शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभांसह पंपहाउसवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 06:28 IST

ठाणे महापालिकेने आता शहरातील जलकुंभ आणि पंपहाउस सुरक्षित राहावेत, या उद्देशाने येथे तब्बल २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या १८ मे रोजी होणाºया महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.

ठाणे - ठाणे महापालिकेने आता शहरातील जलकुंभ आणि पंपहाउस सुरक्षित राहावेत, या उद्देशाने येथे तब्बल २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या १८ मे रोजी होणाºया महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बसवण्यात येणाºया कॅमेºयांमुळे पाणीवितरण केंद्रावर एखादा घातपाताचा प्रकार घडू नये, यासाठी महापालिकेने ही खबरदारी घेतली आहे.ठाणे शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या पुढे गेली आहे. ठामपामार्फत ठाणेकरांना रोज ४८० दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २०० दशलक्ष लीटर, मुंबई महापालिकेकडून ६०, एमआयडीसीकडून ११०, स्टेम प्राधिकरणाकडून ११० दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. निवासी आणि झोपडपट्टी भागात प्रतिव्यक्तीमागे १३५ लीटर प्रतिदिन, तर व्यावसायिक आणि इतर भागात २१० लीटर प्रतिदिन याप्रमाणे शहरात पाणीपुरवठा करण्यात येतो. शहराच्या विविध भागांत ५६ जलकुंभ आणि १७ पंपहाउस असून येथूनच शहरातील पाण्याचे नियोजन केले जाते. त्यामुळे ते नागरिकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. असे असले तरी पाणीवितरण व्यवस्थेच्या या महत्त्वाच्या केंद्रांवर पुरेसे सुरक्षारक्षक नसल्यामुळे जलकुंभ आणि पंपहाउसच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.शहरामध्ये घातपात घडवण्यासाठी जलकुंभ आणि पंप हाउसमधील पाण्याचा वापर होऊ शकतो, असा मुद्दा काही वर्षांपूर्वी सर्वसाधारण सभेत चर्चेत आला होता. नेमकी ही बाब लक्षात घेऊन जलकुंभ आणि पंपहाउसच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.ठाणे शहराच्या विविध भागांतील या जलकुंभ आणि पंपहाउसवर बसवण्यात येणाºया सीसीटीव्ही कॅमेºयांसाठी माजिवडा नागरी संशोधन केंद्रामध्ये नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. या कक्षात २०० कॅमेरे जोडण्यात येणार आहेत. त्याद्वारे पाणीवितरण केंद्रावरील हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.घातपातासाठी जलकुंभातील पाण्याचा वापर?'शहरामध्ये घातपात घडवण्यासाठी जलकुंभ आणि पंप हाउसमधील पाण्याचा वापर होऊ शकतो, असा मुद्दा काही वर्षांपूर्वी सर्वसाधारण सभेत चर्चेत आला होता. नेमकी ही बाब लक्षात घेऊन जलकुंभ आणि पंपहाउसच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीthaneठाणे