शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

उल्हासनगरला रुळांवर आणण्याचे आव्हान

By admin | Updated: September 23, 2016 03:11 IST

उल्हासनगरची घसरलेली गाडी पुन्हा रुळांवर आणण्याचे सर्वात मोठे आव्हान नवनियुक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यापुढे राहणार आहे.

उल्हासनगर : उल्हासनगरची घसरलेली गाडी पुन्हा रुळांवर आणण्याचे सर्वात मोठे आव्हान नवनियुक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यापुढे राहणार आहे. गुरुवारी सकाळी त्यांनी मावळते आयुक्त मनोहर हिरे यांच्याकडून पदभार स्वीकारला. पालिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याबरोबरच विकासकामांना चालना देण्याची जबाबदारी त्यांना पेलावी लागणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे.उल्हासनगर पालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी आयएएस दर्जाचा आयुक्त देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, डॉ. योगेश म्हसे यांची आयुक्तपदी नियुक्ती केली. मात्र, म्हसे यांनी पदभार स्वीकारला नसल्याने त्यांची बदली भिवंडी महापालिकेत, तर भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांची नियुक्ती उल्हासनगर पालिकेच्या आयुक्तपदी केली. निंबाळकर यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. पालिकेला उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करावे लागणार आहे. तसेच सरकारच्या प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. पालिकेचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी सरकारकडे करावी लागणार आहे. सध्याच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन पाणी, आरोग्य, साफसफाई, रस्ते, कचरामुक्त शहर यांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. कनिष्ठ लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांवर विभागप्रमुखासह सहायक आयुक्तपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे सर्व विभागांत सावळागोंधळ निर्माण झाल्याचा आरोप होत आहे. पालिकेची ३०० कोटींची पाणीपुरवठा योजना ठप्प असून मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. नगररचनाकार विभागाने दिलेले बांधकाम परवाने वादात सापडले असून नगररचनाकार संजीव करपे महिनाभरापासून बेपत्ता झाले आहेत. डम्पिंग ओव्हर फ्लो झाल्याचे कारण दाखवून कंत्राटदार कचरा अनियमितपणे उचलत असल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरली आहे. युतीच्या १० वर्षांच्या सत्तेच्या काळात ४०० कोटींपेक्षा जास्त खर्च रस्ताबांधणीवर होऊनही चाळण झाली आहे. श्रमसाफल्य गृहसंकल्पाच्या अवघ्या सात इमारती पूर्ण करण्यात कंत्राटदाराला यश आले आहे. तसेच आठ वर्षांत गृहसंकल्पाचे बजेट २५ कोटींवर गेले आहे. कल्याण-अंबरनाथ महामार्गाचे रुंदीकरण झाल्यानंतर पुनर्बांधणी वर्षापासून रखडली असून अनेकांचे रस्ते अपघातात बळी गेले आहेत. स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून आरोग्य सेवा कागदावर आहे.