शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांची कमान अर्धवट अवस्थेत

By पंकज पाटील | Updated: April 25, 2023 18:11 IST

सकल मराठा समाजाच्या वतीने पालिकेत आंदोलन

बदलापूर : बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्वागत कमान उभारावी, या मागणीसाठी सकल मराठा समाजाने आज पालिकेत धडक दिली. यावेळी मुख्याधिकारी उपस्थित नसल्यान त्यांच्या खुर्चीला मराठा समाजाने निवेदन चिटकवले. 

अंबरनाथ आणि बदलापूरच्या सीमेवर बेलवली परिसरात बदलापूर नगरपालिकेची एक लोखंडी स्वागत कमान होती. या कमानीला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले होते. मात्र याठिकाणी उड्डाणपुलाचे काम करायचे असल्याचे सांगत पालिकेने ही कमान हटवली आणि काही अंतरावर पर्यायी सिमेंट काँक्रिटची कमान उभारण्याचे काम सुरू केले. मात्र हे कामही गेल्या ७ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत रखडून पडली आहे. रस्त्याच्या मधोमध अर्धवट उभारलेले पिलर्स गेल्या ५ वर्षांपासून सोडून देण्यात आले आहेत.

याबाबत वारंवार मागण्या करून आणि निवेदने देऊनही पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याचा सकल मराठा समाजाचा आरोप आहे. याचा जाब विचारण्यासाठी आज सकल मराठा समाजाने बदलापूर पालिकेत धडक दिली. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख, काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव, भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या सर्वांनी आपल्या मागणीसाठी मुख्याधिकारी योगेश गोडसे यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता गोडसे हे पालिकेत उपस्थित नव्हते. त्यामुळे पालिकेच्या प्रभारी उपमुख्याधिकारी यांनी निवेदन स्वीकारले. मराठा समाजाने यावेळी आक्रमक भूमिका घेत थेट मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकवले. मुख्याधिकारी जेव्हा येतील, तेव्हा त्यांना आधी हे निवेदन मिळेल, असे यावेळी अविनाश देशमुख यांनी सांगितले. तर बदलापूर पालिकेवर मागील ३ वर्षांपासून प्रशासकीय राजवट असून या कालावधीत प्रशासनाने या कमानीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संभाजी शिंदे यांनी केला. दुसरीकडे फक्त बदलापूर पश्चिमच नव्हे, तर पूर्वेलाही महामार्गावर कार्मेल शाळेसमोर कमान उभारण्याची मागणी संजय जाधव यांनी केली.

दरम्यान, यावेळी अविनाश देशमुख यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. छत्रपती शिवाजी महाराजांची कमान ७ वर्ष पालिकेला उभारता येत नाही, पालिकेचे अधिकारी झोपा काढतात का? असा सवाल त्यांनी केला. तसेच ज्या ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे त्या ठिकाणी इमारतीचे काम सुरू करण्यात आल्याने त्याबाबत देखील आक्षेप नोंदवण्यात आला.

टॅग्स :ambernathअंबरनाथ