कालावधी लागल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीची दखल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून त्यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना फोन करुन यावर तातडीने तोडगा काढण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात होणाऱ्या वाहतूक कोंडी बाबत जिल्ह्यातील संबधींत यंत्रणाची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे