शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

३६ तासांची पाणीकपात रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 02:05 IST

मीरा-भार्इंदरची पाणीकपात ३६ तासांवर गेली असून ती रद्द करावी, अशी मागणी माजी खासदार संजीव नाईक यांनी बुधवारी आयुक्त महापालिका आयुक्त बळीराम पवार यांच्याकडे केली.

मीरा रोड : मीरा-भार्इंदरची पाणीकपात ३६ तासांवर गेली असून ती रद्द करावी, अशी मागणी माजी खासदार संजीव नाईक यांनी बुधवारी आयुक्त महापालिका आयुक्त बळीराम पवार यांच्याकडे केली.भुयारी मार्गाचे काम पूर्ण करा, उत्तनवासीयांची कचऱ्यातून सुटका करा आदी विविध मागण्याही त्यांनी केल्या. यावेळी पक्षातर्फे ११ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मीरा-भार्इंदर महापालिकेत आयुक्तांच्या दालनात माजी खासदार नाईक यांनी पक्षाचे माजी नगरसेवक प्रकाश दुबोले, पौर्णिमा काटकर, नरेंद्र भाटिया, संतोष गोळे, साजिद पटेल, शिल्पा सावंत, रमेश गायकवाड, भिलारे, साळुंके आदी पदाधिकारी - कार्यकर्त्यांसमवेत आयुक्तांशी चर्चा केली.मीरा-भार्इंदरची पाणी कपात ३६ तासांवर गेली आहे. या आधी आम्ही प्रत्येकवेळी मीरा-भार्इंदरला पाणी कपातीतून वगळत नागरिकांना दिलासा दिला होता. त्यामुळे आताही पाणीकपात रद्द करा, असे नाईक म्हणाले.भूमीगत गटार योजनेच्या कामाचा खर्च ५०० कोटींवर गेला आहे, तरीही काम रखडले आहे. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई करा. उत्तन व परिसरातील रहिवाशी डम्पिंगमुळे त्रस्त असून त्यांना दिलासा द्या. शहरात फेरीवाले व अनधिकृत बांधकामे वाढत असताना त्यावर नियंत्रण न ठेवणारया अधिकाºयांवर कारवाई करा. टीडीआर घोटाळे, विकास आराखडा, पालिकेकडून केली जाणारी अनावश्यक व निकृष्ट दर्जाची बांधकामे, रखडलेले रस्ते, परिवहन सेवेची दुरवस्था आदी अनेक मुद्द्यांवर नाईक यांनी आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली.मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री गेली दोन वर्षे सतत शहरात येत असून विविध भूमीपुजने, उद्घाटने करीत आहेत. या कार्यक्रमांसाठी होणारा लाखो रुपयांचा खर्च कुठून केला? असा सवाल करत या खर्चाची चौकशी करुन कारवाई करा, असे निवेदनात म्हटले आहे.काशिमीरा नाका येथील शिवाजी महाराजांचा पुतळा उंच करणे किंवा उड्डाण पुलापेक्षा उंच नवा पुतळा बसवण्यावर समिती विचार करत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. पाणी कपात रद्द करण्यासोबतच अन्य मागण्यांवरही विचार करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.