शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

बाप्पांच्या स्वागतासाठी चाकरमानी निघाले गावाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:32 IST

पाच दिवसांत लालपरीच्या ८२३ फेऱ्या : ७७६ गाड्या हाउसफुल्ल, शनिवारी सर्वाधिक ५८५ फेºया

पंकज रोडेकर।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गौरी-गणपतीसाठी चाकरमान्यांना गावी सुखरुप नेण्यासाठी लालपरी सज्ज झाली आहे. यानुसार ८२३ जादा फेºया सोडण्याचा निर्णय महाराष्टÑ राज्य परिवहन मंडळाच्या ठाणे विभागाने घेतला असून आतापर्यंत ७७६ फेऱ्यांचे बुकिंग झाले आहे. मागणी वाढल्यास फेºया वाढवण्यात येणार आहेत. त्यातच बुधवारपासून (आज) चाकरमानी गावी निघणार असून ३१ आॅगस्टला सर्वाधिक ५८५ जादा फेºया होणार असल्याने परिवहन विभागाची मोठ्याप्रमाणात धावाधाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दिवशी चाकरमान्यांची बस चुकू नये यासाठी विशेष आॅपरेशन राबवले जाणार आहे.यंदा गणेश चतुर्थी येत्या २ सप्टेंबर रोजी असल्याने त्यानिमित्त कोकणात जाणाºया गणेश भक्तांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. तर कोकणात जाण्याकरीता एसटीच्या ठाणे विभागामार्फत गतवर्षापेक्षा यंदाही योग्यरित्या जादा फेºयांचे सोडण्याचे नियोजन केले आहे. मात्र, तरीसुद्धा आणखी जादा बस सोडण्याची तयारी करून ठेवल्याचे विभागाकडून सांगण्यात येते. ठाणे विभागातील ९ आगारातून २८ आॅगस्ट ते ०१ सप्टेंबर दरम्यान या जादा फेºया सोडण्यात येणार आहेत.या जादा गाड्यांचे आरक्षण संगणकीय आरक्षण पद्धत उपलब्ध करून दिली. ते एक महिना अगोदरपासून उपलब्ध करून दिले आहे. तसेच ग्रुप पद्धतीचे आरक्षण ४० दिवस आधी सुरू झाले असून त्यासाठी आगार व्यवस्थापकांकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. त्याचबरोबर परतीच्या आरक्षणासाठी व्यवस्था तत्काळ उपलब्ध करून दिले असून परतीचा प्रवास हा ८ ते १५ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याची माहिती विभागाने दिली.३१ आॅगस्टला सुटणाºया ५८५ बस बुकच्कोकणात जाण्यासाठी २८ आॅगस्ट ते १ सप्टेंबर असे पाच दिवस जादा बस सोडण्यात येणार आहेत. २८ आॅगस्टला बुधवार असून अवघ्या दोन जादा बस सुटणार आहेत. तर २९ आॅगस्टला २४, ३० आॅगस्टला १२२, ३१ आॅगस्ट या दिवशी सर्वाधिक ५८५ तर १ सप्टेंबर रोजी सध्यातरी ९० एसटी बस सोडण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर नियमित २२ बस ही धावणार आहेत.रत्नागिरीकर आघाडीवर : बाप्पांच्या स्वागतासाठी बुकींग करणाºयांमध्ये रत्नागिरीकर आघाडीवर आहेत. त्यापाठोपाठ दापोली, गुहागर, चिपळूण आणि खेड येथील चाकरमानी आहेत.३१ आॅगस्टला खरी कसरत : ३१ आॅगस्टला सध्या ५८५ बसेस बुक झाल्या आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिवसात विशेष आॅपरेशन एसटी विभागामार्फत राबवले जाते. जेणे करून बसमध्ये जागा बुकींग केलेल्या चाकरमान्याला त्याच्या बसपर्यंत सहज पोहोचता येईल, हा त्या मागचा उद्देश असतो. त्यामुळे या दिवशी खºया अर्थाने कसरत आहे. गणेशोत्सवाच्या काळात जनरल आणि गणपतीसाठी सोडण्यात येणाºया गाड्यांसाठी स्वंतत्र व्यवस्था केली जाते. त्यामुळे या गाड्यांशी नियमित गाडयांचा काही संबंध येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.ग्रुपद्वारेच ३७७ बस फुल : चाकरमान्यांचा ग्रुप बुकिंग करण्याकडे जास्त कल असल्याचे दिसून येते. आतापर्यंत ग्रुपने ३७७ बस बुकिंग केल्या आहेत.त्यात राजकीय मंडळींचा भरणा अधिक आहे. ग्रुपमुळे त्यांना एसटी डेपो येण्याची गरज नाही. तसेच त्या ग्रुपने निश्चित केलेल्या ठिकाणापासून बस थेट गावाला नेली जाणार आहे.