शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

उल्हासनगर महापालिकेच्या १ हजार ६४ मालमत्तांना मिळणार सनद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:45 IST

उल्हासनगर : महापालिका मालमत्तेचे अतिक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी १ हजार ६४ मालमत्तांना सनद मिळण्यासाठी मंगळवारी आयुक्तांसोबत उपविभागीय अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी, ...

उल्हासनगर : महापालिका मालमत्तेचे अतिक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी १ हजार ६४ मालमत्तांना सनद मिळण्यासाठी मंगळवारी आयुक्तांसोबत उपविभागीय अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी, तहसीलदार व भूमापन अधिकारी यांच्यात संयुक्त बैठक झाली. यामध्ये महापालिकेची विविध कार्यालये, शाळा, मैदाने, उद्याने, समाजमंदिर, शौचालये आदी मालमत्तांचा समावेश आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ७० टक्के आरक्षित भूखंडांवर यापूर्वीच अतिक्रमण झाले असून, भूमाफियांनी आपला मोर्चा शाळा इमारत, उद्याने, शौचालये, खुल्या जागांकडे वळविला. शहरातील जागांवर राज्य शासनाचा मालकीहक्क असल्याने विकासकामावेळी महापालिकेला अडथळ्यांची शर्यत पूर्ण करावी लागते. दरम्यान, कब्रस्तानचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर तत्कालीन महापौर पंचम कलानी यांनी आयडीआय कंपनीजवळील भूखंड हा कब्रस्तानसाठी, गोलमैदान, महापालिका मुख्यालय, तरणतलाव, हिराघाट बोट क्लब, इंदिरा गांधी भाजी मार्केट, व्हीटीसी ग्राऊंड यांच्यासह उद्याने, मैदाने, शाळा, प्रभाग कार्यालये अशा एकूण १६५ मालमत्तांना सनद देण्याची मागणी उपविभागीय कार्यालय, तसेच राज्य शासनाकडे केली. मात्र आजपर्यंत फक्त आठ मालमत्तांना सनद म्हणजे मालकीहक्क मिळाला आहे.

महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी एक पाऊल पुढे टाकून आयुक्त डॉ. राजा दयानिधी, महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांच्यासह प्रभाग व विशेष सभापती, विविध पक्षाचे गटनेते व नगरसेवकांना विश्वासात घेऊन महापालिकेच्या ताब्यातील तब्बल १ हजार ६४ मालमत्तांना सनद मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या मालमत्तांना सनद मिळाल्यास त्या अतिक्रमण व भूमाफियापासून वाचणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी एका सल्लागार पथकाची नियुक्त केली असून सुरुवातीला सल्लागार पथक तीन महिन्यात १६५ मालमत्तांचा आराखडा उपविभागीय कार्यालयाला सनद मिळण्यासाठी सादर करणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.

..........

महापालिका मालमत्तांचे होणार संरक्षण

महापालिकेने मालमत्ता संरक्षणासाठी सुरू केलेल्या कारवाईचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. मालमत्तांना सनद मिळाल्यास अतिक्रमणाचा धोका टळणार असून, विकासासाठीचे अडथळे दूर होणार आहे.