शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पालघर-त्र्यंबकेश्वर महामार्गाला केंद्राकडून निधी

By admin | Updated: December 22, 2016 05:26 IST

पालघर, मनोर, विक्र मगड, जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला असून त्याच्या चौपदीकरणासाठी

हितेन नाईक / पालघरपालघर, मनोर, विक्र मगड, जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला असून त्याच्या चौपदीकरणासाठी केंद्राकडून भरीव निधी मिळणार आहे. मनोर मार्गे जाणाऱ्या या महामार्गा दरम्यान मनोर गावात नेहमीच दिसून येणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी बायपास रस्त्यांच्या उभारणीसाठी ३ ते े४ प्रस्ताव शासनाला सादर केल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.रायगड ते सिंधुदुर्ग हा सागरी महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला असून पालघर जिल्ह्याचा त्यात समावेश नसल्याने पालघर मधील सागरी महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळेल या दृष्टीने पालघर जिल्ह्याचाही समावेश करावा अशी विनंती शासनाला करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. पालघर मधला सागरी महामार्ग पालघर, माहीम, सफाळे, ते वरईमार्गे राष्ट्रीय महामार्गाला मिळतो अशा वेळी वसई या मार्गापासून अलिप्त रहात असल्याने वैतरणा खाडीवर (वाढीव बेटा) पुलाची उभारणी करून वसई शहराला या सागरी महामार्गाने डायरेक्ट जोडले जाणार असून तसा प्रस्ताव प्रधान सचिवांपुढे ठेवण्यात आला. त्यांनीही या प्रस्तावाला अनुकूलता दर्शविल्याची माहिती बांगर यांनी दिली.जिल्हा मुख्यालयाच्या ४४० एकर क्षेत्राचा मास्टर प्लॅन मंजूर असून मुख्यालयाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांच्या बळकटीकरणाची महत्वपूर्ण गरज त्यांनी पत्रकारांशी साधलेल्या अनौपचारिक संवादादरम्यान व्यक्त केली. पालघर शहराला पूर्व-पश्चिम असे जोडण्यासाठी सध्या एकच पूल असून अन्य दोन पुलाचा प्रस्ताव आहे. (त्यातील एकला मंजुरी मिळाली आहे.) मुख्यालयाला जोडणाऱ्या रस्त्यांची कनेक्टिव्हटी पाहून पूल उभारण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. मोरेकुरंन - दापोली या सागरी महामार्गा वरील पूल मागील १० वर्षांपासून उभारल्या नंतर बेवारस पडून होते. त्याच्या रस्त्यांचे बळकटीकरण करण्याचे कामही हाती घेण्यात आले असून तो परनाळी पर्यंत जोडला जाणार आहे. त्यामुळे पालघर ते बोईसर हा अत्यंत क्लिष्ट अशा मार्गावरील प्रवास आता टाळला जाणार आहे. डहाणू कडे जाणाऱ्या प्रवाशांना दापोली-परनाळी मार्गाने (बोईसरच्या बाहेरून) थेट डहाणूकडे जाता येणार आहे. तसेच पालघर-बोईसर, बोईसर-चिल्हार रस्त्याच्या चौपदीकरणाला मंजूरी मिळाली असून बोईसर-चिल्हार रस्ता एमआयडीसी कडून बांधून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. संबंधित सचिव आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठपुरावा सुरु असल्याची माहिती बांगर यांनी दिली. या वेळी पालघर मुख्यालयाचे मार्ग सहापदरी राहणार आहेत. तारापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या सभोवतालच्या ५ ते १६ किलोमीटर क्षेत्रातील गावांना जोडण्याबरोबर आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचिवण्याच्या दृष्टीने नव्या रस्त्यांचा व काही ठिकाणी पूल उभारणीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची कामे टप्याटप्याने हाती घेतली जाणार आहेत.जिल्ह्यात अवैध रेतीउत्खननाला बंदी असतांनाही मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु असल्याने हि रेती चोरी कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखल्या जात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. ५ नोव्हेंबर रोजी वैतरणा सह अन्य रेतीबंदरावर प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर शंभर टक्के रेती उत्खनन रोखल्याचे निदर्शनास आले आहे.वैतरणा रेतीबंदरावर हत्यारबंद पोलिसबंदोबस्त असलेल्या पोलिसचौकीची व्यवस्था करण्यात आली असून अवैध रेतीउत्खनन होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्याचे बांगर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)