शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

दुकानांच्या वेळेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:41 IST

कल्याण : कोरोनाच्या प्रादुर्भावात केडीएमसीने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानदारांना सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या कालावधीतच दुकाने उघडी ...

कल्याण : कोरोनाच्या प्रादुर्भावात केडीएमसीने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानदारांना सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या कालावधीतच दुकाने उघडी ठेवावीत, या घातलेल्या निर्बंधांबाबत व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांची भेट घेऊन वेळेत बदल करण्याची मागणी त्यांनी केली होती. यावर सोमवारी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याचे सुधारित आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत.

अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकानांना सकाळी ७ ते रात्री ७ या कालावधीतच सुरू ठेवण्याच्या मर्यादा घालून दिल्या असताना पोळीभाजी केंद्रे, खाद्यगृहे, बार-रेस्टॉरंट, परमिट रूम, आइस्क्रीम पार्लर, ज्युसची दुकाने यांना मात्र ११ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावात वेळेचे बंधन योग्य आहे; परंतु निर्बंधांच्या वेळेत बदल करून देण्याची मागणी व्यापारीवर्गाने केली होती. महापालिकेने घालून दिलेले पी १ पी २ चे निर्बंध व सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेत दुकाने चालू ठेवण्याच्या निर्णयात काहीसा बदल होणे अतिशय आवश्यक असल्याकडे व्यापाऱ्यांनी लक्ष वेधले होते. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणे सोयीचे व्हावे व व्यापाऱ्यांना आपल्या दैनंदिन व्यवहारात सुसूत्रता आणता यावी, यासाठी महापालिकेने सकाळी ७ ऐवजी सकाळी ९ ते रात्री ९ अशी वेळ ठेवावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. दरम्यान, शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर सोमवारी व्यापाऱ्यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचीही भेट घेतली. या चर्चेअंती निर्बंधांच्या वेळेत बदल करण्यात आले असले, तरी पी १ पी २ च्या नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

----------------------------------------------------