शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात वसुबारस साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 04:20 IST

वेगाने बदलणाऱ्या जगात आदिवासीबांधव आपल्या समाजाची ओळख कायम ठेवू पाहत आहेत. यासाठी आदिवासी भाषा, संस्कृती हा अस्सल ठेवा म्हणून सिद्ध झाला आहे.

ठाणे - वेगाने बदलणाऱ्या जगात आदिवासीबांधव आपल्या समाजाची ओळख कायम ठेवू पाहत आहेत. यासाठी आदिवासी भाषा, संस्कृती हा अस्सल ठेवा म्हणून सिद्ध झाला आहे. यास कायम ठेवण्यासाठी यंदाही ठाणे व पालघर जिल्ह्यांतील वारली, कोकणा, महादेव कोळी, कातकरी, क-ठाकूर, म-ठाकूर जमातींमधील आदिवासीबांधवांनी रविवारी येथील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात वसुबारस पारंपरिक वेशभूषेत साजरी केली.पूर्वजांनी जपून ठेवलेली संस्कृती आधुनिक काळातदेखील तितक्यात ताकदीने जतन करण्याचा प्रयत्न आदिवासीबांधव करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस हा सण आदिवासीबांधव येथे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. याप्रमाणे आजही आदिवासी पुरुष व महिलांनी एकत्र येऊन वसुबारस पारंपरिक पद्धतीने नाचगाणी म्हणून साजरी केली. वारली समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्तात्रेय भुयाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी या मैदानावरील तारपाधारी अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वसुबारस साजरी करण्यात आली. येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात १४ वर्षांपासून वसुबारस केली जात आहे. यंदाचे हे पंधरावे वर्ष असून सकाळी ९.३० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी आदिवासी जिल्ह्याची ओळख व संस्कृतीचे प्रतीक कुलदैवत तारपाधारी अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. यावेळी तारपा नृत्य सादर केले. आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरा (भांगरे) यांना अभिवादन करण्यात आल्याचे भुयाळ यांनी सांगितले.

टॅग्स :Diwaliदिवाळीthaneठाणे