शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

बिबळ्यांनी घेतली वस्तीकडे धाव

By admin | Updated: January 4, 2016 01:29 IST

गेल्या पंधरवड्यात या जिल्ह्यातील अनेक गावे आणि पाडे यातील पाळीव पशूंना आपले भक्ष्य बिबळ्याचे बनविण्याचे प्रकार वाढले आहेत.

पालघर : गेल्या पंधरवड्यात या जिल्ह्यातील अनेक गावे आणि पाडे यातील पाळीव पशूंना आपले भक्ष्य बिबळ्याचे बनविण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामागे लगतच्या जिल्ह्यातील ऊसाची झालेली तोड, बिबळ्यांची वाढती संख्या आणि जंगलात जाणवणारा भक्षांचा अभाव व त्यांचा वीणीचा काळ ही कारणे असल्याचे वनखात्यांच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.हिवाळा हा बिबळ्यांच्या प्रजननाचा काळ आहे. पावसाळ्यात बिबळ्यांच्या नर-मादीचे मिलन होते व हिवाळ्यात मादी पिल्लांना जन्म देते त्यासाठी त्यांना लागणारा एकांत हे नर, मादी बिबळे ठाणे, नाशिक, नगर, पुणे या जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या ऊसाच्या फडामध्ये मिळवीत असतात. दिवसभर फडामध्ये अगदी आतल्या बाजूस राहायचे आणि रात्री अथवा पहाटे लगतच्या शेतावरील प्राणी फस्त करायचे अशी त्यांची पद्धती असते. परंतु ऊसाचा गळीत हंगाम सुरू झाला की, ऊसाची तोड सुरू होते आणि या बिबळ्यांना पिलासह जवळपासच्या जंगलाचा अथवा मिळेल त्या रानावनाचा आश्रय घ्यावा लागतो. मादी प्रसूत झाल्यामुळे अशक्त झालेली असते. त्यामुळे ती जंगलात शिकार करण्याऐवजी जवळपासच्या मानवी वस्तीत असलेल्या पाळीव प्राण्यांना भक्ष्य करणे पसंत करते. कारण ते बांधून ठेवले असल्यामुळे तिच्या तावडीत सहज सापडतात. या कारणाबरोबरच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तानसा अभयारण्य यातील बिबळ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यांना आवश्यक त्या प्रमाणात तिथे भक्ष्य उपलब्ध नसल्यामुळे ते मानवी वस्तीकडे सध्या धाव घेताहेत. दुसरीकडे रानडुक्करांची संख्या प्रचंड वाढली आहे. ते याच परिसरातल्या गाव-पाड्यातील शेतीला, पिकांना फस्त करण्यासाठी येत असतात. जव्हार तालुक्यात अशा डुकरांच्या हल्ल्यात गेल्याच महिन्यात तीन शेतकरी जखमी झाले होते. या डुकरांची शिकार करण्यासाठी बिबळे गाव-पाड्यानजीक येतात आणि डुकरे मिळाली नाही तर तेथील पाळीव प्राणी उचलून नेतात. यामध्ये वनखात्याच्या हाती पिंजरा लावणे एवढाच उपाय असतो. परंतु तो सुद्धा कुठेही लावता येत नाही. बिबळ्या हा शेड्युल ए मधला प्राणी असल्याने त्याबाबत कोणतीही कारवाई करताना वनखात्याला असंख्य नियमांचे पालन करावे लागते. बिबळ्याने जनावरे उचलून नेली अथवा त्यांना भक्ष्य केले की गावकरी पिंजरा लावा अशी मागणी करतात. परंतु जोपर्यंत बिबळ्या हा नरभक्षक होत नाही किंबहुना त्याचा उच्छाद निर्माण होत नाही तोपर्यंत पिंजरा लावता येत नाही. तो लावण्याची प्रक्रिया देखील मोठी असते. हे देखील गावकऱ्यांनी लक्षात घ्यावे. बिबळ्या हा श्वांपद आहे. शिकार करणे हा त्याचा स्वभाव आणि पोट भरण्याचा भाग आहे. त्यामुळे केवळ त्याने एखाद्या वस्तीतून प्राणी उचलून नेले अथवा मारून खाल्ले या कारणासाठी त्याला पकडण्याकरीता पिंजरा लावता येत नाही. हे समजून घ्यावे, असे या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.> कुत्रा, शेळ्या, मेंढया, करडू, गाई, म्हशी हे प्राणी उघड्या गोठ्यात बांधून ठेऊ नका.शक्यतो रात्री लाईट सुरू ठेवा, घराच्या किंवा मळ्यातील घराच्या आसपास शेकोटी पेटवून ठेवा. ते शक्य नसेल तर मशाल, टेंभा, पलिते पेटते ठेवा.घराचे दरवाजे मजबूत ठेवा, खिडक्यांना जाळ्या लावा.