शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी खर्चून होणार ‘कावेरीसेतू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:58 IST

कळव्यात सुशोभीकरण : ब्रिटिशकालीन टेबल, खुर्च्या

ठाणे : ठाण्यातील तलावपाळी किंवा रोषणाईने चमचमणारे मॉल याकडे विरंगुळ्याकरिता ठाणेकरांचा ओढा असताना ठाण्यालगतच्या कळवा या तुलनेने कनिष्ठ मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या परिसरात तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून सह्याद्री शाळेजवळील नाल्यावरील रस्त्यावर ‘कावेरीसेतू’ उभा राहत आहे. ब्रिटिशकालीन खुर्च्या, आकर्षक महागडे दिवे, शांततेचे प्रतीक असलेल्या गौतम बुद्धांची प्रतिमा, आकर्षक रंगरंगती असा या सेतूच्या परिसरातील थाट असणार आहे. सकाळी व सायंकाळी कळव्यातील किंवा अगदी ठाण्यातील मंडळींनी तेथे विरंगुळ्याकरिता दोन घटका बसावे, अशी या सेतूच्या उभारणीमागील कल्पना आहे.

कळव्यात पूर्वी अरुंद असलेले रस्ते आता रुंद तर झाले आहेतच, पण सिमेंट काँक्रिटचे झाले आहेत. अंतर्गत रस्त्यांमुळे बाह्यरस्तेसुद्धा एकमेकांना जोडले गेले आहेत. ९० फुटांचा रस्ता हा तर खारेगावची नवी ओळख मानला जात आहे. त्याच भागात पारसिक चौपाटीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे येथील अर्थकारण बदलले आहे. ठाण्यातील घोडबंदर, वर्तकनगर, पोखरण या ठिकाणी जागेला किंवा फ्लॅटला जो दर मिळत आहे, तोच दर कळव्यात सुरू आहे.

स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून उभ्या राहत असलेल्या कावेरीसेतूमुळे कळव्याला नवी ओळख प्राप्त होत आहे. कळवा स्टेशनला जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणूनही हा सेतू ओळखला जाऊ लागला आहे. येथे फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांकरिता झाडांच्या सावलीत, पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये गप्पा मारण्यासाठी ब्रिटिशकालीन टेबल, खुर्च्या बसवण्यात आल्या आहेत. शिवाय, पाठीमागील बाजूस एक भिंतीचा आकार तयार करून त्यावर शांततेचे प्रतीक असलेल्या गौतम बुद्धांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. ब्रिटिशकालीन पथदिवे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्यांचा किंवा थबकणाºयांचा रेल्वे प्रवासाचा थकवा काही क्षणांतच दूर होणार आहे. सायंकाळच्या वेळी परिसरातील वादक येथे गिटार किंवा व्हायोलीनचे मंद सूर आळवत असतील आणि रसिक त्यांचा आस्वाद घेतील, अशी माहिती आव्हाड यांनी दिली. याठिकाणी नाल्यावरील भिंतीवर या भागातील कलाकारांना रोजच्या रोज आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

विरंगुळ्यासाठी होणार नवे केंद्रकाही वर्षांपूर्वी कळवा, खारेगावची ओळख अतिशय गजबजलेले, वाहतूककोंडीचे, अनधिकृत इमारतींचे आणि विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित ठिकाण म्हणून होती. मागील पाच वर्षांत ती पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी कळवा स्टेशनवरून रिक्षाने येताना पूर्णपणे वळसा मारून यावे लागत होते. परंतु, आता या सेतूमुळे हे अंतर अगदी काही मिनिटांवर आले आहे. नाल्यावर उभारण्यात आलेला हा रस्ता आता विरंगुळ्याचे नवे केंद्र होत असल्याने आपली वेगळी ओळख निर्माण करणार आहे.