शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांची कमान अर्धवट अवस्थेत

By पंकज पाटील | Updated: April 25, 2023 18:11 IST

सकल मराठा समाजाच्या वतीने पालिकेत आंदोलन

बदलापूर : बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्वागत कमान उभारावी, या मागणीसाठी सकल मराठा समाजाने आज पालिकेत धडक दिली. यावेळी मुख्याधिकारी उपस्थित नसल्यान त्यांच्या खुर्चीला मराठा समाजाने निवेदन चिटकवले. 

अंबरनाथ आणि बदलापूरच्या सीमेवर बेलवली परिसरात बदलापूर नगरपालिकेची एक लोखंडी स्वागत कमान होती. या कमानीला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले होते. मात्र याठिकाणी उड्डाणपुलाचे काम करायचे असल्याचे सांगत पालिकेने ही कमान हटवली आणि काही अंतरावर पर्यायी सिमेंट काँक्रिटची कमान उभारण्याचे काम सुरू केले. मात्र हे कामही गेल्या ७ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत रखडून पडली आहे. रस्त्याच्या मधोमध अर्धवट उभारलेले पिलर्स गेल्या ५ वर्षांपासून सोडून देण्यात आले आहेत.

याबाबत वारंवार मागण्या करून आणि निवेदने देऊनही पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याचा सकल मराठा समाजाचा आरोप आहे. याचा जाब विचारण्यासाठी आज सकल मराठा समाजाने बदलापूर पालिकेत धडक दिली. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख, काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव, भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या सर्वांनी आपल्या मागणीसाठी मुख्याधिकारी योगेश गोडसे यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता गोडसे हे पालिकेत उपस्थित नव्हते. त्यामुळे पालिकेच्या प्रभारी उपमुख्याधिकारी यांनी निवेदन स्वीकारले. मराठा समाजाने यावेळी आक्रमक भूमिका घेत थेट मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकवले. मुख्याधिकारी जेव्हा येतील, तेव्हा त्यांना आधी हे निवेदन मिळेल, असे यावेळी अविनाश देशमुख यांनी सांगितले. तर बदलापूर पालिकेवर मागील ३ वर्षांपासून प्रशासकीय राजवट असून या कालावधीत प्रशासनाने या कमानीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संभाजी शिंदे यांनी केला. दुसरीकडे फक्त बदलापूर पश्चिमच नव्हे, तर पूर्वेलाही महामार्गावर कार्मेल शाळेसमोर कमान उभारण्याची मागणी संजय जाधव यांनी केली.

दरम्यान, यावेळी अविनाश देशमुख यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. छत्रपती शिवाजी महाराजांची कमान ७ वर्ष पालिकेला उभारता येत नाही, पालिकेचे अधिकारी झोपा काढतात का? असा सवाल त्यांनी केला. तसेच ज्या ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे त्या ठिकाणी इमारतीचे काम सुरू करण्यात आल्याने त्याबाबत देखील आक्षेप नोंदवण्यात आला.

टॅग्स :ambernathअंबरनाथ