शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

अंबरनाथ, बदलापूर स्थानकात प्रवाशांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:40 IST

अंबरनाथ : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या पाहून राज्य सरकारने गुरुवारी रात्रीपासून पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये सर्वसामान्यांच्या लोकल ...

अंबरनाथ : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या पाहून राज्य सरकारने गुरुवारी रात्रीपासून पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे रेल्वे पोलिसांकडून काटेकोरपणे पालन केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वेस्थानकात प्रत्येक रेल्वे प्रवाशाच्या ओळखपत्राची तपासणी करूनच प्रवेश दिला जात होता.

अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वेस्थानकातून दररोज हजारो प्रवासी मुंबई, ठाणे, नवी मुंबईला नोकरीसाठी प्रवास करतात. मात्र, आता राज्य सरकारच्या आदेशानुसार फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश देण्याचे राज्य सरकारचे आदेश असून, त्याची अंमलबजावणी अंबरनाथ रेल्वेस्थानकात केली जात आहे, तर बदलापूर स्थानकात प्रत्येक प्रवाशाचे ओळखपत्र तपासून प्रवाशाला प्रवेश दिला जात होता. सकाळपासून रेल्वे पोलिसांनी अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर बंदोबस्त ठेवला असून, प्रवाशांना ओळखपत्र पाहूनच तिकीट आणि रेल्वेस्थानकात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे अनेक सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेस्थानकाच्या दारातूनच माघारी जावे लागले.

अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांनीही रेल्वेतून प्रवास करण्याचा प्रयत्न सकाळी केला. मात्र, त्यांना पोलिसांनी अडवून पुन्हा घरचा रस्ता दाखवला. अनेक कर्मचाऱ्यांनी नियमांचे पालन करीत घरीच राहणे पसंत केले. अनेक नागरिकांना तिकीट खिडकीवर तिकीट नाकारण्यात आले. कामावर निघालेल्या काही सर्वसामान्य नागरिकांनी बस आणि खासगी वाहनांचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याठिकाणीही त्यांच्या वाट्याला निराशाच आली.