शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

डीजेच्या जमान्यात ढोलताशा टिकवण्याचे मोठे आव्हान- छत्रपती संभाजी राजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 01:00 IST

डोंबिवलीत झालेल्या राज्यस्तरीय तालसंग्राम ढोलताशा स्पर्धेत ‘मावळे आम्ही ढोलताशांचे’ या पथकाची बाजी

डोंबिवली : ढोलताशा ही पारंपरिक वाद्ये संस्कृतीचा भाग आहेत. डीजेच्या दणदणाटात ही वाद्यसंस्कृती टिकवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. अनेक पारंपरिक खेळही लुप्त होत आहेत. हा सर्व सांस्कृतिक ठेवा जपायचा असल्यास विविध ठिकाणी ढोलताशा पथक, लाठीकाठीची प्रात्यक्षिके करणारे संघ तयार होणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘तालसंग्राम’सारख्या स्पर्धा भरवून प्रात्साहन दिले पाहिजे. महाराष्ट्राच्या किल्ले संवर्धन समितीचा अध्यक्ष म्हणून त्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिले. स्पर्धेत ‘मावळे आम्ही ढोलताशांचे’ या पथकाने बाजी मारली.आरंभ प्रतिष्ठानतर्फे झालेल्या तालसंग्राम २०१९ या राज्यस्तरीय ढोलताशा स्पर्धेला रविवारी संभाजी राजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी किल्ले संवर्धनाचे महत्त्व, गरज आणि व्याप्ती विशद करताना पारंपरिक वाद्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आयोजकांनी केलेला प्रयत्न स्तुत्य असल्याचे सांगितले. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष निशांत चव्हाण, स्पर्धेचे प्रमुख सल्लागार अनिकेत घमंडी, यज्ञेश पाटील, श्रीकांत घोगरे, हृषीकेश पाठक आदींसह आरंभ प्रतिष्ठानतर्फे संभाजी राजे यांना मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.राज्यभरातून या स्पर्धेत एकूण १६ पथके सहभागी झाली होती. त्यामध्ये ‘मावळे आम्ही ढोलताशांचे’ (डोंबिवली) पथकाने प्रथम क्रमांक, तर ‘कालभैरव’ (रत्नागिरी) द्वितीय, शिवस्वरूप’ने (भिवंडी) तिसरे पारितोषिक पटकावले. तसेच उत्कृष्ट ढोलवादक म्हणून लतिका मोरे, उत्कृष्ट ताशावादक सिद्धेश पटारे, उत्कृष्ट टोलवादक एॅलवोन फर्नांडिस, तर उत्कृष्ट ध्वजधारी म्हणून मधुरा के. या स्पर्धकांनी मान पटकावला. शिस्तबद्ध पथक म्हणून औरंगाबादच्या ‘आपलंच वाद्य’ या पथकाचा सन्मान करण्यात आला.विजेत्या पथकाला दीड लाखांचे पारितोषिक देऊ न चव्हाण यांच्या हस्ते गौरवण्यात आले. तर उपविजेत्या पथकाला एक लाखांचे पारितोषिक देऊ न केंद्रे यांच्या हस्ते, तर तृतीय क्रमांकाला ५० हजारांचे पारितोषिक देऊ न विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी गौरवले. वैयक्तिक पारितोषिक जिंकणाऱ्यांनाही मान्यवरांनी सन्मानित केले. ही स्पर्धा यापुढेही सुरू राहण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिले. तर दीपेश म्हात्रे यांनी आगामी काळात ही स्पर्धा डोंबिवली पश्चिमेला खाडीकिनारी भरवण्यात यावी, असे आवाहन केले. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोट्यवधींच्या निधीची विशेष तरतूद केली आहे. त्या समितीचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे आहेत. रायगड येथेदेखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचे प्रामुख्याने संवर्धन, जतन करण्यासाठी राजांनी आवर्जून यावे, सूचना द्याव्यात, असेही मत चव्हाण यांनी व्यक्त केले. आरंभ प्रतिष्ठानला शिवजयंतीला दिल्लीमध्ये त्यांची कला सादर करण्यासाठी संभाजी राजांनी संधी दिल्याचे त्यांनी जाहीर केले.सोहळ्याच्या शुभारंभाला उद्घाटक म्हणून महापौर विनीता राणे, नाशिक जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ चौधरी, बसपाचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर, कल्पना किरतकर, मुकुंद पेडणेकर, सभापती साई शेलार, माजी नगरसेविका शिल्पा शेलार, नगरसेविका ज्योती मराठे, ठामपाचे नगरसेवक संजय वाघुले, शशिकांत कांबळे, संजीव बीडवाडकर, रवी ठाकूर, उपायुक्त सुनील जोशी आदींनी आवर्जून उपस्थिती लावली.पद्मश्री वामन केंद्रे यांचा सत्कार‘नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा’चे माजी संचालक वामन केंद्रे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचा सर्वप्रथम जाहीर सत्कार प्रतिष्ठानतर्फे संभाजी राजे यांच्या हस्ते झाला. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गडकिल्ले संवर्धनासाठी विशेष मोहीम सुरू केल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार छत्रपती संभाजी राजेंनी केला.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती