शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही ठाण्यातील रस्ते राहणार चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:28 IST

पावसाळा सुरू झाला की, वाहनचालक आणि नागरिकांच्या पोटात गोळा येतो, कारण आपण रस्त्यावरून जात आहोत की बोटीतून हेच कळत नाही.

पावसाळा सुरू झाला की, वाहनचालक आणि नागरिकांच्या पोटात गोळा येतो, कारण आपण रस्त्यावरून जात आहोत की बोटीतून हेच कळत नाही. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, अशी परिस्थिती निर्माण होते. मात्र यंदा ठाण्यातील रस्ते चकाचक असून पावसाळ््यात खड्डे पडणार नाही असा दावा प्रशासनाने केला आहे. ठाणे पालिका रस्ते चांगले ठेवू शकते, तर अन्य पालिकांना हे का जमत नाही, हा खरा प्रश्न आहे. अजून मान्सून सुरू झालेला नाही. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची काय अवस्था आहे, याचा आढावा घेतला आहे ‘लोकमत’चे प्रतिनिधी अजित मांडके, सचिन सागरे, पंकज पाटील आणि सदानंद नाईक यांनी.दरवर्षी पावसाळा सुरु झाला की पहिल्याच पावसात ठाण्यातील बहुतेक रस्त्यांची चाळण होत होती. त्यामुळे प्रशासनावर वांरवार टीकेची झोड उठत होती. मागीलवर्षी तर खड्यांवरुन प्रशासन चांगलेच अडचणीत आले होते. परंतु आयुक्तांनी घेतलेल्या काही धाडसी निर्णयामुळे यंदाचे त्याचे परिणाम पावसाच्या आधीच दिसून आले आहेत. ठाणे शहरातील मुख्य रस्त्यांबरोबर, सेवा रस्ते तसेच अंतर्गत असलेले महत्वाच्या रस्त्यांची डागडुजी पावसापूर्वीच करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या पावसानंतरही ठाण्यात वाहनचालकांचा प्रवास हा सुसाट झाला आहे. ‘रिपोर्टर आॅन दि स्पॉट’च्या माध्यमातून शहरातील या मुख्य रस्त्यांची पाहणी केली असता हे रस्ते तूर्तास तरी सुस्थितीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे किमान संपूर्ण पावसाळ्यात हे रस्ते उखडले जाऊ नये अशी याचना मात्र ठाणेकरांना केली आहे.शहरात आजच्याघडीला ३५६ किलोमीटरचे रस्ते असून त्यातील १०८ किलोमीटरचे रस्ते हे कॉंक्रिट आणि यूटीडब्ल्युटी पध्दतीने करण्यात आले आहेत. तर उर्वरित २४८ किलोमीटरचे रस्ते हे आजही डांबरी आहेत. परंतु याच डांबरी रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दरवर्षी दिसून आले आहे. हे खड्डे बुजविण्यासाठी पालिकेला काही वेळेस पाऊस थांबण्याची वाट बघावी लागत होती. तर काहीवेळेस तात्पुरत्या स्वरुपात पेव्हरब्लॉक लावणे, खडी टाकणे असे प्रकार सुरु असतात. परंतु यामुळे त्या ठिकाणी पुन्हा खड्डा पडला जात होता. त्यामुळे या सर्वांवर रामबाण उपाय करण्यासाठी पालिकेने तीन वर्षापूर्वी जेट पॅचर मशीनचा वापर केला होता. त्यानंतर पुन्हा पॉलिमरसह इतर नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा सुध्दा वापर केला होता. परंतु हे सर्वच प्रयोग फोल ठरल्याचे दिसून आले.मागील वर्षी तर खड्यांमुळे प्रशासनावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली होती. त्यामुळे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यापुढे नवीन रस्ते हे केवळ यूटीडब्ल्युटी आणि काँक्रिटचे केले जातील असे स्पष्ट केले होते. तसेच पुढीलवर्षी ठाणेकरांना खड्यातून प्रवास करावा लागू नये यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले होते. तसेच नव्याने रस्त्यांची कामे हाती घेतली होती. यामध्ये मागील वर्षी ९०० कोटींच्या रस्त्यांचे कामांचे प्रस्ताव मंजूर केले. त्यानंतर आता मधल्या काळात ७०० कोटींच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. या रस्त्यांची कामेही सुरू झाली आहेत. त्यामुळे भविष्यात ठाणेकरांना खड्डेमुक्त प्रवासाची हमीच पालिकेने या माध्यमातून देऊ केली आहे. या रस्त्यांच्या मोहिमेत वारंवार नादुरुस्त होणारे रस्ते, त्यातील काही नॉन डीपी रस्ते, डीपी रस्ते, नूतनीकरणाचे रस्ते, मिसिंग लिंक, कॉंक्रिटचे रस्ते आणि यूटीब्ड्युटीचे असे एकूण ६९८.२७ कोटींची कामे करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच ३७ चौकांचे सुशोभीकरणही केले जात असून मिसिंग लिंकचे १३ रस्ते विकसित केले जात आहेत. याशिवाय जुन्या ठाण्याच्या विकासात अडसर ठरणाऱ्या रस्त्यांचे नियोजनही पालिकेने आखले असून नऊ मीटरपेक्षा कमी रूंदी असलेल्या रस्त्यांमुळे जुन्या ठाण्याचा रखडलेला विकास आता मार्गी लागत आहे.दरम्यान, यंदा ठाणेकरांना खड्यातून प्रवास करावा लागू नये यासाठी महापालिकेच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वीच्या कामांमध्ये रस्त्यांच्या कामांनाही महत्व देण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील अनेक रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. घोडबंदर भागातील मुख्य रस्ते, सेवा रस्ते, उड्डाणपुलावरील रस्ते आदींसह इतर भागातील रस्तेही सुस्थितीत आणले गेले आहेत. शिवाय ज्या रस्त्यांवर मलनिसारण वाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. त्याठिकाणचे रस्तेही वाहतुकीसाठी आता सज्ज झाले आहेत. अंतर्गत भागात काही ठिकाणी मलनिसारण वाहिन्या टाकण्याचे काम सुरु असल्याने त्याठिकाणच्या रस्त्यांची डागडुजी करण्याचे तेवढे शिल्लक आहे. परंतु हे प्रमाण अतिशय कमी आहे. शिवाय पावसाळ्यात एखाद्या रस्त्याला खड्डा पडलाच तर त्यासाठीही पालिकेने विविध प्रयोग हाती घेण्याचे निश्चित केले आहे. तसेच प्रत्येक प्रभाग समितीनुसार २५ लाखांची तरतूद ठेवण्यात आली आहे. शिवाय २ कोटींची अतिरिक्त तरतुदही ठेवण्यात आली आहे. तर एखाद्या वेळेस पावसाळ्यात रस्त्याला खड्डा पडलाच तर त्यासाठी अत्याधुनिक स्वरुपाचे तंत्रज्ञान वापरून खड्डे बुजविले जाणार आहेत.