शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
2
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
3
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
4
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
5
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
6
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
7
Tesla Model Y सेफ्टी टेस्टमध्ये 'Pass' की 'Fail'? 5-स्टार रेटिंगमध्ये किती पॉइंट्स मिळाले? जाणून घ्या
8
“बिहारने जंगलराज नाकारून विकासाला मत दिले”; शिंदेंनी केले PM मोदी-नितीश कुमारांचे अभिनंदन
9
Metaचे मोठे पाऊल! WhatsApp मध्ये लवकरच येणार 'हे' जबरदस्त फीचर; वारंवार लॉग-इन करण्याची कटकट संपणार
10
मुलांच्या भविष्यासाठी सोने की SIP? 'या' दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे समजून घ्या आणि योग्य गुंतवणूक निवडा!
11
...त्यामुळे सर्व छोट्या मोठ्या कुरुबरी अमित शाह यांना जाऊन सांगितल्या जातात; काँग्रेसचा टोला
12
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
13
बाजारात तेजीचा डबल धमका! निफ्टी वर्षभरानंतर २६,२०० पार, गुंतवणूकदारांची ६८,००० कोटींची कमाई
14
Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई
15
सप्तपदी झाले, डीजेवर नाचली, पाठवणीच्या वेळी पसार, नवरदेव म्हणतो, "जमीन गहाण ठेवून लग्न..."
16
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
17
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
18
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
19
EVM मध्ये ३६ मतांची आघाडी, पण ३६० पोस्टल मते बाद झाली आणि पारडे फिरले, बिहारमधील अजब निकाल चर्चेत
20
Supreme Court: संसद न्यायालयीन निर्णयावर कुरघोडी करू शकत नाही; लवाद सुधारणा कायद्याच्या तरतुदी सुप्रीम कोर्टाकडून रद्द
Daily Top 2Weekly Top 5

चाणक्यांचे राज्यशास्त्रीय नियम आजही पडतात लागू; प्राची दामले यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 22:36 IST

‘आजच्या संदर्भात, कौटिलीय, अर्थशास्त्रातील राज्यव्यवस्था’ विषयावर मार्गदर्शन

डोंबिवली : अर्थशास्त्र हे केवळ पैशांसंदर्भातील शास्त्र नसून, ते खरेतर समग्र राज्यशास्त्रच आहे. आर्य चाणक्य यांनी इसवीसनापूर्वी लिहिलेले अर्थशास्त्र आणि चाणक्याचे राज्यशास्त्रीय नियम आजच्या काळासंदर्भात लागू पडतात, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. प्राची दामले यांनी केले.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेतर्फे ‘आजच्या संदर्भात, कौटिलीय, अर्थशास्त्रातील राज्यव्यवस्था’ या विषयावर दामले यांचे व्याख्यान नुकतेच झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. पूर्वेतील श्री गणेश मंदिर संस्थानच्या विनायक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेच्या कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे, कार्यवाह डॉ. धनश्री साने उपस्थित होत्या.दामले म्हणाल्या, ‘उन्मत्त धनाढ्यांचा पाडाव करून चंद्रगुप्त यांना गादीवर बसले. हे करताना चाणक्य यांनी जनतेतील असंतोषाचा उपयोग करून सत्तांतर घडविताना चंद्रगुप्त यांच्या रूपाने सशक्त पर्याय दिला. चंद्रगुप्त यांना अंतर्गत विरोध होणार, त्यांच्या हत्येचे प्रयत्न होणार हे गृहीत धरून चाणक्य यांनी अतिशय चाणाक्षपणे व्यूहरचना केली. चाणक्यांच्या मार्गदर्शनाने चंद्रगुप्त यांनी आपले साम्राज्य बंगालच्या उपसागरापासून ते दक्षिणेपर्यंत विस्तारले. एवढेच नव्हे तर सम्राट अलेक्झांडरशी यशस्वी झुंज दिली. त्यावेळेच्या भारतीय समाजाचे वर्णन मॅगेस्थेनिस, फान किंवा ह्यूएनसंग या प्रवाशाने लिहून ठेवले आहे की, इथले लोक अतिशय नैतिक वर्तन करतात. घराला कुलुपे नसतात आणि सुसंपन्न, असा हा समाज आहे, असे त्यात लिहिले आहे.’‘रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या किंवा मलमूत्र विसर्जन करणाºयाला दंड करावा. जकात किती वसूल करावी. ऐपत असताना कर दिला नाही किंवा बुडवला तर दंड तसेच सुवर्ण व्यावसायिक आणि वैद्यक व्यावसायिक लोकांची फसवणूक करू शकतात म्हणून त्यांच्यासाठी नियमावली, राजाला जागे ठेवण्याचे काम मंत्र्यांनी करायला हवे, अशी अनेक सूत्रे चाणक्य यांनी सांगितली आहेत. ही सूत्रे आजच्या काळातही लागू पडतात,’ असे त्यांनी सांगितले. चाणक्यांच्या सात सूत्रांना सप्तांग राज्यव्यवस्थेच्या सर्वच अंगाचा परिचय दामले यांनी करून दिला.यावेळी श्रीकांत पावगी, डॉ, ललिता नामजोशी, डॉ. सदाशिव देव, प्रकाश पाटील, सुभाष मुंदडा, वसंत चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पूर्वी मसापचे डोंबिवली शाखेचे अध्यक्ष आणि साहित्यिक वामनराव देशपांडे यांचा ७५ व्या वर्षानिमित्त सत्कार करण्यात आला. दरमयान, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश देशंपाडे तर, सूत्रसंचालन वृंदा कौजलगीकर यांनी केले.प्रजेचा आनंद हाच राजाचा आनंदराजाच्या कर्तव्याची जाणीव करून देताना प्रजेचा आनंद हाच राजाचा आनंद असायला हवा, नव्हे ते तर व्रत असायला हवे तसेच राजाचा दिवसभराचे नियोजन कसे असावे, हेरखाते त्यांचे कामकाज,अर्थव्यवस्था, संरक्षणव्यवस्था, प्रजेच्या भेटीगाठी हे सांगून राजा हा पगारी नोकरासारखा असतो. त्यांच्या मनोरंजनाच्या वेळाही चाणक्य यांनी ठरवून दिल्या होत्या, असे दामले म्हणाल्या.