शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

उल्हासनगरला रुळांवर आणण्याचे आव्हान

By admin | Updated: September 23, 2016 03:11 IST

उल्हासनगरची घसरलेली गाडी पुन्हा रुळांवर आणण्याचे सर्वात मोठे आव्हान नवनियुक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यापुढे राहणार आहे.

उल्हासनगर : उल्हासनगरची घसरलेली गाडी पुन्हा रुळांवर आणण्याचे सर्वात मोठे आव्हान नवनियुक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यापुढे राहणार आहे. गुरुवारी सकाळी त्यांनी मावळते आयुक्त मनोहर हिरे यांच्याकडून पदभार स्वीकारला. पालिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याबरोबरच विकासकामांना चालना देण्याची जबाबदारी त्यांना पेलावी लागणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे.उल्हासनगर पालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी आयएएस दर्जाचा आयुक्त देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, डॉ. योगेश म्हसे यांची आयुक्तपदी नियुक्ती केली. मात्र, म्हसे यांनी पदभार स्वीकारला नसल्याने त्यांची बदली भिवंडी महापालिकेत, तर भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांची नियुक्ती उल्हासनगर पालिकेच्या आयुक्तपदी केली. निंबाळकर यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. पालिकेला उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करावे लागणार आहे. तसेच सरकारच्या प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. पालिकेचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी सरकारकडे करावी लागणार आहे. सध्याच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन पाणी, आरोग्य, साफसफाई, रस्ते, कचरामुक्त शहर यांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. कनिष्ठ लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांवर विभागप्रमुखासह सहायक आयुक्तपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे सर्व विभागांत सावळागोंधळ निर्माण झाल्याचा आरोप होत आहे. पालिकेची ३०० कोटींची पाणीपुरवठा योजना ठप्प असून मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. नगररचनाकार विभागाने दिलेले बांधकाम परवाने वादात सापडले असून नगररचनाकार संजीव करपे महिनाभरापासून बेपत्ता झाले आहेत. डम्पिंग ओव्हर फ्लो झाल्याचे कारण दाखवून कंत्राटदार कचरा अनियमितपणे उचलत असल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरली आहे. युतीच्या १० वर्षांच्या सत्तेच्या काळात ४०० कोटींपेक्षा जास्त खर्च रस्ताबांधणीवर होऊनही चाळण झाली आहे. श्रमसाफल्य गृहसंकल्पाच्या अवघ्या सात इमारती पूर्ण करण्यात कंत्राटदाराला यश आले आहे. तसेच आठ वर्षांत गृहसंकल्पाचे बजेट २५ कोटींवर गेले आहे. कल्याण-अंबरनाथ महामार्गाचे रुंदीकरण झाल्यानंतर पुनर्बांधणी वर्षापासून रखडली असून अनेकांचे रस्ते अपघातात बळी गेले आहेत. स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून आरोग्य सेवा कागदावर आहे.