शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

बिबळ्यांनी घेतली वस्तीकडे धाव

By admin | Updated: January 4, 2016 01:29 IST

गेल्या पंधरवड्यात या जिल्ह्यातील अनेक गावे आणि पाडे यातील पाळीव पशूंना आपले भक्ष्य बिबळ्याचे बनविण्याचे प्रकार वाढले आहेत.

पालघर : गेल्या पंधरवड्यात या जिल्ह्यातील अनेक गावे आणि पाडे यातील पाळीव पशूंना आपले भक्ष्य बिबळ्याचे बनविण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामागे लगतच्या जिल्ह्यातील ऊसाची झालेली तोड, बिबळ्यांची वाढती संख्या आणि जंगलात जाणवणारा भक्षांचा अभाव व त्यांचा वीणीचा काळ ही कारणे असल्याचे वनखात्यांच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.हिवाळा हा बिबळ्यांच्या प्रजननाचा काळ आहे. पावसाळ्यात बिबळ्यांच्या नर-मादीचे मिलन होते व हिवाळ्यात मादी पिल्लांना जन्म देते त्यासाठी त्यांना लागणारा एकांत हे नर, मादी बिबळे ठाणे, नाशिक, नगर, पुणे या जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या ऊसाच्या फडामध्ये मिळवीत असतात. दिवसभर फडामध्ये अगदी आतल्या बाजूस राहायचे आणि रात्री अथवा पहाटे लगतच्या शेतावरील प्राणी फस्त करायचे अशी त्यांची पद्धती असते. परंतु ऊसाचा गळीत हंगाम सुरू झाला की, ऊसाची तोड सुरू होते आणि या बिबळ्यांना पिलासह जवळपासच्या जंगलाचा अथवा मिळेल त्या रानावनाचा आश्रय घ्यावा लागतो. मादी प्रसूत झाल्यामुळे अशक्त झालेली असते. त्यामुळे ती जंगलात शिकार करण्याऐवजी जवळपासच्या मानवी वस्तीत असलेल्या पाळीव प्राण्यांना भक्ष्य करणे पसंत करते. कारण ते बांधून ठेवले असल्यामुळे तिच्या तावडीत सहज सापडतात. या कारणाबरोबरच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तानसा अभयारण्य यातील बिबळ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यांना आवश्यक त्या प्रमाणात तिथे भक्ष्य उपलब्ध नसल्यामुळे ते मानवी वस्तीकडे सध्या धाव घेताहेत. दुसरीकडे रानडुक्करांची संख्या प्रचंड वाढली आहे. ते याच परिसरातल्या गाव-पाड्यातील शेतीला, पिकांना फस्त करण्यासाठी येत असतात. जव्हार तालुक्यात अशा डुकरांच्या हल्ल्यात गेल्याच महिन्यात तीन शेतकरी जखमी झाले होते. या डुकरांची शिकार करण्यासाठी बिबळे गाव-पाड्यानजीक येतात आणि डुकरे मिळाली नाही तर तेथील पाळीव प्राणी उचलून नेतात. यामध्ये वनखात्याच्या हाती पिंजरा लावणे एवढाच उपाय असतो. परंतु तो सुद्धा कुठेही लावता येत नाही. बिबळ्या हा शेड्युल ए मधला प्राणी असल्याने त्याबाबत कोणतीही कारवाई करताना वनखात्याला असंख्य नियमांचे पालन करावे लागते. बिबळ्याने जनावरे उचलून नेली अथवा त्यांना भक्ष्य केले की गावकरी पिंजरा लावा अशी मागणी करतात. परंतु जोपर्यंत बिबळ्या हा नरभक्षक होत नाही किंबहुना त्याचा उच्छाद निर्माण होत नाही तोपर्यंत पिंजरा लावता येत नाही. तो लावण्याची प्रक्रिया देखील मोठी असते. हे देखील गावकऱ्यांनी लक्षात घ्यावे. बिबळ्या हा श्वांपद आहे. शिकार करणे हा त्याचा स्वभाव आणि पोट भरण्याचा भाग आहे. त्यामुळे केवळ त्याने एखाद्या वस्तीतून प्राणी उचलून नेले अथवा मारून खाल्ले या कारणासाठी त्याला पकडण्याकरीता पिंजरा लावता येत नाही. हे समजून घ्यावे, असे या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.> कुत्रा, शेळ्या, मेंढया, करडू, गाई, म्हशी हे प्राणी उघड्या गोठ्यात बांधून ठेऊ नका.शक्यतो रात्री लाईट सुरू ठेवा, घराच्या किंवा मळ्यातील घराच्या आसपास शेकोटी पेटवून ठेवा. ते शक्य नसेल तर मशाल, टेंभा, पलिते पेटते ठेवा.घराचे दरवाजे मजबूत ठेवा, खिडक्यांना जाळ्या लावा.