शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

उत्पन्नवाढ झाल्यास सुविधा देणे शक्य

By admin | Updated: February 11, 2017 03:49 IST

एका बाजूला उत्पन्नात वाढ होत नसताना दुसरीकडे सुविधांसाठी खर्च होत आहे. त्यामुळे तूट वाढत आहे. ही भरून न निघाल्यास भविष्यात नागरी सुविधा देणे अशक्य होईल

भार्इंदर : एका बाजूला उत्पन्नात वाढ होत नसताना दुसरीकडे सुविधांसाठी खर्च होत आहे. त्यामुळे तूट वाढत आहे. ही भरून न निघाल्यास भविष्यात नागरी सुविधा देणे अशक्य होईल, अशी सूचना प्रशासनाने अंदाजपत्रकात व्यक्त केली आहे. उत्पन्नात वाढ करण्यासाठी कर, पाणीपट्टीवाढ तसेच पालिकेच्या जागा भाड्याने देणे गरजेचे आहे, असे मतही नोंदवले आहे. मीरा-भार्इंदर पालिकेने गेल्यावर्षीच्या १ हजार ३८९ कोटींच्या अंदाजपत्रकात यंदा ५३ कोटींची वाढ करून एकूण १ हजार ४४२ कोटी ८९ लाख २८ रुपयांचे अंदाजपत्रक उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी शुक्रवारी स्थायी सभापती प्रभाकर म्हात्रे यांना सादर केले. मुख्य लेखापरीक्षक एम.एम. निपाणे, मुख्यलेखाधिकारी शरद बेलवटे, सहायक लेखाधिकारी सुरेश घोलप, माजी स्थायी सभापती शरद पाटील, हरिश्चंद्र आमगावकर, सदस्य प्रेमनाथ पाटील उपस्थित होते. यंदाचे अंदाजपत्रक १५ लाख ६० हजार शिलकीचे असून त्यात कोणतीही करवाढ व नवीन प्रकल्प तसेच योजनांचा समावेश नाही. महासभेपुढे १९ फेब्रुवारीपूर्वी अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. सरकारी अनुदानाखेरीज एकूण ४५८ कोटी ३२ लाखांचे मूळ उत्पन्न असलेल्या या अंदाजपत्रकात एमएमआरडीए व इतर संस्थांमार्फत घेण्यात आलेले एकूण २३३ कोटी कर्ज दाखवण्यात आले आहे. या आर्थिक वर्षात त्यात १२९ कोटींची वाढ होणार आहे. (प्रतिनिधी)