शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

रामदास आठवले यांच्या बैठकीकडे सेंच्युरी रेयॉनच्या अधिकाऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:44 IST

कल्याण : आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीच्या कामगारांच्या थकीत देण्याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अलीकडेच सह्याद्री ...

कल्याण : आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीच्या कामगारांच्या थकीत देण्याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अलीकडेच सह्याद्री अतिथी गृहावर कामगार प्रतिनिधींसोबत बोलावलेल्या बैठकीकडे सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या प्रतिनिधींनी चक्क पाठ फिरवली. त्यामुळे यापुढील बैठक दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कामगारमंत्र्यांच्या उपस्थितीत घेतली जाईल, असे आठवले यांनी कामगार प्रतिनिधींना सांगितले.

एनआरसी कंपनीने २००९ मध्ये टाळेबंदी लागू केली. कंपनीतील साडेचार हजार कामगारांची थकीत देणी प्रलंबित आहेत. कामगारांनी २ हजार ५०० कोटी थकीत रक्कम देण्याचा दावा केला आहे. कंपनीची साडेचारशे एकर जागा अदानी समूहाने लिलावात घेतली आहे. जागेचा ताबा मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, नॅशनल कंपनी लॉ लवादाच्या मुंबई कार्यालयाने कामगारांना ६४ कोटींची देणी देण्याचा निर्णय दिला आहे. त्यात वाढ करून अदानीने १०० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. कामगारांना हा निर्णय मान्य नसल्याने लवादाच्या दिल्ली कार्यालयात कामगारांची याचिका प्रलंबित आहे. त्याची पुढील सुनावणी ३ सप्टेंबर रोजी होणार आहे. आठवले यांची कामगार प्रतिनिधी उदय चौधरी, जे. सी. कटारीया, भीमराव डोळस, अविनाश नाईक, सुभाष पाटील, रामदास वळसे पाटील यांनी भेट घेतली.

..............

वाचली.