शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

कोट्यवधी खर्चून होणार ‘कावेरीसेतू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:58 IST

कळव्यात सुशोभीकरण : ब्रिटिशकालीन टेबल, खुर्च्या

ठाणे : ठाण्यातील तलावपाळी किंवा रोषणाईने चमचमणारे मॉल याकडे विरंगुळ्याकरिता ठाणेकरांचा ओढा असताना ठाण्यालगतच्या कळवा या तुलनेने कनिष्ठ मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या परिसरात तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून सह्याद्री शाळेजवळील नाल्यावरील रस्त्यावर ‘कावेरीसेतू’ उभा राहत आहे. ब्रिटिशकालीन खुर्च्या, आकर्षक महागडे दिवे, शांततेचे प्रतीक असलेल्या गौतम बुद्धांची प्रतिमा, आकर्षक रंगरंगती असा या सेतूच्या परिसरातील थाट असणार आहे. सकाळी व सायंकाळी कळव्यातील किंवा अगदी ठाण्यातील मंडळींनी तेथे विरंगुळ्याकरिता दोन घटका बसावे, अशी या सेतूच्या उभारणीमागील कल्पना आहे.

कळव्यात पूर्वी अरुंद असलेले रस्ते आता रुंद तर झाले आहेतच, पण सिमेंट काँक्रिटचे झाले आहेत. अंतर्गत रस्त्यांमुळे बाह्यरस्तेसुद्धा एकमेकांना जोडले गेले आहेत. ९० फुटांचा रस्ता हा तर खारेगावची नवी ओळख मानला जात आहे. त्याच भागात पारसिक चौपाटीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे येथील अर्थकारण बदलले आहे. ठाण्यातील घोडबंदर, वर्तकनगर, पोखरण या ठिकाणी जागेला किंवा फ्लॅटला जो दर मिळत आहे, तोच दर कळव्यात सुरू आहे.

स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून उभ्या राहत असलेल्या कावेरीसेतूमुळे कळव्याला नवी ओळख प्राप्त होत आहे. कळवा स्टेशनला जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणूनही हा सेतू ओळखला जाऊ लागला आहे. येथे फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांकरिता झाडांच्या सावलीत, पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये गप्पा मारण्यासाठी ब्रिटिशकालीन टेबल, खुर्च्या बसवण्यात आल्या आहेत. शिवाय, पाठीमागील बाजूस एक भिंतीचा आकार तयार करून त्यावर शांततेचे प्रतीक असलेल्या गौतम बुद्धांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. ब्रिटिशकालीन पथदिवे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्यांचा किंवा थबकणाºयांचा रेल्वे प्रवासाचा थकवा काही क्षणांतच दूर होणार आहे. सायंकाळच्या वेळी परिसरातील वादक येथे गिटार किंवा व्हायोलीनचे मंद सूर आळवत असतील आणि रसिक त्यांचा आस्वाद घेतील, अशी माहिती आव्हाड यांनी दिली. याठिकाणी नाल्यावरील भिंतीवर या भागातील कलाकारांना रोजच्या रोज आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

विरंगुळ्यासाठी होणार नवे केंद्रकाही वर्षांपूर्वी कळवा, खारेगावची ओळख अतिशय गजबजलेले, वाहतूककोंडीचे, अनधिकृत इमारतींचे आणि विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित ठिकाण म्हणून होती. मागील पाच वर्षांत ती पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी कळवा स्टेशनवरून रिक्षाने येताना पूर्णपणे वळसा मारून यावे लागत होते. परंतु, आता या सेतूमुळे हे अंतर अगदी काही मिनिटांवर आले आहे. नाल्यावर उभारण्यात आलेला हा रस्ता आता विरंगुळ्याचे नवे केंद्र होत असल्याने आपली वेगळी ओळख निर्माण करणार आहे.