शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांची कमान अर्धवट अवस्थेत

By पंकज पाटील | Updated: April 25, 2023 18:11 IST

सकल मराठा समाजाच्या वतीने पालिकेत आंदोलन

बदलापूर : बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्वागत कमान उभारावी, या मागणीसाठी सकल मराठा समाजाने आज पालिकेत धडक दिली. यावेळी मुख्याधिकारी उपस्थित नसल्यान त्यांच्या खुर्चीला मराठा समाजाने निवेदन चिटकवले. 

अंबरनाथ आणि बदलापूरच्या सीमेवर बेलवली परिसरात बदलापूर नगरपालिकेची एक लोखंडी स्वागत कमान होती. या कमानीला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले होते. मात्र याठिकाणी उड्डाणपुलाचे काम करायचे असल्याचे सांगत पालिकेने ही कमान हटवली आणि काही अंतरावर पर्यायी सिमेंट काँक्रिटची कमान उभारण्याचे काम सुरू केले. मात्र हे कामही गेल्या ७ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत रखडून पडली आहे. रस्त्याच्या मधोमध अर्धवट उभारलेले पिलर्स गेल्या ५ वर्षांपासून सोडून देण्यात आले आहेत.

याबाबत वारंवार मागण्या करून आणि निवेदने देऊनही पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याचा सकल मराठा समाजाचा आरोप आहे. याचा जाब विचारण्यासाठी आज सकल मराठा समाजाने बदलापूर पालिकेत धडक दिली. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख, काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव, भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या सर्वांनी आपल्या मागणीसाठी मुख्याधिकारी योगेश गोडसे यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता गोडसे हे पालिकेत उपस्थित नव्हते. त्यामुळे पालिकेच्या प्रभारी उपमुख्याधिकारी यांनी निवेदन स्वीकारले. मराठा समाजाने यावेळी आक्रमक भूमिका घेत थेट मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकवले. मुख्याधिकारी जेव्हा येतील, तेव्हा त्यांना आधी हे निवेदन मिळेल, असे यावेळी अविनाश देशमुख यांनी सांगितले. तर बदलापूर पालिकेवर मागील ३ वर्षांपासून प्रशासकीय राजवट असून या कालावधीत प्रशासनाने या कमानीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संभाजी शिंदे यांनी केला. दुसरीकडे फक्त बदलापूर पश्चिमच नव्हे, तर पूर्वेलाही महामार्गावर कार्मेल शाळेसमोर कमान उभारण्याची मागणी संजय जाधव यांनी केली.

दरम्यान, यावेळी अविनाश देशमुख यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. छत्रपती शिवाजी महाराजांची कमान ७ वर्ष पालिकेला उभारता येत नाही, पालिकेचे अधिकारी झोपा काढतात का? असा सवाल त्यांनी केला. तसेच ज्या ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे त्या ठिकाणी इमारतीचे काम सुरू करण्यात आल्याने त्याबाबत देखील आक्षेप नोंदवण्यात आला.

टॅग्स :ambernathअंबरनाथ